एक्स्प्लोर

राजापूर मतदारसंघ : शिवसेनेचे राजन साळवी हॅटट्रिक करणार?

रत्नागिरीमधला राजापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो. शिवसेनेचे राजन साळवी हे राजापुरचे विद्यमान आमदार आहेत. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत साळवी या मतदारसंघातून निवडून आले आहेत.

रत्नागिरीमधला राजापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो. शिवसेनेचे राजन साळवी हे राजापुरचे विद्यमान आमदार आहेत. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत साळवी या मतदारसंघातून निवडून आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचं चांगलंच वर्चस्व आहे. त्यामुळे, यंदाही राजन साळवी यांचंच पारडं जड असल्याचे पाहायला मिळत आहे. नाणार आणि जैतापूर हे दोन्ही वादग्रस्त प्रकल्प याच मतदारसंघात असल्याने त्याद्रुष्टीनं हा मतदारसंघ खूप महत्त्वाचा आहे. 2014 साली जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेनं प्रखर विरोध केला होता. त्यानंतर राजन साळवी मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. आता नाणार प्रकल्पालाही सेनेनं कडाडून विरोध केला आहे. मात्र आता 2014 सारखी परिस्थिती नाही. कारण जैतापूर प्रकल्पाला सगळ्याच स्थानिकांचा विरोध होता. पण, यावेळी परिस्थिती वेगळी आहे. नाणार प्रकल्पावरुन स्थानिकांमध्ये फूट पडली. त्यामुळे यंदा मतदारसंघाचा पूर्ण पाठींबा सेनेला मिळेलच असं नाही. मात्र राजन साळवींची जमेची बाजू म्हणजे अतिशय विखुरलेल्या छोट्याशा गावांमध्येही त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. भाचपचं या मतदारसंघातलं अस्तित्व नगण्य आहे. त्यामुळे राजन साळवींनाच युतीची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. राजापुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कोणीही मोठा चेहरा नाही. त्यामुळे तगडा विरोधक नसणं हे सेनेच्या पथ्यावर पडू शकेल. मतदारांची संख्या पुरुष मतदार - 1,07,338 महिला मतदार - 1,26,821 एकूण - 2,34,159 विधानसभा मतदारसंघ क्रमांक- 267 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी राजन साळवी, शिवसेना –76266 राजेंद्र देसाई, काँग्रेस - 37204 अजित रमेश यशवंतराव, राष्ट्रवादी - 11923 संजय यादव - भाजप- 9953 आनंद कांबळे, बसपा – 2193 राजापूर हा रत्नागिरी जिल्ह्यातला निसर्गसंपन्न आणि प्राचीन असा भाग आहे. सोळाव्या शतकापासून राजापूर एक चांगलं बंदर व व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. इंग्रजांच्या काळातही ते व्यापारी केंद्र होतं. राजापुरी पंचे, राजापुरी खोबरं, राजापुरी हळद हे ब्रॅण्ड त्यामुळे प्रसिध्द आहेत. इंग्रजांची वखार राजापूरला होती ती जीर्ण झाल्याने पाडण्यात आली. राजापुरात पेशवेकालीन स्थापत्य शैलीतील वाडे अजूनही अस्तित्व टिकवून आहेत. त्यामुळे, निसर्गचित्रकार, छायाचित्रकार यांना तर राजापूर म्हणजे नंदनवनच आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी राजापूरमध्ये पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. परंतु आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यासोबत फणस, कोकम, जांभूळ, काजू आणि नारळाच्या बागा या भागात आहेत. या पट्ट्यात भातशेतीही केली जाते. त्यासोबत मासेमारी हा अनेकांचा व्यवसाय आहे. इथल्या समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता आणि सुशोभिकरणानंतर येथील पर्यटनाला चालना देता येईल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Milk Kolhapur : 'गोकुळ' मतदार नोंदणी वादाच्या भोवऱ्यात, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाविरोधात चौकशीचे आदेश, नेमकं काय घडलं?
'गोकुळ' मतदार नोंदणी वादाच्या भोवऱ्यात, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाविरोधात चौकशीचे आदेश, नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप,  उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप,  उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ओढले ताशेरे, राष्ट्रवादीच्या सदस्यांचा जामीन मंजूर
सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ओढले ताशेरे, राष्ट्रवादीच्या सदस्यांचा जामीन मंजूर

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhurandhar 2 Box Office Collection Day 14: 'धुरंधर 2'च्या धुवांधार कमाईनं थरथरलं बॉक्स ऑफिस; चौदाव्या दिवशीही दिग्गजांना लोळवलं, आता लक्ष्य 'बाहुबली 2'?
'धुरंधर 2'च्या धुवांधार कमाईनं थरथरलं बॉक्स ऑफिस; चौदाव्या दिवशीही दिग्गजांना लोळवलं, आता लक्ष्य 'बाहुबली 2'?
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
Chhaava 2 Vicky Kaushal As Shahu Maharaj: बॉक्स ऑफिस पुन्हा हादरणार, 'छावा'चा सीक्वेल येणार? शाहू महाराजांच्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल
बॉक्स ऑफिस पुन्हा हादरणार, 'छावा'चा सीक्वेल येणार? शाहू महाराजांच्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Embed widget