एक्स्प्लोर

Raj Thackeray : माझ्या हाती सत्ता द्या, एकाही मशिदीवर भोंगा लावू देणार नाही : राज ठाकरे

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

Raj Thackeray, अमरावती : "धर्मांध मुसलमानांच्या धांगडधिंग्याच्या विरोधात आवाज उठवणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात मी आवाज दिला आणि ते बंद करून घेतले. हे केलं म्हणून माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर 17000 केसेस टाकल्या, आणि त्यावेळेस सरकार कोणाचं होतं तर उद्धव ठाकरे-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच. माहीममध्ये एक मझार होती ती अनधिकृत होती, ती आम्ही पाडायला लावली. माझा आज तुम्हाला शब्द देतो, माझ्या हाती सत्ता द्या, एकाही मशिदीवर भोंगा लावू देणार नाही", असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. अमरावती विधानसभेचे उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी अमरावती येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. 

राज ठाकरे म्हणाले,  आपण मराठी म्हणून किंवा हिंदू म्हणून कधी विचार करणार आहोत का नाही ? हिंदू फक्त दंगलीत एकत्र असतो बाकीच्या वेळेस तो हिंदू नसतो. आणि हेच बाहेरच्यांना हवं आहे. मी एक क्लिप पाहिली आज, एक मुसलमान मौलवी मशिदीतून फतवा काढतो की काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एक गठ्ठा मतदान करा असे फतवे निघत आहेत. लोकसभेला पण हेच घडलं. मग हिंदू का विखुरलेले ? असा सवालही राज ठाकरे यांनी केला. 

इम्तियाज जलीलने हजारो मुसलमानांचा मोर्चा मुंबईत आणला, ही हिंमत का झाली ? कारण काँग्रेस-शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस- उद्धव ठाकरेंचे खासदार निवडून आलेत. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर अभद्र युती केल्यावर स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाच्या मागची 'हिंदुहृदय' सम्राट ही उपाधी काढली. नवनीत राणांचा पराभव झाल्यावर मुसलमानांनी रस्त्यावर उतरून बीभत्स आंनद व्यक्त केला. मागे एकदा अमरावतीत दंगल झाली तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विश्व हिंदू परिषद यांनी दंगेखोर मुसलमानांना सडकून काढलं होतं. कितीवेळ बाहेर उभं राहून करायचं, माझ्या हाती सत्ता द्या, एकेकाला चांगला सडकून काढायचा, असंही राज ठाकरे म्हणाले. 

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, अमरावतीला आलं की मला घरी आल्यासारखं वाटतं. 1989 साली प्रत्यक्ष राजकारणात आलो, जन्म राजकीय घरात झाला होता. पुढे राजकीय व्यंगचित्रकार झालो आणि 1989 साली विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झाला. 1993 साली मी नागपूरला बेरोजगार तरुणांचा मोर्चा काढला होता. 1989 ते 1995 हा काळ माझा मराठवाडा आणि विदर्भात गेला. त्यातल्या त्यात विदर्भात सगळ्यात जास्त काळ अमरावतीत राहिलो. 1988-89 ला माझे मित्र विजय राऊत यांच्या घरी जात असे. तेव्हाच अमरावती सुंदर होतं. माझ्या आजीचं माहेर अमरावती. अमरावतींबद्दल मला पहिल्यापासून एक आस्था आहे. पण आज हे शहर जसं आकारहीन होत गेलं ते पाहून वाईट वाटतं. 

आज विदर्भातील तरुण-तरुणी शिक्षण,नोकरीसाठी विदर्भात न राहता पुणे-मुंबईत जातात. याला विकास म्हणायचं ? तुम्हाला तुमच्या शहरात चांगलं शिक्षण मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाहीत याला काय अर्थ आहे ? मग तुम्हाला पिढ्यानपिढ्या विकासाचं स्वप्न दाखवलं गेलं त्याचं काय झालं ? तुमचे आमदारकीचे उमेदवार पण पक्ष बदलून इकडून तिकडे गेले, हे का होतं कारण तुम्ही त्यांना जाब विचारत नाहीत, असंही राज ठाकरे म्हणाले. 

हिंदू एकत्र येऊ नये म्हणून शरद पवार नामक संताने महाराष्ट्रात जातीजातीत विष पेरलं. जेम्स लेन प्रकरणात महाराजांच्याबद्दल काही वेडीवाकडी वाक्य होती, ते पुस्तक कोणी वाचलं होतं ? त्यावर बाबासाहेब पुरंदरे, गजानन मेहंदळें यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या मजकुरावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर पवारांनी भांडारकर संस्थेवर आरोप करवून घेतला की याच संस्थेनेच म्हणे ही चुकीची माहीती दिली. आणि पुढे बाबासाहेब पुरंदरेंवर आरोप करून शरद पवारांनी आधी ब्राह्मण-मराठा वाद भडकवला आणि पुढे मराठा-ओबीसी वाद पेटवला. तुम्ही मराठी म्हणून किंवा हिंदू म्हणून एकत्र येऊ नये ही पवारांची इच्छा आहे. 

यवतमाळ असू दे किंवा इतर अनेक जिल्हे हे आज कशासाठी ओळखले जातात तर कधी आत्महत्या करणाऱ्यांचा जिल्हा तर एखादा जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. याला काय अर्थ आहे ? कुठे गेला मग इतक्या वर्षांचा विकास. माझा जाहीरनामा पुढच्या 4,5 दिवसांत येईल त्यात मी तीच आश्वासनं देईन जी पूर्ण होतील. मध्यंतरी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचं स्वप्न दाखवलं गेलं. मुळात हा पुतळा उभा राहणं शक्य नाही. पण जरी तो झाला त्याच्यासाठी 15 ते 20 हजार कोटींचा खर्च येईल. इतका पैसा पुतळ्यांवर खर्च करण्यापेक्षा त्या पैशातून महाराजांनी उभारलेल्या गड-किल्ल्यांचं संवर्धन करा. तसंच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं खरं स्मारक म्हणजे जगातील सगळ्यात मोठी लायब्ररी उभी करण असेल. अहो ही जगातील सगळ्यात मोठी लायब्ररी हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली नाही का ? असा सवालही राज ठाकरे म्हणाले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump on India : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टॅक्स कमी करण्यासाठी भारताची सहमती, आता भारताकडून तत्काळ खुलासा
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टॅक्स कमी करण्यासाठी भारताची सहमती, आता भारताकडून तत्काळ खुलासा
Kanifnath Yatra : कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार; मढी ग्रामसभेच्या 'त्या' ठरावाला न्यायालयाची स्थगिती
कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार; मढी ग्रामसभेच्या 'त्या' ठरावाला न्यायालयाची स्थगिती
बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानात रेल्वे हायजॅक; लष्कराच्या कारवाईत 30 सैनिक, 16 बंडखोर ठार; 214 ओलिसांपैकी 104 जणांची सुटका
बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानात रेल्वे हायजॅक; लष्कराच्या कारवाईत 30 सैनिक, 16 बंडखोर ठार; 214 ओलिसांपैकी 104 जणांची सुटका
Dharashiv Crime : धाराशिवमध्ये संतोष देशमुख प्रकरणासारखीच संतापजनक घटना, 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड, काठीनं अमानुष मारहाण, मृत समजून विवस्त्र अवस्थेत दिलं फेकून
धाराशिवमध्ये संतोष देशमुख प्रकरणासारखीच संतापजनक घटना, 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड, काठीनं अमानुष मारहाण, मृत समजून विवस्त्र अवस्थेत दिलं फेकून
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Tribute Yashwantrao Chavan : अजित पवारांची प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाणांना आदरांजलीAjit Pawar PC Pritisangam : सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा याची शिकवणी चव्हाण साहेबांनी दिलीTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 March 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : 12 March 2025 : Maharashtra News : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump on India : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टॅक्स कमी करण्यासाठी भारताची सहमती, आता भारताकडून तत्काळ खुलासा
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टॅक्स कमी करण्यासाठी भारताची सहमती, आता भारताकडून तत्काळ खुलासा
Kanifnath Yatra : कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार; मढी ग्रामसभेच्या 'त्या' ठरावाला न्यायालयाची स्थगिती
कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार; मढी ग्रामसभेच्या 'त्या' ठरावाला न्यायालयाची स्थगिती
बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानात रेल्वे हायजॅक; लष्कराच्या कारवाईत 30 सैनिक, 16 बंडखोर ठार; 214 ओलिसांपैकी 104 जणांची सुटका
बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानात रेल्वे हायजॅक; लष्कराच्या कारवाईत 30 सैनिक, 16 बंडखोर ठार; 214 ओलिसांपैकी 104 जणांची सुटका
Dharashiv Crime : धाराशिवमध्ये संतोष देशमुख प्रकरणासारखीच संतापजनक घटना, 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड, काठीनं अमानुष मारहाण, मृत समजून विवस्त्र अवस्थेत दिलं फेकून
धाराशिवमध्ये संतोष देशमुख प्रकरणासारखीच संतापजनक घटना, 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड, काठीनं अमानुष मारहाण, मृत समजून विवस्त्र अवस्थेत दिलं फेकून
Ajit Pawar: शिवाजी महाराजांनी जातीधर्मात भेद केला नाही, त्यांच्या सैन्यात मुस्लीम मावळे होते; नितेश राणेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
शिवाजी महाराजांनी जातीधर्मात भेद केला नाही, त्यांच्या सैन्यात मुस्लीम मावळे होते; नितेश राणेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
DA Hike : महागाई भत्त्यासंदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, कर्मचारी पेन्शनर्सला होळीचं गिफ्ट मिळणार?
केंद्र महागाई भत्ता वाढवणार? कर्मचारी-पेन्शनर्सला होळीचं गिफ्ट?
Maharashtra Weather Update: उन्हाचा चटका वाढला, बहुतांश जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा;राज्यात हवामानाचा अंदाज काय?
उन्हाचा चटका वाढला, बहुतांश जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा;राज्यात हवामानाचा अंदाज काय?
Mumbai Motilal Nagar redevelopment: गोरेगावच्या मोतीलाल पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहाची 36000 कोटींची बोली, 143 एकरांचा प्रोजेक्ट अदानींना मिळाला
मुंबईतील आणखी एक मोठा पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला मिळाला, 36000 कोटींची बोली
Embed widget