एक्स्प्लोर

...म्हणून आम्ही मुस्लीम लोकांना उमेदवारी देत नाही, भाजपच्या माजी उपमुख्यमंत्र्याचं वादग्रस्त विधान

लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकमध्ये एका वरिष्ठ भाजप नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी भारतीय जनता पक्ष मुस्लीम नेत्यांना उमेदवारी का देत नाही, याचे कारण सांगितले आहे.

बंगळुरु : लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकमध्ये एका वरिष्ठ भाजप नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा म्हणाले की, "मुस्लिम लोक आमच्यावर (भाजपवर) विश्वास ठेवत नाही, त्यामुळे आम्ही मुस्लिम उमेदवारांना तिकीट देत नाही. तुम्ही (मुस्लीम सामुदाय) आमच्यावर विश्वास ठेवा, तर मग आम्ही तुम्हाला तिकीट देतो." या विधानामुळे ईश्वरप्पा यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुरु झाली आहे. काल (सोमवार, 1 एप्रिल) कोप्पल येथे झालेल्या प्राचाराच्या एका कार्यक्रमात ईश्वरप्पा यांनी अल्पसंख्यांक सामुदायातील लोकांशी संवाद साधला. त्यावेळी ईश्वरप्पा म्हणाले की, "काँग्रेसने तुमचा (मुस्लीम सामुदायाचा) फक्त वोट बँक म्हणून वापर केला आहे. तसेच काँग्रेसने तुम्हाला लोकसभेचे तिकीटसुद्धा दिले नाही. आम्ही मुस्लिमांना तिकीट देत नाही. कारण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवत नाही. आमच्यावर विश्वास ठेवा, मग आम्ही तुम्हाला तिकीट देऊ." ईश्वरप्पा हे कर्नाटकमधील जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारमध्ये 2012 ते 2013 दरम्यान उपमुख्यमंत्री होते. ईश्वरप्पा यांनी यापूर्वी अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एका कार्यक्रमात ईश्वरप्पा म्हणाले होते की, "जे मुस्लीम काँग्रेसमध्ये आहेत, ते 'हत्यारे' आहेत. जे मुस्लीम भारतीय जनता पक्षासोबत आहेत, ते चांगले मुस्लीम आहेत."
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Embed widget