एक्स्प्लोर

मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय

मुंबईतील 6 मतदारसंघात उद्या मतदान होत आहे, त्या पार्श्वभूमीवर काही सिलिब्रिटी व बड्या हस्तींकडून नागरिकांना मतदानाचं आवाहन करण्यात येत आहे

मुंबई : देशातील पाचव्या व महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाला (Voting) उद्या सुरुवात होत असून 20 मे रोजी महाराष्ट्रातील 13 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यासाठी, मुंबईतील (Mumbai) 6 लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून ठाणे, कल्याण, भिंवडी, पालघर, नाशिक, धुळे आणि दिंडोरी या मतदारसंघातही मतदान होत आहे. राज्यातील शेवटच्या टप्प्यातील या मतदानासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागली असून प्रशासनाने आजच सर्वच बुथ केंद्रांवर पोहोचून तेथील तयारी पूर्ण केली आहे. उद्या सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होत आहे. देशाचं लक्ष लागलेल्या मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योगपती, दिग्गज राजकारण्यांसह बड्या हस्ती मतदान करणार आहेत. त्यातच, उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनीही मुंबईकरांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. 

मुंबईतील 6 मतदारसंघात उद्या मतदान होत आहे, त्या पार्श्वभूमीवर काही सिलिब्रिटी व बड्या हस्तींकडून नागरिकांना मतदानाचं आवाहन करण्यात येत आहे. उद्योगपती रतन टाटा यांनीही मुंबईकरांसाठी विशेष ट्विट केलंय. सोमवार हा मतदानाचा दिवस आहे, मुंबईकरांनो घराबाहेर पडून मतदानाचा हक्क आणि जबाबदारी निभावा, असे आवाहन टाटा यांनी केलं आहे. रतन टाटा यांच्या ट्विटला 45 हजार लाईक्स मिळाले असून 9 लाख 23 हजार जणांनी हे ट्विट पाहिल्यांचं दिसून येतेय. तर, 4.9 हजार युजर्संने हे ट्विट रिट्विट केलंय. तर, बातमी लिहीपर्यंत 994 कमेंट त्यांच्या ट्विटवर पडल्या आहेत. 


मुंबईतील 6 जागांवर महाविकास आघाडी व महायुतीमध्ये सामना? 

दक्षिण मुंबई-  अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव

दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई

उत्तर मुंबई- पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील 

उत्तर मध्य मुंबई- उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड

उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील

वायव्य मुंबई- रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर

पालघरमध्ये 21 लाख 48 हजार मतदार

दरम्यान, पाचव्या टप्प्यात पालघर मध्ये देखील मतदान होणार असून पालघर 22 या अनुसूचित जमाती मतदारसंघात 21 लाख 48 हजार 850 इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 11 लाख 25 हजार 209 पुरुष मतदार 10 लाख 23 हजार 80 स्त्री मतदार तर 225 तृतीयपंथी मतदार असून यासाठी जिल्ह्यात एकूण 2270 मतदान केंद्र असणार आहेत. ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी 13921 कर्मचारी आणि अधिकारी मतदान केंद्रांवर तैनात असतील. 20 तारखेला सकाळी सात वाजता पासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे . या मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी अस आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी केलं आहे.

कल्याणमध्ये प्रशासन सज्ज

कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उद्या 20 तारखेला मतदान होणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग देखील सज्ज झालाय. कल्याण लोकसभा मतदारसंघात विविध शासकीय यंत्रणांचे तब्बल 11000 कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणेसह एस आर पी एफ, होमगार्ड असे एकूण 3000 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. आज पोलीस बंदोबस्तात संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. हे साहित्य घेऊन आज अधिकारी संबंधित मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. रात्री दहा वाजेपर्यंत हे साहित्य वाटपाला सुरुवात होणार असून सकाळी 7 वाजता मतदान सुरु होईल. 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Embed widget