एक्स्प्लोर

माहीम विधानसभा मतदारसंघ : युती तुटली तर मनसेला फायदा?

मतदारसंघ. याच मतदारसंघात राज ठाकरे यांचं कृष्णकुंज हे निवासस्थान आणि शिवसेनेचं मुख्यालय असलेलं शिवसेना भवन आहे. एवढंच नाही तर गेल्या काही दिवसात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली कोहिनूर मिल आणि कोहिनूर स्क्वेअर ही गगनचुंबी इमारतही याच मतदारसंघातली..

मतदारसंघ फेररचनेनंतर झालेल्या दादर-माहीम मतदारसंघात 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या लाटेत मनसेचे नितीन सरदेसाई निवडून आले होते. नगरसेवकही मनसेचे आणि खासदार काँग्रेसचा. त्यामुळे शिवसेनेचं मुख्यालय असलेल्या दादर - माहिम परिसरातच शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला होता. ही जखम इतकी खोल होती की खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तेव्हा शिवसेना मुख्यालय परिसरात आपला आमदार नसल्याची खंत बोलून दाखवली होती. शिवसेनेच्या त्या पराभवामागे जसा राज ठाकरे यांचा करिष्मा होता तसंच शिवसेनेतलं अंतर्गत राजकारणही होतं. अनेक निष्ठावंतांना डावलून त्यावेळी शिवसेनेनं ‘होम मिनिस्टर’ फेम आदेश बांदेकरांना उमेदवारी दिली. कट्टर शिवसैनिक असलेल्या सदा सरवणकरांनी मग काँग्रेसचा हात पकडला. पुढे बांदेकरांचं संघटनेत पुनर्वसन झालं, सरवणकरही सेनेत परतले आणि मनसेची धाकधूक वाढली. मात्र, त्याच दरम्यान 2014 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी शिवसेना-भाजप युती तुटल्याने माहीमची निवडणूक तिरंगी झाली. याचा फायदा मिळण्याऐवजी उलट मोदी लाटेमुळे भाजपच्या उमेदवाराने मते घेतल्यानं मनसेच्या सरदेसायांचा पराभव झाला आणि मराठी विरूद्ध शेठजी वादाची फोडणी मिळून सरवणकरांच्या रूपानं शिवसेनेनं दादर राखलं.
यानंतर निवडणुकीत भाजपच्या विरोधात असेलेली शिवसेना नंतर राज्याच्या भाजप सत्तेत भागीदारही झाली आणि महाराष्ट्रात दुसऱ्यांदा भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. मधल्या काळात भाजप-सेनेत अनेकदा तणाव आले, महापालिका निवडणुकीत टोकाची भाषा वापरली गेली.
शिवसेना सत्तेत असून विरोधक बनली. एका ठरावाद्वारे आणि उद्धव ठाकरेंद्वारेही यापुढे शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याची भूमिका मांडण्यात आली. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी नाट्यमयरित्या या सर्व वादावर पांघरूण घालत उद्धव ठाकरेंनी लोकसभेत भाजपसोबत असल्याचं जाहीर केलं. यानंतर या दोन्ही पक्षातले संबंध सुधारले असं वातावरण होतं मात्र, भाजपनं राज्यात सर्वत्र म्हणजे अगदी सेनेच्या मतदारसंघातूनही अन्य पक्षातून इनकमिंग सुरू केल्यानं शिवसेना सावध झालीय.
शिवसेनेनं ‘जागावाटपात आणि सत्तेत समसमान वाट्या’ची अपेक्षा केली असली तरी भाजपने स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळेच यंदा सदा सरवणकरांचं तिकिट पक्कं असण्याचे संकेत मिळत असले तरी, युती राहते की तुटते यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. युती झाली तर सदा सरवणकरांचा विधीमंडळाचा मार्ग सुकर आहे. थोडा संघर्ष असलाच तर तो मनसेसोबत आणि तेही संदीप देशपांडेंसारखा लढवय्या उमेदवार समोर असेल तर. युती न झाल्यास मात्र शिवसेनेचा मार्ग सोपा नसेल. भाजपशी काडीमोड घेण्याचा, परत सूत जुळवण्याचा डाव एकदाच खेळता येतो. त्यामुळे वेगळं लढल्यास विरोध कसा करायचा हा मुद्दा आहे. शिवाय, सेनेच्या आमदारांची संख्या घटवायचीच ठरवल्यास मनसेच्या उमेदवाराला भाजपकडून अनपेक्षित पाठिंबाही मिळू शकतो. भाजपचा उमेदवार 2014 प्रमाणे मतं घेण्याची शक्यता कमी आहे कारण इथे मराठीचा अंडरकरंट स्ट्राँग आहे. मात्र, शिवसेना-मनसेच्या लढाईत भाजप गेम स्पॉयलर ठरून त्याचा फायदा मनसेला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, सुरू असलेल्या चर्चांवर विश्वास ठेवायचा तर जर भाजपने अँड. आशिष शेलांरांसारखा तगडा उमेदवार दिला तर मात्र सगळंच चित्र पालटू शकतं.
सुभाष देसाईंसाठी भाजपनं गोरगाव सोडावं आणि त्याबदल्यात शिवसेनेनं भाजपला दादर-माहीम द्यावा असंही प्रस्तावित होतंय. तसं झाल्यास इथला शिवसैनिक नाराज होईल मात्र भाजपची सीट लागेल. अर्थात, या केसमध्ये मनसेला भाजपशी लढत देणं लोकभावनेच्या दृष्टीनं थोडं सोपं जाईल. या सगळ्याच्या विपरीत जर थेट आदित्य ठाकरेंनाच शिवसेनेनं इथून उभं केलं तर युती असो किंवा नसो; त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर असेल. ठाकरे घराण्यातला उमेदवार असल्याने मनसेही मग कडवा विरोध करणार नाही. यानंतर राहिली ती काँग्रेस. काँग्रेसची स्थिती रकान्यातला आणखी एक पक्ष इतकीच आहे. माहीम विधानसभा ज्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो तिथून खासदार देणाऱ्या काँग्रेसला या मतदारसंघात कधीच पाय कधीच रोवता आले नाहीत. तेव्हा मतांची टक्केवारी वाढवणं हेच त्यांच्यासाठी मोठं यश असेल.
2014 विधानसभा निवडणूक निकाल:
सदा सरवणकर (शिवसेना) 46,291 नितीन सरदेसाई (मनसे) 40,350 विलास आंबेकर (भाजप) 33,446 प्रवीण नाईक (काँग्रेस) 11,917
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?

व्हिडीओ

Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report
Raj Thackeray Tweet On RSS : राज ठाकरेंचे मोहन भागवतांना पत्र Special Report
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार, आठवणींचा गहिवर Special Report
Chandrapur Mayor Politics : चंद्रपुरात कसं जुळलं ठाकरे आणि भाजपचं सूत? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला
परभणीत काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती,आमचा चांगला समन्वय, काँग्रेस सोबत राहणार: संजय जाधव
Embed widget