एक्स्प्लोर

Ramesh Chennithala: महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'भाजपने त्यांच्या मित्र पक्षांना संपवलं...'

Ramesh Chennithala: मित्रपक्षातील नेत्यांनी एकमेकांना आव्हान दिलं आहे, पक्षांमध्ये मैत्रीपुर्ण लढती होत आहेत, त्या थांबवण्यासाठी महाविकास आघाडी मोठे प्रयत्न करत आहे

Ramesh Chennithala: विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपापल्या नेत्यांनी उमेदवारीसाठी एबी फॉर्म दिले, त्यानंतर अर्ज सादर केलेत. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात प्रमुख लढत मानली जात आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी मित्रपक्षातील नेत्यांनी एकमेकांना आव्हान दिलं आहे, पक्षांमध्ये मैत्रीपुर्ण लढती होत आहेत, त्या थांबवण्यासाठी महाविकास आघाडी मोठे प्रयत्न करत आहे, तर आज काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत नाही असं म्हटलं आहे, तर भरलेले अर्ज ४ तारखेपर्यंत मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

निवडणुकीसाठीची मोठी तयारी सुरू आहे, महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहेत. महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. महायुतीतील पक्षात अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणावर आहेत. महायुती एक विचित्र युती आहे. त्यामध्ये शिवसेना शिंदेंच्या पक्षाच्या जागावरती, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या जागांवरती भाजप आपले उमेदवार देत आहे, त्यांच्या ठिकाणी देखील निवडणूक लढवत आहे. महायुतीचा कोणता प्रवाभ नाही, किंवा त्यांचे अस्तित्व देखील नाही. भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीतून संपवलं आहे. मात्र महाविकास आघाडीत याउलट चित्र असल्याचं काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी म्हटलं आहे. 

महाविकास आघाडीत आम्ही लहान पक्षांना ही सोबत घेतलं आहे. महाविकास आघाडीतील पक्षांना आम्ही एकसारखं मानत आहोत. मात्र, महायुतीमध्ये भाजपने त्यांच्या मित्र पक्षांना संपवलं आहे. महाविकास आघाडीत एकता आहे, कोणतीही महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत होणार नाही, त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले जातील. माझी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, काँग्रेसच्या हायकमांडनी ज्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे, त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही,मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे, त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असं रमेश चेन्निथला यांनी म्हटलं आहे.

मैत्रीपुर्ण लढत नाही

महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित काम करत आहोत. समाजवादी पार्टीसोबत आमची चर्चा सुरू आहे. ⁠नसीम खान यांच्यावर जबाबदारी दिली आहे. ४ तारखेच्या आधी सर्व मतभेद दुर करण्याचे प्रयत्न असतील,, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याच्या जनतेने कौल दिला आहे, त्याप्रमाणे महाविकास आघाडी काम करत आहे. शिंदे सरकार बिनकामाचं आहे, हे जनतेने ओळखले आहे, आत्तापर्यंत घेतलेले निर्णय पुर्ण केलेला नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी आणली. मात्र, त्यांनी आता बंद केली आहे कारण त्यांच्याकडे पैसे नाही. निवडणुक आयोगाच्या माध्यमातून ही योजना बंद केली आहे. मात्र, निवडणूक आयोगाच नाव सांगत आहे. हे फक्त निवडणुकीसाठी घेतलेले निर्णय आहेत. राज्यातील जनतेच्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी काम करेल असंही यावेळी ते म्हणालेत.

महाविकास आघाडीत कोणत्या ठिकाणी मैत्रीपुर्ण लढतीच आव्हान

महाविकास आघाडीमध्ये परांडा मतदारसंघात शरद पवार गटाकडून राहुल मोटे,तर उद्धव ठाकरे गटाकडून रणजित पाटील यांनी अर्ज सादर केले आहेत. 

पंढरपुरात शरद पवार गटाकडून अनिल सावंत, तर कॉंग्रेसकडून भगीरथ भालके यांनी अर्ज सादर केले आहेत. 

दिग्रसमधून कॉंग्रेसकडून माणिकराव ठाकरे, तर ठाकरे गटाकडून पवन जयस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

धारावी मतदारसंघातून कॉंग्रेसकडून ज्योती गायकवाड तर ठाकरे गटाकडून बाबुराव माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

महाविकास आघाडीत इतर लहान घटक पक्षांच्या उमेदवारीनी देखील अर्ज दाखल 

मानखुर्दमधून सपाकडून अबु आझमी तर ठाकरे गटाकडून राजेंद्र वाघमारे यांनी अर्ज केला आहे. 

सोलापुर शहर मध्य मधून कॉंग्रेसकडून चेतन नरोटे, तर मित्रपक्ष असलेल्या माकपकडून नरसय्या आडाम यांनी अर्ज दाखल केला आहे.

सांगोला मतदारसंघातून ठाकरे गटाकडून दिपक साळुंखे, तर मित्र पक्ष असलेल्या शेकापकडून बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी अर्ज देण्यात आला आहे. 

लोहा कंधारमधून ठाकरे गटाकडून एकनाथ पवार, तर शेकापकडून आशा शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget