एक्स्प्लोर

Maharashtra Election Results 2019 : महाराष्ट्रात काँग्रेसचं पतन का झालं?

Maharashtra Election Results 2019 Live : महाराष्ट्रात तर काँग्रेसच्या चिंधड्या झाल्या आहेत. काँग्रेसचं पतन होण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडी.

मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. 542 पैकी जवळपास साडेतीनशे जागांवर आघाडी मिळवत भाजपप्रणित एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर यूपीएचा अक्षरश: सुपडासाफ झाला आहे. महाराष्ट्रात तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंधड्या झाल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला सहाच जागा मिळवता आल्या. त्यापैकी काँग्रेसचा एकच उमेदवार आघाडीवर आहे. राज्यातील 48 जागांपैकी जवळपास 43 जागांवर विजयी आघाडी मिळवत, मागील लोकसभा निवडणुकीतील विक्रमही मागे टाकला आहे. मात्र काँग्रेसच्या या पतनाची कारणं काय आहेत? वंचित बहुजन आघाडी फॅक्टर मात्र राज्यात काँग्रेसचं पतन होण्यामागे वंचित बहुजन आघाडीचा मोठा वाटा असल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे मतांची विभागणी होऊन सर्वाधिक फटका आघाडीच्या विशेषत: काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. सोलापुरात भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी हे आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यापेक्षा सुमारे 83000 मतांनी आघाडीवर आहेत. मात्र त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना सुमारे 93 हजार मतं मिळाली. राज ठाकरेंच्या सभा फोल महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जणू काही आघाडीचे स्टार प्रचारक म्हणूनच काम केलं. राज ठाकरे यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. या सभांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला फायदा होईल तसेच भाजप-शिवसेना युतीची मतं कमी होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला होता. परंतु राज यांनी ज्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या त्यापैकी रायगड, सातारा, बारामती वगळता इतर सर्व उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा झाला नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. राहुल गांधींची न्याय योजना पक्षाच्या योजना जनतेपर्यंत योग्यरित्या न पोहोचवणं हे देखील काँग्रेसचा सुपडासाफ होण्यामागचं प्रमुख कारण आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील 20 टक्के गरीब कुटुंबांना दरवर्षी 72 हजार रुपये देणार, अशी घोषणा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. परंतु काँग्रेसला ही योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यास यश आलं नाही. परिणामी त्याचं उत्तर काँग्रेसला मतांच्या रुपाने पाहायला मिळालं. राष्ट्रवादाला उत्तर नाही पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करुन उत्तर दिलं. भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली. दहशतवादाला उत्तर देण्यासाठी भाजप हाच एकमेव पक्ष असल्याचा दावा करत, राष्ट्रवादाची भावना निर्माण केली. तसंच नवमतदारांनी आपलं पहिलं मत पुलवामातील शहीदांना समर्पित करण्याचं भावनिक आवाहन केलं. परंतु काँग्रेसला या मुद्द्यावरुन भाजपला काऊंटर करता आलं नाही. सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यावरुन काँग्रेसला मोदी सराकारला कोंडीत पकडता आलं नाही. नोटाबंदी, रोजगार, जीएसटीचे मुद्दे नोटाबंदी, रोजगार आणि जीएसटी यांसारखे मुद्दे काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडणुकीचे मुद्दे बनवता आले नाहीत. 2017-18 मध्ये देशातील बेरोजगारी 45 वर्षांच्या उच्चस्तरावर असल्याचा अहवाल एका खासगी संस्थेने दिला होता. पण आघाडीला निवडणुकीत हा मुद्दा प्रभावीपणे मांडता आला नाही. काळापैशांना आळा घालण्यासाठी मोदी सरकारने नोटाबंदी केली. नोटाबंदीमुळे सगळा काळा पैसा बाहेर येईल, असा दावा सरकारने केला. परंतु 99 टक्के नोटा परत आल्या. तसंच जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं, या मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडण्यात आघाडीला जमलं नाही. तसंच शेतकऱ्यांची सरकारवर असलेली नाराजीही आघाडीला कॅश करता आली नाही. मोदींना टक्कर देणारं नेतृत्त्व नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भक्कम पर्याय देण्यात काँग्रेस अपयशी ठरली. भाजपने मोदींना 'लार्जर दॅन लाईफ' असं सादर केलं. देशासाठी मोदी हे एकमेव पर्यय असल्याचा प्रचार केला. परंतु त्याच वेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करता आला नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahuri By Election : राहुरीत प्राजक्त तनपुरे कोणाकडून लढणार, शरद पवारांची राष्ट्रवादी की अपक्ष, मविआत सगळेच इच्छुक
राहुरी पोटनिवडणुकीसाठी मविआकडून कोण लढणार, ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्येही इच्छुक, प्राजक्त तनपुरेंचा सस्पेन्स कायम
पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, वंचितकडून 'राहुरी' विधानसभेसाठी घोषणा, अनिल जाधवांना उमेदवारी
पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, वंचितकडून 'राहुरी' विधानसभेसाठी घोषणा, अनिल जाधवांना उमेदवारी
Baramati Vidhansabha Bypoll: बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाल्या...
बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाल्या...
Baramati and Rahuri By Election: शरद पवार निवडणूक लढणार नाहीत, पण...; बारामती, राहुरीच्या पोटनिवडणुकीवर संजय राऊतांचं मोठं विधान
शरद पवार निवडणूक लढणार नाहीत, पण...; बारामती, राहुरीच्या पोटनिवडणुकीवर संजय राऊतांचं मोठं विधान

व्हिडीओ

Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
Abbas Araghchi: 'उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही'; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा
'उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही'; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा
'होर्मुझ' सुरु करण्यासाठी इराणने ट्रम्पचा 48 तासांचा अल्टिमेटम फेटाळला; म्हणाले, 'तुम्ही हतबल झाल्याने घाबरुन धमक्या देत आहात आम्ही तुमच्यासाठी नरकाचा दरवाजा उघडू'
'होर्मुझ' सुरु करण्यासाठी इराणने ट्रम्पचा 48 तासांचा अल्टिमेटम फेटाळला; म्हणाले, 'तुम्ही हतबल झाल्याने घाबरुन धमक्या देत आहात आम्ही तुमच्यासाठी नरकाचा दरवाजा उघडू'
Ashok Kharat Crime news: आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले, पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का
आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले, पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का
Bhandara News: भंडाऱ्यात 34 कोटींचा रस्ता, पण कंत्राटदाराने सिमेंट वापरलंच नाही, 'फ्लाय ॲश'चा वापर केल्याचा खळबळजनक आरोप
भंडाऱ्यात 34 कोटींचा रस्ता, पण कंत्राटदाराने सिमेंट वापरलंच नाही, 'फ्लाय ॲश'चा वापर केल्याचा खळबळजनक आरोप
Navi Mumbai Crime: काळी जादू करण्यासाठी सांताक्रुझमधील आई अन् मुलीला फार्महाऊसवर नेऊन विवस्त्र व्हायला सांगितलं अन् नको ते केलं, नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा पर्दाफाश
नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा महिलांवर अत्याचार, मध्यरात्री खालापूरच्या फार्म हाऊसवर न्यायचा अन्...
Ashok Kharat Nashik Crime: मोठी बातमी: एसआयटीने चौकशी करुन घरी सोडलं अन् अशोक खरातच्या मुलाने रंग दाखवलेच, हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, पळून गेल्याची शक्यता
मोठी बातमी: एसआयटीने चौकशी करुन घरी सोडलं अन् अशोक खरातच्या मुलाने रंग दाखवलेच, हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, पळून गेल्याची शक्यता
Dharashiv News: भोंगा वाजताच दोन तास टीव्ही, मोबाईल बंद होणार, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात अभ्यासाचा नवा पॅटर्न
भोंगा वाजताच दोन तास टीव्ही, मोबाईल बंद होणार, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात अभ्यासाचा नवा पॅटर्न
Embed widget