एक्स्प्लोर

Maharashtra Election Results 2019 : महाराष्ट्रात काँग्रेसचं पतन का झालं?

Maharashtra Election Results 2019 Live : महाराष्ट्रात तर काँग्रेसच्या चिंधड्या झाल्या आहेत. काँग्रेसचं पतन होण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडी.

मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. 542 पैकी जवळपास साडेतीनशे जागांवर आघाडी मिळवत भाजपप्रणित एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर यूपीएचा अक्षरश: सुपडासाफ झाला आहे. महाराष्ट्रात तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंधड्या झाल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला सहाच जागा मिळवता आल्या. त्यापैकी काँग्रेसचा एकच उमेदवार आघाडीवर आहे. राज्यातील 48 जागांपैकी जवळपास 43 जागांवर विजयी आघाडी मिळवत, मागील लोकसभा निवडणुकीतील विक्रमही मागे टाकला आहे. मात्र काँग्रेसच्या या पतनाची कारणं काय आहेत? वंचित बहुजन आघाडी फॅक्टर मात्र राज्यात काँग्रेसचं पतन होण्यामागे वंचित बहुजन आघाडीचा मोठा वाटा असल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे मतांची विभागणी होऊन सर्वाधिक फटका आघाडीच्या विशेषत: काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. सोलापुरात भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी हे आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यापेक्षा सुमारे 83000 मतांनी आघाडीवर आहेत. मात्र त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना सुमारे 93 हजार मतं मिळाली. राज ठाकरेंच्या सभा फोल महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जणू काही आघाडीचे स्टार प्रचारक म्हणूनच काम केलं. राज ठाकरे यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. या सभांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला फायदा होईल तसेच भाजप-शिवसेना युतीची मतं कमी होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला होता. परंतु राज यांनी ज्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या त्यापैकी रायगड, सातारा, बारामती वगळता इतर सर्व उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा झाला नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. राहुल गांधींची न्याय योजना पक्षाच्या योजना जनतेपर्यंत योग्यरित्या न पोहोचवणं हे देखील काँग्रेसचा सुपडासाफ होण्यामागचं प्रमुख कारण आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील 20 टक्के गरीब कुटुंबांना दरवर्षी 72 हजार रुपये देणार, अशी घोषणा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. परंतु काँग्रेसला ही योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यास यश आलं नाही. परिणामी त्याचं उत्तर काँग्रेसला मतांच्या रुपाने पाहायला मिळालं. राष्ट्रवादाला उत्तर नाही पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करुन उत्तर दिलं. भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली. दहशतवादाला उत्तर देण्यासाठी भाजप हाच एकमेव पक्ष असल्याचा दावा करत, राष्ट्रवादाची भावना निर्माण केली. तसंच नवमतदारांनी आपलं पहिलं मत पुलवामातील शहीदांना समर्पित करण्याचं भावनिक आवाहन केलं. परंतु काँग्रेसला या मुद्द्यावरुन भाजपला काऊंटर करता आलं नाही. सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यावरुन काँग्रेसला मोदी सराकारला कोंडीत पकडता आलं नाही. नोटाबंदी, रोजगार, जीएसटीचे मुद्दे नोटाबंदी, रोजगार आणि जीएसटी यांसारखे मुद्दे काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडणुकीचे मुद्दे बनवता आले नाहीत. 2017-18 मध्ये देशातील बेरोजगारी 45 वर्षांच्या उच्चस्तरावर असल्याचा अहवाल एका खासगी संस्थेने दिला होता. पण आघाडीला निवडणुकीत हा मुद्दा प्रभावीपणे मांडता आला नाही. काळापैशांना आळा घालण्यासाठी मोदी सरकारने नोटाबंदी केली. नोटाबंदीमुळे सगळा काळा पैसा बाहेर येईल, असा दावा सरकारने केला. परंतु 99 टक्के नोटा परत आल्या. तसंच जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं, या मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडण्यात आघाडीला जमलं नाही. तसंच शेतकऱ्यांची सरकारवर असलेली नाराजीही आघाडीला कॅश करता आली नाही. मोदींना टक्कर देणारं नेतृत्त्व नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भक्कम पर्याय देण्यात काँग्रेस अपयशी ठरली. भाजपने मोदींना 'लार्जर दॅन लाईफ' असं सादर केलं. देशासाठी मोदी हे एकमेव पर्यय असल्याचा प्रचार केला. परंतु त्याच वेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करता आला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Eknath Shinde Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO
सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
Pune Crime News: पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
RBI : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
Embed widget