एक्स्प्लोर

Election Result : मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण भाजपच्या विजयाचे धुरंधर शिल्पकार, दोघांकडेही विरोधी पक्षांना जोखण्याचे कसब, भाजपचे पत्रक जारी

Maharashtra Elections Result : महापालिका विजयानंतर भाजपकडून एक पत्रक काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विजयाचं श्रेय देण्यात आलं आहे. 

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक यशामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रभावी रणनीती निर्णायक ठरली आहे. ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या प्रचाराला राज्यातील जनतेने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद निकालांतून स्पष्टपणे दिसून आला आहे असं भाजपने त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या अजेंड्याला शहरी मतदारांनी भरघोस पाठिंबा दिला. त्याचवेळी शहरी मतदारांची अचूक नस ओळखत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या विचारधारेसोबत राहण्याच्या आवाहनाला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही निकालांवरून स्पष्ट झाले आहे असं पत्रकात म्हटलं आहे.

जानेवारी महिन्यात भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी राज्यभरात दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण केले होते. त्याचवेळी त्यांनी संघटनात्मक पातळीवर अर्धी लढाई जिंकली होती, हे आजच्या दणदणीत विजयातून अधोरेखित झाले आहे.

भाजप हा धोरण आखणारा आणि ते प्रभावीपणे अंमलात आणणारा पक्ष आहे. निवडणूक नियोजन, उमेदवार निवड, प्रचारसभा तसेच विरोधकांची रणनीती अचूकपणे ओळखण्याचे कसब ‘देवेंद्र–रविंद्र’ या जोडीने दाखवून दिले. सरकार आणि भाजप प्रदेश संघटना यांच्यातील समन्वयामुळेच हा अभूतपूर्व विजय मिळाल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

प्रदेशाध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांनी पक्षासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्पष्ट केली आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा, मातीशी जोडलेला कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला संघर्षातून घडलेला अध्यक्ष लाभला आहे. निवडणूक काळात झालेल्या वैयक्तिक टीकेने ते कधीही विचलित झाले नाहीत. उलट, विरोधकांना अनावश्यक विषयांत गुंतवून ठेवत भाजपाचा विजय अधिक सुकर केल्याचे या निकालांतून स्पष्ट झाले.

25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत प्रत्येक टीकेनंतर अधिक ताकदीने पुढे जाणारे नेतृत्व म्हणून रविंद्र चव्हाण यांची ओळख आज अधोरेखित झाली आहे. संघर्षातून घडलेला, मुरलेला आणि दूरदृष्टी असलेला नेता म्हणून त्यांचा उदय या विजयातून स्पष्टपणे दिसून आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविंद्र चव्हाण यांच्या संघटनात्मक ताकदीची आणि 24 तास पक्षासाठी समर्पित कार्यशैलीची पूर्ण जाणीव आहे. शहरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव, कायम ‘इलेक्शन रेडीनेस’ असलेली कार्यपद्धती आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून संपूर्ण राज्यात उभे केलेले कार्यकर्त्यांचे जाळे हे भाजपासाठी निर्णायक ठरले आहे.

आजच्या भाजपाच्या दैदिप्यमान विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अष्टपैलू नेतृत्व जितके महत्त्वाचे ठरले, तितकाच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा नियोजनाचा व्यापक आवाका महाराष्ट्राच्या लक्षात येत आहे. संपूर्ण विजयाची आकडेवारी समोर आल्यानंतर या यशाची व्याप्ती आणखी ठळकपणे स्पष्ट होणार आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप,  उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप,  उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ओढले ताशेरे, राष्ट्रवादीच्या सदस्यांचा जामीन मंजूर
सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ओढले ताशेरे, राष्ट्रवादीच्या सदस्यांचा जामीन मंजूर
ECI : निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का, विरोधी पक्षांचं जोरदार टीकास्त्र,निवडणूक आयोगाकडून एकाचं निलंबन, नेमकं काय घडलं?
निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का, विरोधी पक्षांचं जोरदार टीकास्त्र, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : खरातच्या हमाममध्ये सगळेच नग्न, कुणा-कुणाची नावं घेणार, एसआयटीने नावं जाहीर करावीत
Eknath Khadse Jalgaon : महार वतनाच्या जमीन हडपल्याचा आरोप, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report
Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Crime: महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
Gokul Election : गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
Mumbai Crime news: वडिलांसोबतच्या भांडणाचा राग चिमुरड्यावर काढला, रिक्षातून बाहेर काढून जोरात जमिनीवर आपटलं, रक्ताची उलटी, वसईत हादरवणारी घटना
वडिलांसोबतच्या भांडणाचा राग चिमुरड्यावर काढला, रिक्षातून बाहेर काढून जोरात जमिनीवर आपटलं, रक्ताची उलटी, वसईत हादरवणारी घटना
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
Embed widget