एक्स्प्लोर

Sharad Pawar : मोदींनी लोकसभेला 16 ठिकाणी सभा घेतल्या 13 ठिकाणी पराभव झाला, देशातील जनतेनं संविधान बदलाचा डाव ओळखला : शरद पवार

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सत्ता ज्यांच्याकडे त्यांच्याकडे राहू नये, असं म्हटलं.

छत्रपती संभाजीनगर :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंगापूरमध्ये प्रचारसभेला संबोधित केलं. गंगापूरमध्ये शरद पवार यांनी सतिश चव्हाण यांच्या प्रचारासाठी सभा घेतली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संविधान बदलण्याचा डाव देशातील नागरिकांनी ओळखल्याचं ते म्हणाले. राज्यातील मतदारांनी इतिहास केला त्यामुळं मोदी चारशे पार जाऊ शकले नाहीत, असं शरद पवार म्हणाले. 

लोकसभेची निवडणूक पाच सहा महिन्यांपूर्वी झाली. देशात चित्र वेगळं होतं. नरेंद्र मोदी सांगत होते कमीत कमी चारशे जागा द्या, त्यांचे सहकारी चारशे जागा मागत होते, ते राजस्थानचे असो उत्तर प्रदेशचे असो, कर्नाटकचे असो, भाजपच्यावतीनं मत मागायला जनतेपुढं जात होते त्यांची मागणी चारशेची होती. चारशेचा आकडा यासाठी देशाची घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली होती. त्यात बदल करण्याचा डाव मोदी आणि भाजपचा होता. मोदींचं धोरण देशाच्या हिताचं नाही हे लक्षात आल्यावर ठिकठिकाणी त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला. मोदी महाराष्ट्रात 16 ठिकाणी आले त्यातील 13 ठिकाणी त्यांचा पराभव झाला. महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 1 जागा आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या. कालच्या निवडणुकीत भाजपचा संविधान बदलाचा डाव राज्यातील नागरिकांनी ओळखला आणि मविआचे 31 खासदार निवडून देत इतिहास निर्माण केला. त्यामुळं मोदींना 400 जागा मिळू शकल्या नाहीत, त्यामुळं घटनेत बदल करु शकले नाहीत, असं शरद पवार म्हणाले. 

शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे, सोयाबीन, ऊस, ज्वारी याच्या किंमती घसरल्या आहेत. जे जे बळीराजा पिकवतो त्याच्या किंमती मोदींच्या राजवटीत कमी झाल्या आहेत. लोकसभेची निवडणूक संपली आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आली आहे. आमचा प्रयत्न आहे काही झालं तरी ज्यांच्या हातात आज महाराष्ट्राची सत्ता आहे पुन्हा त्यांच्या हातात राहू नये, असं शरद पवार म्हणाले. 

शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांकडे सत्ता द्यायची नाही : शरद पवार

गेल्या नऊ महिन्यांमध्ये 950 शेतकऱ्यांनी महाराष्ट्र मध्ये आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्या का करत आहेत. शेतकऱ्यांनी घाम गाळला, खर्च केला पण त्याच्या उत्पादनातून खर्च निघत नाही,  तो कर्जबाजारी होतो, घरादाराचा लिलाव होतो, समाजात अप्रतिष्ठा होतो, त्यामुळं शेतकरी टोकाचं पाऊल उचलतात, असं शरद पवार म्हणाले.   मी कृषी मंत्री असतांना यवतमाळ येथे शेतकरी आत्महत्या झाली, अशी माहिती मिळाली. यानंतर अस्वस्थ झालो, त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कानावर गोष्ट घातली. ते आणि मी दिल्लीवरुन नागपूरला आलो, तिथून त्याच्या घरी गेलो. तिथं त्या शेतकऱ्याची पत्नी ढसाढसा रडत होती, तिचे अश्रू थांबत नव्हते. कपाशीचं पीक घेतलं होतं, खतं औषध घातली पण पिकावर रोग आला अन् पीक उद्धवस्त झालं अन् काढलेलं कर्ज तसंच राहिलं, दुसऱ्या वर्षी तिच स्थिती राहिली, यातून नवरा कर्जबाजारी झाला. सावकारांनी आणि बँकांनी लिलाव काढल्यानंतर ती गोष्ट सहन झाली नाही, त्यामुळं त्या शेतकऱ्यानं जीवन संपवलं अशी माहिती त्याच्या पत्नीनं दिली, असं शरद पवार म्हणाले. शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही दिल्लीत जाऊन निकाल घेतला. देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज आम्ही माफ करुन टाकलं, शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढलं, आज तशाच निर्णयाची आवश्यकता आहे, असं शरद पवार म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या हातात सत्ता द्यायची नाही हा निकाल घ्यावा लागेल, असं शरद पवार म्हणाले.  भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घेतली पाहिजे, खोटी आश्वासन देणे हेच यांचे उद्योग आहेत त्यांच्या हाती सत्ता द्यायची नाही हा निकाल घ्यावा लागेल, असं शरद पवार म्हणाले. सतिश चव्हाण यांना विजयी करा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं. 

इतर बातम्या : 

गेल्यावेळीच दिपक आबांना तिकीट देणार होतो, पण, मध्येच धरण फोडणारा खेडका घुसला, उद्धव ठाकरेंचा तानाजी सावंतांवर हल्लाबोल

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार

व्हिडीओ

Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Meenakshi Shinde : 'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
Vishwas Abaji Patil: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ
Tara Sutaria Veer Paharia Breakup: कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडिओ भारी पडला, तारा अन् वीर पहारियानं घेतला नातं संपवण्याचा निर्णय? ब्रेकअपच्या चर्चांनी चाहतेही शॉक
कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडिओ भारी पडला, तारा अन् वीर पहारियानं घेतला नातं संपवण्याचा निर्णय? ब्रेकअपच्या चर्चांनी चाहतेही शॉक
Embed widget