एक्स्प्लोर

Sanjay Raut : राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!

Sanjay Raut on Raj Thackeray : राज ठाकरे हे गेली 25 वर्ष भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट वाचत आहेत. कधी नारायण राणेंची स्क्रिप्ट वाचतात, तर कधी एकनाथ शिंदेंना दिलेली स्क्रिप्ट वाचतात, असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.  शिवसेनेतील खरे गद्दार उद्धव ठाकरे आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचा खास्ट सासू असा उल्लेख केला होता. आता यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंवर पलटवार केलाय.

संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे हे गेली 25 वर्ष भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट वाचत आहेत. कधी नारायण राणेंची स्क्रिप्ट वाचतात, तर कधी एकनाथ शिंदेंना दिलेली स्क्रिप्ट वाचतात. त्यांना गांभीर्याने देण्याची गरज नाही. त्यांनी स्वतः शिवसेना पक्ष सोडलेला आहे. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या दुश्मनांना मदत होईल, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना फार गांभीर्याने घेत नाही, असा पलटवार त्यांनी केला आहे.  उद्धव ठाकरे यांच्यामुळे नारायण राणे, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली, असेही राज ठाकरे म्हणाले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यामुळे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदा आमदारकी मिळाली आणि मंत्री पदं मिळत गेली हे राज ठाकरे यांना माहीत नसावे. 

राणेंना तुम्ही मिठ्या मारत नाही का?

उद्धव ठाकरे नारायण राणे एकनाथ शिंदे राज ठाकरे यांचा द्वेष करतात पण ज्यांनी बाळासाहेबांना सर्वाधिक त्रास दिला त्या छगन भुजबळ यांना मात्र त्यांनी घरी जेवायला बोलावले, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. यावर संजय राऊत म्हणाले की, ते छगन भुजबळ यांना बोलवत नाही का? एकनाथ शिंदे यांना तुम्ही जेवायला बोलवत नाही का? राणेंना तुम्ही मिठ्या मारत नाही का? त्यांनी पक्ष सोडला. आमच्यावर एवढा अत्याचार झाला तरी आम्ही पक्ष  सोडला का? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आहोत. राज ठाकरे यांचा एक चष्मा आहे, त्या चष्म्याच्या नजरेतून ते पाहतात. पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ राज ठाकरे यांना शिवसेना पक्ष सोडून झाला आहे. त्यानंतर आमचा पक्ष फार पुढे गेला. राज ठाकरे सातत्याने निवडणूक लढवत आहेत आणि हरत आहेत. 2024 च्या निवडणुकीत आमच्याकडे पक्ष नाही, आमच्याकडे चिन्ह नाही, तरीसुद्धा आम्ही लाखो मत घेऊन नऊ खासदार निवडून आणले हे राज ठाकरे विसरत असल्याचा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.  जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

राज ठाकरेंनी आत्मचिंतन करावे 

महाराष्ट्राचा राजकीय चिखल झाला त्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचे राज ठाकरे म्हटले. यावर संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या म्हणण्याला काही किंमत आहे का? अमित शाह, मोदी, फडणवीस या महाराष्ट्राच्या दुश्मनांना जे म्हणायचं आहे ते राज ठाकरे म्हणत आहेत. तुम्हाला लोक सुपारीबाज म्हणतात. तुम्ही आत्मचिंतन करायला हवे. आमचे एकेकाळी ते मित्र होते. आम्हाला वाईट वाटत आहे. मी त्यांच्यासोबत एकेकाळी खांद्याला खांदा लावून काम केले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

आणखी वाचा 

Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीची पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार, सुनील तटकरे म्हणाले निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राहुल गांधींनांही भेटू
बारामतीची पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार, सुनील तटकरे म्हणाले निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राहुल गांधींनांही भेटू
Rahuri By Election : राहुरीत प्राजक्त तनपुरे कोणाकडून लढणार, शरद पवारांची राष्ट्रवादी की अपक्ष, मविआत सगळेच इच्छुक
राहुरी पोटनिवडणुकीसाठी मविआकडून कोण लढणार, ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्येही इच्छुक, प्राजक्त तनपुरेंचा सस्पेन्स कायम
पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, वंचितकडून 'राहुरी' विधानसभेसाठी घोषणा, अनिल जाधवांना उमेदवारी
पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, वंचितकडून 'राहुरी' विधानसभेसाठी घोषणा, अनिल जाधवांना उमेदवारी
Baramati Vidhansabha Bypoll: बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाल्या...
बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाल्या...

व्हिडीओ

Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार
Sanjay Raut PC : भाजप इतर निवडणुका लढतात, मतं फोडतात मग या पोटनिवडणुका बिनविरोध का?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Rickshaw License : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
Embed widget