एक्स्प्लोर

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, पुन्हा राम मंदिर निर्मितीचं आश्वासन

जाहीरनाम्याचा तसेच निवडणूक प्रचाराचा केंद्रबिंदू हा मध्यमवर्गीय असेल असं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी जाहीर केलं आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकासाठीचा आपला जाहीरनामा भाजपने प्रसिद्ध केला आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्याला 'संकल्पपत्र' म्हटलं आहे. संकल्पपत्रातील महत्त्वाची बाब म्हणजे राम मंदिर निर्मितीचं पुन्हा एकदा भाजपने आश्वासन दिलं आहे.

लोकसभा निवडणुकासाठीचा आपला जाहीरनामा भाजपने प्रसिद्ध केला आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्याला संकल्पपत्र म्हटलं आहे. संकल्पपत्रातील महत्त्वाची बाब म्हणजे राम मंदिर निर्मितीचं पुन्हा एकदा भाजपने आश्वासन दिलं आहे. भाजपच संकल्पपत्र 2024 साठी आहे. पण स्वातंत्र्याला 75 वर्षपूर्ती निमित्त 2002 पर्यंत ही आश्वासनं पूर्ण करण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

देशाला प्रगतीपथावर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. 'वन मिशन, वन डायरेक्शन' आम्ही पुढे जाणार आहोत. देशात अनेक भागात पाण्याची समस्या गंभीर आहे. याबाबत ठोस पाऊल उचलण्याच गरज आहे. यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करणार असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.

VIDEO | संकल्पपत्रातून नवा भारत साकारण्याचा प्रयत्न, राजनाथ सिंह यांचं भाषण | नवी दिल्ली | एबीपी माझा

पाच वर्षात भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली : अमित शाह

भाजपच्या संकल्पपत्रात सरकारच्या मागील पाच वर्षातील यशस्वी कामगिरीची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. परदेशात भारताच्या कार्याच्या डंका वाजला, राष्ट्रीय सुरक्षा भक्कम झाली, अशी माहिती भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिली.

2014 मध्ये आम्ही पुढील 5 वर्षांच व्हिजन ठेवलं होतं. ज्यावर देशातील जनतेने विश्वास ठेवला आणि आम्हाला निवडून दिलं. संपूर्ण बहुमत असतानाही आम्ही एनडीएचं सरकार स्थापन केलं आणि देशात अनेक विकासकामे केली. या पाच वर्षाच सरकारने अनेक ऐतिहासिक कामे केली. ही पाच वर्ष भविष्यात विकासासाठी ओळखली जातील.

एनडीए सरकारचा 2014 ते 2019 चा कार्यकाळ भविष्यात सुवर्ण अक्षरांत लिहिली जाईल. भाजप सरकारने देशातील अस्थिर वातावरण संपवलं. आज देश महाशक्ती म्हणून समोर येत आहे. 2014 साली भारताची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर होती, जी आज सहाव्या क्रमाकांवर आहे.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत वीज पोहोचवण्याच प्रयत्न भाजप सरकारने केला. 7 कोटी गरीबांच्या घरात गॅस कनेक्शन पोहचलं आहे. तर 8 कोटींहून अधिक शौचालयांची निर्मिती या पाच वर्षात झाली आहे, अशी माहिती अमित शाहांनी दिली.

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाचे मुद्दे

  • संकल्पपत्रात राम मंदिराच्या निर्मितीचा पुररुच्चार
  • 75 वैद्यकीय महाविद्यालय, विद्यापीठ स्थापन करणार
  • व्यवस्थापन, अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील जागा वाढवणार
  • 2022 पर्यंत देशातील सर्व रेल्वे लाईनचं विद्युतीकरण करणार
  • छोट्या दुकानदारांना पेन्शची योजना
  • दहशतवाद मिटवण्यासाठी कठोर भूमिका घेतली जाईल
  • सुक्ष्म, लघु आणि मध्यमांसाठी 1 लाख कोटींच्या क्रेडिट गॅरंटीची योजना
  • कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी 25 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार
  • शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
  • शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देणार, तसेच 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेंशनची सुविधा देणार
  • 1 लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावर 5 वर्षांपर्यंत व्याज नाही
  • तीन तलाकविरोधात कायदा आणून मुस्लिम महिलांना न्याय देणार
  • सिटीजनशिप विधेयक लागू करणार
  • प्रत्येक घरात वीज, शौचालय पोहोचवण्यातं लक्ष्य
  • 50 शहरांमध्ये मेट्रोचं नेटवर्क मजबूत करणार
  • पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार
  • सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी 1 लाख कोटी रुपये
  • पाच किमी अंतरात बँकिंग सुविधा पुरवण्याचं उद्दिष्ट
VIDEO | संकल्पपत्रातून नवा भारत साकारण्याचा प्रयत्न, राजनाथ सिंह यांचं भाषण | नवी दिल्ली | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

Vidyanand Bapat: भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर
Pulwama Case NIA: पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat: भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर
Pulwama Case NIA: पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
Vidyanand Bapat: मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv News: महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
India Belgium Defence Deal: ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
Embed widget