एक्स्प्लोर

Jharkhand Election 2024: भाजप झारखंडमध्ये 69 जागा लढवण्याची शक्यता, फॉर्म्युला अंतिम टप्प्यात, नितीशकुमार,चिराग पासवान यांना किती जागा देणार? 

Jharkhand Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगानं झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. एनडीएमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आहे.  

Jharkhand election 2024 रांची : केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांमधील घडामोडी वाढल्या आहेत. झारखंडमध्ये सध्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेससह मित्र पक्षांच्या आघाडीचं सरकार आहे. झारखंडमध्ये भाजप विरोधी पक्षात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जागा वाटपावर चर्चा करण्यात येत आहेत. झारखंडमधील एनडीएचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती आहे.

भाजपचा मित्र पक्षांसह झारखंडची विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहे. या राज्यात त्यांच्यासोबत जदयू, लोक जनशक्ती पार्टी रामविलास आणि आजसू हे पक्ष आहेत. या पक्षांसोबत भाजपच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत. जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.   

भाजप 69 जागा लढवण्याची शक्यता

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप 69 जागांवर निवडणूक लढवेल. जदयूला 2 जागा, आजसूला 9 जागा मिळतील. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी रामविलास पार्टीला एक जागा मिळू शकते. मित्र पक्षांची अजून काही जागा मिळण्यासंदर्भात मागणी आहे. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.  एनडीएच्या घटकपक्षांच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरं गेल्यास गेल्या निवडणुकीपेक्षा चांगलं यश मिळेल आणि सरकार स्थापनेची संधी मिळेल, असं एनडीएतील पक्षांना वाटत आहे. 

भाजपकडून पहिली यादी लवकरच

निवडणूक आयोगानं 15 ऑक्टोबर रोजी  निवडणूक जाहीर केली आहे. भाजपची केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठका देखील झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीला कुणाला उमेदवारी द्यायची यासंदर्भात भाजप नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. भाजप येत्या काही दिवसांमध्ये पहिली यादी जाहीर करेल. त्यानंतर एनडीएतील मित्रपक्ष त्यांचे उमेदवार जाहीर करतील.

झारखंडमध्ये 2019 ला काय घडलेलं?

2019 च्या विधानसभा निवडणुकीत  झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचं सरकार आलं होतं. झारखंड मुक्ती मोर्चानं 30 जागा जिंकल्या होत्या.काँग्रेसनं 16 जागा जिंकल्या होत्या. भाजपनं 25 जागा जिंकल्या होत्या. हेमंत सोरेन यांच्यासमोर राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्याचं आव्हान असेल. तर, दुसरीकडे भाजप देखील सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.  झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांना तुरुंगात जावं लागलं होतं. त्या काळात चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. तर, हेमंत सोरेन जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री बनले. चंपई सोरेन यांनी त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला.

इतर बातम्या :

छोट्या झारखंडमध्ये दोन टप्प्यात तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक का? निवडणूक आयुक्तांनी एका वाक्यातच सांगितलं

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
Embed widget