एक्स्प्लोर

साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरु नका : जयंत पाटील

Jayant Patil : सेनेची स्थापना झाली तेव्हा माझे नेते पवार साहेबांनी कट्ट्यावर बसून भाषण ऐकलं होतं. मुंबईसाठी बाळासाहेब किती महत्त्वाचे होते हे त्यांना माहिती होतं, असं जयंत पाटील म्हणाले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवाजी पार्कवरील ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेला संबोधित केलं.  उद्धव ठाकरेजी तुम्ही उशिरा आलात पण आक्रमक आणि मुद्देसूद भाषण आदित्य ठाकरेंचं मी ऐकलं, मुंबईची नस, मुंबईला काय पाहिजे, मुंबईला काय हवंय याची ओळ नं ओळं आदित्य ठाकरेंना माहिती आहे. उद्धवजी मुंबईची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे देऊन तुम्ही महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं, असं जयंत पाटील म्हणाले. 

आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दामुळं मुंबई मराठी माणसाची ही भावना देशभर पसरली. ते होते या मुंबईत मराठी माणूस स्वाभिमानानं ठामपणे उभा राहिला हे महाराष्ट्रात कोणी विसरता कामा नये. आजच्या मंचावरील पोस्टर पाहून आनंद होतोय की भावकी एक झाली आहे. मुंबईत फिरलो लोकांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा लोकांना आनंद झाला आहे. शिवतीर्थ भरलेय पण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील माणूस बघतोय याचा राजकारणावर काय परिणाम होणार हे पाहतोय.  तुम्ही दोघं एकत्र आलात यासाठी शरद पवार यांच्यावतीनं अभिनंदन करतो. पवारसाहेब येणार होते पण त्यांना जमलं नाही, त्यांनी मला यायला सांगितलं, असं जयंत पाटील म्हणाले. 

आम्ही नेहमी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण टीव्हीवर पाहायचो. तेच मैदान आहे, तिच शिवसेना आहे, मात्र शत्रू वेगळा आहे. काही गद्दार आहेत, तर काही दिल्लीतील सत्तेचे गुलाम आहेत. मला खात्री आहे की मुंबईकर या सगळ्यांना खड्यासारखं बाजूला ठेवल्याशिवाय राहणार नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. 

19 जून 1966 ला या शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापना झाली, त्याच वेळी माझे नेते शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण इथल्याच एका कट्ट्यावर बसून ऐकलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्त्व मुंबईसाठी आवश्यक आहे ही भावना शरद पवार यांनी राज्यभर बाळगली आहे. हे मैदान आपल्या अभिमानाचं हे मैदान आहे. शरद पवार यांनी याच मैदानावरुन पक्षाची स्थापना केली होती, असं जयंत पाटील म्हणाले.

साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरु नका, अशा अनेक गोष्टी आहेत. कालपरवा अण्णा मलाई येऊन गेले काय बोलले,त्यांची भूमिका अशी आहे की मुंबई ही महाराष्ट्राची नाहीये. मुंबई पुन्हा तोडण्याचा डाव सुरु झालेला दिसतोय, त्यामुळं आपण सावध व्हायला पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले.  

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीची पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार, सुनील तटकरे म्हणाले निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राहुल गांधींनांही भेटू
बारामतीची पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार, सुनील तटकरे म्हणाले निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राहुल गांधींनांही भेटू
Rahuri By Election : राहुरीत प्राजक्त तनपुरे कोणाकडून लढणार, शरद पवारांची राष्ट्रवादी की अपक्ष, मविआत सगळेच इच्छुक
राहुरी पोटनिवडणुकीसाठी मविआकडून कोण लढणार, ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्येही इच्छुक, प्राजक्त तनपुरेंचा सस्पेन्स कायम
पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, वंचितकडून 'राहुरी' विधानसभेसाठी घोषणा, अनिल जाधवांना उमेदवारी
पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, वंचितकडून 'राहुरी' विधानसभेसाठी घोषणा, अनिल जाधवांना उमेदवारी
Baramati Vidhansabha Bypoll: बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाल्या...
बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाल्या...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ashok Kharat CDR : दमानियांकडे खरातचा सीडीआर, विरोधकांचा प्रहार Special Report
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jain Muni Nileshchandra On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता जैन मुनी निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
Baramati Byelection 2026 Congress: बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरेंनाच का निवडलं? ही आहेत कारणं
बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरेंनाच का निवडलं? ही आहेत कारणं
Akola Crime: धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
Embed widget