एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

भाजप-शिवसेना युतीसाठी चर्चेत असणारे हेच ते 5 जागावाटप फॉर्म्युले!

उद्या (२४ सप्टें.) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यात युतीची घोषणा आणि जागावाटपही जाहीर होऊ शकतं. मात्र, त्यापूर्वी सध्या विविध माध्यमातून या दोन्ही पक्षांनी चर्चेत आणलेले जागा वाटप फॉर्म्युले बघणंही इंटरेस्टिंग आहे.

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आलीये, काँग्रेस-राष्ट्रवादीचं जागावटपही जाहीर झालं. मात्र, भाजप-शिवसेनेचं जागावाटप तर सोडाच पण युती तरी होणार का? इथपर्यंत संदिग्धता आहे. हे कमी म्हणून की काय परवा नाशकात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुंबईत आलेले भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेला मारलेले टोले-टोमणे यामुळे भाजपचा मूड वेगळाच असल्याचंही बोललं जातंय. 'सगळं कसं समसमान हवं' असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कितीही वाटत असलं तरी, केंद्रात मोदी व भाजपची वाढलेली ताकद, विरोधी पक्षातल्या बड्या नेत्यांचं झालेलं इनकमिंग आणि २०१४मधला भाजपचा महाराष्ट्रातला स्ट्राईक रेट पाहता भाजप ५०-५० वर कधीच तयार होणार नाही असं दिसतंय. त्यातूनच सध्या भाजप-सेनेदरम्यान जागापाटपाचे अनेक फॉर्म्युले पुढे येतायत. फॉर्म्युला 1 भाजप-  135 शिवसेना- 135 मित्रपक्ष- 18 ---------------------------- फॉर्म्युला 2 भाजप- 171 शिवसेना- 117 मित्रपक्ष- भाजपच्या कोट्यातून  -------------------------------- फॉर्म्युला 3 भाजप- 162 शिवसेना- 126 मित्रपक्ष- भाजपच्या कोट्यातून ------------------------------------ फॉर्म्युला 4 भाजप- 150 शिवसेना-120 मित्रपक्ष- 18 ------------------------------------- फॉर्म्युला 5 भाजप- 145 शिवसेना-125 मित्रपक्ष- 18 --------------------------------------- वरील सर्व फॉर्म्युल्यांमध्ये शिवसेनेला १२० जागांपुढे किती जागा मिळू शकतील, हा प्रश्नच आहे. भाजपचा प्रभाव एकवेळ बाजूला ठेवून बघितलं, तरी २०१४ला शिवसेनेला स्वतंत्र लढूनही 63 जागाच मिळवता आल्या होत्या. तर, भाजपनं मात्र शंभरीपार १२२ आमदार जिंकवून आणले. त्यामुळे शिवसेनेला जास्तीच्या जागा मागताना या 'स्ट्राईक रेट'चा विचार करावा लागणार आहे. जागावाटप कसंही झालं तरी काहीप्रमाणात नुकसान भाजपलाच सोसावं लागणार आहे. उदाहरणार्थ, पुण्यात सर्वच्या सर्व आमदारकीच्या ८ जागा भाजपकडे आहेत. तिथं जागा सोडणं म्हणजे स्टॅंडिग आमदार गमावणं होय. असंच नुकसान भाजपला राज्यभर सोसावं लागणार आहे. जागावाटपात भाजपच्या वाट्याला जास्त डोकेदुखी आहे. कारण, मुळात २०१४ जिंकलेल्या जागांवरील प्रस्थापिताविरूद्ध भाजपमधील अन्य इच्छुक, त्यांच्या जोडीला त्याच भागात आतापर्यंत विरोधी पक्षात असलेले भाजपमध्ये आल्यानं त्यांची महत्वाकांक्षा आणि यानंतर युती होऊन जागावाटप झालंच तर बंडखोरीची शक्यता. शिवसेनेलाही काही जागा अशाचप्रकारे गमवाव्या लागणार असल्या तरी भाजपचा तोटा मोठा असू शकतो. एकीकडे, जिथे २०१४ला दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेल्या जागा भाजप मागत असताना, स्वत:च्या जिंकलेल्या जागा देणं कठीण गोष्ट ठरणार आहे. दुसरीकडे, महायुतीतले मित्रपक्ष हे खरं सांगायचं तर भाजपचे मित्रपक्ष आहेत. चर्चा तर अशीही आहे की महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्ष, रामदास आठवलेंच्या आरपीआय, सदाभाऊ खोतांना 'कमळ' चिन्हावरच लढण्यासं सांगितलं जाऊ शकतं. तेव्हा, त्यांना जागा सोडणं हे मूलत: भाजपच्याच हिताचं असेल हे सेनेलाही कळतंय. त्याचवेळी, केंद्रात ३००पार जागांसह पुन्हा आलेलं मोदी सरकार, महाराष्ट्रात भाजपमध्ये झालेलं दिग्गज विरोधी पक्षांचं इनकमिंग आणि त्यामुळे आपोआपच त्यांच्या स्थानिक सत्तांचं भाजपकरण होणं (उदा. नवी मुंबई महापालिका) यामुळे भाजप आता 'धाकट्या भाऊ' होण्याच्या मुळीच मूडमध्ये नाही. किंबहुना, गेली पाच वर्ष शिवसेनेनं सत्तेत राहून विरोधच फार केल्यानं, सध्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहणाऱ्या सेनेच्या महत्वाकांक्षेला फार खतपाणी भाजप घालेल अशी स्थिती नाही. शिवसेना तीच्या राजकीय प्रवासातल्या अत्यंत वेगळ्या कालखंडातून जात आहे. एक काळ होता जेव्हा सत्ता नसूनही भाजपच्या तुलनेत शिवसेनेचा प्रभाव मोठा होता. मात्र, २०१४पासून सत्तेत असूनही शिवसेना धाकटी होऊ लागली आहे. सेना नेते खा. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना-भाजप हे जुळे भाऊ असल्याचं केलेलं वक्तव्यं यामुळेच महत्वाचं आहे. राऊतांपासून रावतेंपर्यंत समान जागावाटप, शिवसेनेचा मुख्यमंत्री यासंदर्भात विधानं केली गेली. यानंतर आता व्यावहारिक भूमिका घ्यावी लागल्यास ती शिवसैनिकांना पटवून द्यावी लागणार आहे. एकूणच, अंतिम जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला १२० ते १३०पेक्षा जास्त जागा येणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मात्र, असं झाल्यास 'समसमान'ची ठाम भूमिका, आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद यावर आग्रही असणाऱ्या शिवसेनेची महायुतीअंतर्गत आणि सरकार आल्यास तिथंही अडचण होईल, हे उघड आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींचा दारुण पराभव, राहुल गांधींचा धोक्याचा इशारा, म्हणाले...
पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींचा दारुण पराभव, राहुल गांधींचा धोक्याचा इशारा, म्हणाले...
Who is Kalita Maji : दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करणारी महिला थेट आमदार बनली, विधानसभेत पोहोचली!
दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करणारी महिला थेट आमदार बनली, विधानसभेत पोहोचली!
West Bengal Election Result 2026: ज्या भाजपला पश्चिम बंगालमध्ये पहिली सीट जिंकवून दिली त्यांनीच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला हद्दपार केलं, धक्कादायक आकडेवारी समोर
ज्या भाजपला पश्चिम बंगालमध्ये पहिली सीट जिंकवून दिली त्यांनीच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला हद्दपार केलं, धक्कादायक आकडेवारी समोर
Sanjay Raut: 'मोदींच्या पतनाला सुरुवात, दिवा विझताना वात मोठी होते'; संजय राऊतांचा 'हिंदुत्वाच्या शास्त्रा'चा दाखला देत हल्लाबोल!
'मोदींच्या पतनाला सुरुवात, दिवा विझताना वात मोठी होते'; संजय राऊतांचा 'हिंदुत्वाच्या शास्त्रा'चा दाखला देत हल्लाबोल!

व्हिडीओ

West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी
Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur : पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
DA Hike News: बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
DA Hike News: बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
Pune Crime Nasrapur Case: नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात, स्कॉर्पिओची धडक; भीषण अपघातात 4 ठार 4 जखमी
अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात, स्कॉर्पिओची धडक; भीषण अपघातात 4 ठार 4 जखमी
8 लग्न पचवले, नवव्या लग्नात तरुणीचे बिंग फुटले; बीडमध्ये नवऱ्या मुलाकडून लाखो लुटणाऱ्या नवरीसह एजंटाला बेड्या
8 लग्न पचवले, नवव्या लग्नात तरुणीचे बिंग फुटले; बीडमध्ये नवऱ्या मुलाकडून लाखो लुटणाऱ्या नवरीसह एजंटाला बेड्या
Bird flu in Maharashtra: महाराष्ट्रात बर्ड फ्लूची भीती, 'या' जिल्ह्यात 8 दिवसांत 2 लाख कोंबड्या मारल्या, पशुखाद्य जमिनीत गाडलं
महाराष्ट्रात बर्ड फ्लूची भीती, 'या' जिल्ह्यात 8 दिवसांत 2 लाख कोंबड्या मारल्या, पशुखाद्य जमिनीत गाडलं
Embed widget