एक्स्प्लोर

Election : राज्यात लवकरच निवडणुकीचं बिगुल वाजणार, कधी आणि कशा होतील निवडणुका?

राज्यात निवडणुकांचे वेध लागले आहेत. पण कोणत्या महापालिका आणि जिल्हा परिषदा आहेत? या निवडणुका कशा आणि कधी होऊ शकतात? सर्वच निवडणुका एकत्र होणार आहेत का?

मुंबई : घोषणाबाजी, राजकीय सभा, नेत्यांचे आरोप प्रत्यारोप यासगळ्यांनी महाराष्ट्र निवडणुकांच्या रंगात रंगून जाणार आहे. ओबीसी आरक्षण आणि कोरोनामुळे रखडलेल्या निवडणुका लवकरच होणाची शक्यता आहे, तशी तयारी आता निवडणुक आयोग करत आहे. राज्यातील अनेक महापालिकांच्या मुदत संपल्या आहेत. या महापालिकांच्या मुदत संपल्याने त्या ठिकाणी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. या महापालिकांची मुदत संपल्याने तिथे तातडीने निवडणुका घेण्याची गरज आहे. त्यात आता ओबीसी आरक्षण प्रकरणी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला 15 दिवसांत निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे.

एकूण 14 महापालिका 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणं बाकी आहेत. दोन वर्षानंतर एकत्र आलेल्या निवडणुका एकाच वेळी घेणं सोपं नाही. त्यामुळे या सर्व निवडणुका दोन टप्प्यात घेण्याची तयारी निवडणूक आयोग करत असल्याची माहिती आहे. 

- राज्यातील नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, मुंबई आणि ठाणे या महापालिकांची मुदत संपली आहे.

- पहिल्या टप्प्यात ज्या महापालिकांना सहा महिने किंवा एक वर्ष झालं आहे त्यांची निवडणूक घेतली जाणार आहे.

- नुकत्याच मुदत संपलेल्या महापालिकांची निवडणुक दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. 

- औरंगाबाद, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर या महापालिकांची मुदत 2020 मध्येच संपली आहे. 

- मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी -चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर या महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ 2022 मार्च महिन्यात संपला आहे.

- 2022 मार्च महिन्यात ज्या महापालिका ची मुदत संपलेली आहे त्याठिकाणी देखील आता दोन चार महिने उलटून गेले आहेत.

17 मे रोजी प्रभागरचना जाहीर होणार असून त्यानंतर आरक्षण सोडत काढली जाईल. आरक्षण सोडतीनंतर हरकती आणि सूचना तसेच 33 प्रभागांसाठी तयार केलेल्या विभाजित मतदारयाद्यांची प्रसिद्धी व त्यावर हरकती व सूचनांचा कार्यक्रम जाहीर होईल. या सर्व प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता दाट आहे. त्यात पावसाचे दिवस येत आहे, त्यामुळे निवडणुका एक तर पावसात किंवा पावसाळ्यानंतर होऊ शकतात. 

या निवडणुकांवर अनेकांची राजकीय नेत्याचं भवितव्य ठरणार आहे. विधानसभेआधी होत असलेल्या या निवडणुकांकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज आहेत आणि निवडणुकांची वाटही पाहत आहेत.

2019 नंतर महाराष्ट्रातलं बरंच राजकारण बदललं आहे. अनेक नेते जेल, पोलीस स्टेशनची वारी करत आहेत. मनसे आणि भाजप राज्यात आक्रमक भूमिका घेत आहेत तर महाविकास आघाडी देखील तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देऊन हल्ले परतवून लावत आहेत. महापालिकांमध्ये युती आघाडीचे धर्म पाळतील की नाही माहित नाही पण या निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष एकमेकांवर तुटून पडणार आहेत एवढं नक्की.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Banerjee In High Court: हार मानतील त्या ममता बॅनर्जी कसल्या? दारुण पराभवानंतर अवघ्या 10व्या दिवशीच वकिली पोशाखात थेट हायकोर्टात पोहोचल्या अन्..
हार मानतील त्या ममता बॅनर्जी कसल्या? दारुण पराभवानंतर अवघ्या 10व्या दिवशीच वकिली पोशाखात थेट हायकोर्टात पोहोचल्या अन्..
Kerala New CM: व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली, निकालानंतर 10 दिवसांनी काँग्रेसकडून घोषणा
व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली, निकालानंतर 10 दिवसांनी काँग्रेसकडून घोषणा
तमिळनाडू सीएम विजय यांची राजकीय कुंडली सांगणाऱ्या अन् शपथविधीचा मुहूर्तही बदलणाऱ्या ज्योतिषाची कुंडली सत्ता येताच बिघडली! अवघ्या काही तासात निर्णय मागे घेण्याची नामुष्की
तमिळनाडू सीएम विजय यांची राजकीय कुंडली सांगणाऱ्या अन् शपथविधीचा मुहूर्तही बदलणाऱ्या ज्योतिषाची कुंडली सत्ता येताच बिघडली! अवघ्या काही तासात निर्णय मागे घेण्याची नामुष्की
Thalapathy Vijay: तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!

व्हिडीओ

NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'फडणवीस कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर..' राजू शेट्टींचा कडाडून हल्लाबोल
'फडणवीस कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर..' राजू शेट्टींचा कडाडून हल्लाबोल
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
Pune Accident News: पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
Dharmendra Pradhan on NEET Exam: 'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
Chennai Super Kings: आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
Devendra Fadnavis and PM Modi: मोदीजींनी आपल्याला फार मोठा त्याग करायला सांगितलेला नाही, त्यावरुन आपली देशभक्ती सिद्ध होईल: देवेंद्र फडणवीस
मोदीजींनी आपल्याला फार मोठा त्याग करायला सांगितलेला नाही, त्यावरुन आपली देशभक्ती सिद्ध होईल: देवेंद्र फडणवीस
Embed widget