एक्स्प्लोर

महापालिका निवडणूक : अहमदनगरमध्ये मतदानाला सुरुवात, शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ल्याने तणाव

सागर थोरात असं या शिवसेना कार्यकर्त्याचं नाव आहे. वॉर्ड क्रमांक 12 मधील सागरवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, हा हल्ला भारतीय जनता पार्टीच्या कार्याकर्त्यांनी केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.

अहमदनगर : राज्यभराचे लक्ष लागून असलेल्या अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्यामुळे गालबोट लागले आहे. त्यामुळे  शहरात कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरु आहे. अहमदनगर महापालिकेच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. सागर थोरात असं या शिवसेना कार्यकर्त्याचं नाव आहे. वॉर्ड क्रमांक 12 मधील सागरवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, हा हल्ला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. मात्र या प्रकरणामागे भाजपचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी केलाय. भारतीय जनता पार्टीला जनता निवडून देणार असल्याने शिवसेनेच्या पायाखालची जमीन घसरल्याने शिवसेना असे आरोप करत असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. ऐन निवडणुकीच्या मतदानाआधी ही घटना घडल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत चुरस

अहमदनगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये 351 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. या निवडणुकीत 2 लाख 56 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी एकूण 73 इमारतींमध्ये 337 मतदान केंद्र असून त्यातील 41 मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील आणि 137 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. 1 पोलीस अधीक्षक, 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 6 पोलीस उपअधीक्षकांसह 2 हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून 2 हजार निवडणूक कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी करत एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तर शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणिकीच्या रिंगणात उतरले आहेत. भारतीय जनता पार्टीने सर्वच्या सर्व म्हणजे 68 जागांवर आपले उमेदवार दिले आहे. विशेष म्हणजे यात 35 महिला उमेदवार भाजपने दिल्या आहेत. तर शिवसेनेने 61 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादीने 46 तर कॉंग्रेसने 21 उमेदवार या निवडणुकीसाठी मैदानात उतरवले आहेत. अहमदनगर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचा पहिला महापौर झाला होता. विशेष म्हणजे आजपर्यंत कुठल्याही पक्षाने 5 वर्षे महापालिकेवर सत्ता केलेली नाही. अडीच वर्षाच्या टर्मनंतर महापौरपदाची निवडणूक घेण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपचे खासदार दिलीप गांधी आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि कॉंग्रेसचे युवा नेते सुजय विखे यांनी या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे कधीही महानगरपालिकेत महापौर पद न मिळवलेल्या भाजपला एकहाती सत्ता मिळणार की राष्ट्रवादी आणि शिवसेना आपला झेंडा रोवणार हे पाहावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील धुसफूस संपता संपेना! भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार, हाॅटेलवरच्या बैठकीत काय काय ठरलं?
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील धुसफूस संपता संपेना! भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार, हाॅटेलवरच्या बैठकीत काय काय ठरलं?
Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा

व्हिडीओ

Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Disha Salian Case: आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
'मोहम्मद शमीचा भाऊ नवऱ्यासारखा माझ्यासोबत राहत होता, आयपीएलमध्ये निवड होताच..' FIR करणारी महिला काय काय म्हणाली?
'मोहम्मद शमीचा भाऊ नवऱ्यासारखा माझ्यासोबत राहत होता, आयपीएलमध्ये निवड होताच..' FIR करणारी महिला काय काय म्हणाली?
Dattatray Bharne Farmers: कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
Embed widget