एक्स्प्लोर

दिंडोरी लोकसभा यंदा भाजपसाठी जड जाणार? राष्ट्रवादीचेही तगडे आव्हान

गेल्या तीन निवडणूकांपासून दिंडोरी मतदार संघ भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांच्या ताब्यात राहिला आहे. परंतु यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी जड जाणार असे चित्र सध्या मतदार संघात पाहायला मिळत आहे. तसेच ही जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी सुरु आहे.

नाशिक : आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणात असलेला दिंडोरी मतदार संघ पुर्वी मालेगाव मतदार संघ म्हणून ओळखला जात होता. या मतदार संघात पूर्वी कॉंग्रेस आणि जनता दलाचा बोलबाला राहिलेला आहे. परंतु गेल्या तीन निवडणूकांपासून हा मतदार संघ भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांच्या ताब्यात राहिला आहे. 2004 मध्ये या मतदार संघातून मालेगाव वगळण्यात येऊन तो दिंडोरी मतदार संघ म्हणून ओळखला जाऊ लागला. या मतदार संघात एकुण 15 लाख दोन हजार 35 मतदार आहेत.या मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात. यात दिंडोरी, कळवण-सुरगाणा, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड या मतदार संघाचा समावेश असून येथे माकपचा 1, भाजपाचा 1, शिवसेनेचा 1 आणि राष्ट्रवादीचे तीन आमदार निवडून आले आहेत. 2014 चा निकाल 2014 च्या लोकसभा निवडणूकीत हरिश्चंद्र चव्हाण यांना 5,42,784 मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादीकडून अनपेक्षितपणे डॉ.भारती पवार उमेदवारी मिळाली होती. भारती पवार यांना 2,95,165 तर माकपच्या हेमंत वाकचौरे यांना 72,599, बसपाच्या शरद माळी यांना 17,724 आणि आम आदमी पक्षाच्या ज्ञानेश्वरी माळी यांना 4,067 मतं मिळाली होती. गेल्या तीन निवडणूकांत सतत निवडून येणारे हरिश्चंद्र चव्हाण हे पुर्वी राष्ट्रवादीमध्ये होते. त्यांनी भाजपत प्रवेश केला आणि लोकसभेत निवडून गेले, नाशिक जिल्हयात शिवसेनेची बऱ्यापैक ताकद असल्याने त्याचं नेहमी चव्हाण यांना पाठबळ मिळालं आहे. शिवाय पुर्वी राष्ट्रवादीत असल्याने त्याचा फायदा त्यांना सतत होत राहिला. तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी मतदार संघात फारशी काम केली नसल्याने मतदार सांगतात. त्यामुळे मतदार त्यांच्यांवर नाराज होते आणि आत्ताही आहेत. परंतु 2014 च्या निवडणुकीवेळी त्यांना मोदी लाटेचा फायदा झाला, त्यामुळे ते निवडून आले. दिंडोरी मतदार संघ आदिवासीबहुल असल्याने येथील आदिवासींचा महत्वाचा वनजमिनीचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न, कांद्याचा प्रश्न प्रश्न अद्याप सुटू शकले नाहीत. चव्हाण मतदार संघातील सर्वात मोठे शहर असलेल्या मनमाड परिसरात एकही मोठा प्रकल्प आणू शकले नाहीत. तसेच बेरोजगारीचा प्रश्नदेखील सोडवू शकलेले नाहीत. त्यामुळे सध्य परिस्थितीला मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. चव्हाण यांचा मतदारसंघात दांडगा संपर्क आहे. सर्वच पक्षात असलेल्या नेत्यांशी मित्रत्वाचे संबंध असल्याने त्याचा फायदा त्यांना सतत होत आलेला आहे. त्यातच आदिवासी भागात त्यांच्यासारखा प्रबळ उमेदवार अन्यपक्षात नसल्याने त्याचाही प्रभाव मतदारांमध्ये पडत असल्याने निश्चितच त्याचा फायदा त्यांना होत आलेला आहे. या निवडणुकीतील संभाव्य उमेदवार 2019 च्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीने भाजपाकडून हा मतदार संघ आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार देण्यासाठी त्यांनी दिंडोरीचे शिवसेनेचे माजी आमदार धनंजय महाले यांना आपल्या गळाला लावले आहे. त्यामुळे मागील निवडणूकीत चव्हाण यांच्या विरोधात लढलेल्या डॉ.भारती पवार यांना पुन्हा निवडणूकीची उमेदवारी मिळणार की धनंजय महाले यांना याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर माकपाचे आमदार जीवा पांडू गावीत यांनी आदिवासी प्रश्नावर मागील वर्षी नाशिक ते मुंबई लॉंग मार्च काढल्याने त्या बळावर गावित यंदा खासदारकीची निवडणूक लढविण्यास इच्छूक असल्याचे बोलले जात असल्याने यंदाची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. हरिश्चंद्र चव्हाण यांची तीन टर्म मधील कामगिरी फारशी उठावदार झाली नसल्याने भाजपकडून नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या नावाची चर्चा होत असली तरी चव्हाणांचा संपर्क पाहता त्यांनाच भाजप पुन्हा उमेदवारी देणार का? याकडे सर्वांच लक्ष लागून आहे. सध्य परिस्थितीला जिल्हा परिषद, मनमाड, नांदगाव, निफाड तसेच अनेक ग्रामपंचायती या शिवसेनेकडे आहेत. त्या तुलनेत भाजपची चांदवड मतदार संघ वगळता फारशी ताकद नसल्याने, सेना-भाजपा युती झाल्यास त्याचा मोठा फायदा भाजप उमेदवाराला होईल. एकंदरीतच हरिश्चंद्र चव्हाण यांच्याबद्दल असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसणार की पुन्हा सलग चौथ्यांदा ते निवडून येणार हे लवकरच स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या

England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
Harshvardhan Sapkal: दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले
जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले
Embed widget