एक्स्प्लोर

काँग्रेसचा जाहीरनामा; शेतकरी, तरुण, गरिबांना राहुल गांधींची पाच मोठी आश्वासनं

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याला 'जन आवाज' हे नाव दिलं आहे. आम्ही आमच्या पक्षाचं 'हात' हे चिन्ह लक्षात घेऊन पाच मोठ्या आश्वासनाचा जाहीरनाम्यास समावेश केल्याचं राहुल गांधींनी सांगितलं.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. 'हम निभाएंगे' या आश्वासनासह काँग्रेसने किमान उत्पन्न योजना, रोजगार आणि शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पसह पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत. दिल्लीतील कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाचा जाहीरनामा घोषित करताना, सत्तेत आल्यास देशातील 20 टक्के गरिबांसाठी 'न्यूनतम आय योजना' अर्थात 'न्याय' सुरु करण्याचं वचन दिलं आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याला 'जन आवाज' हे नाव दिलं आहे. आम्ही आमच्या पक्षाचं 'हात' हे चिन्ह लक्षात घेऊन पाच मोठ्या आश्वासनाचा जाहीरनाम्यास समावेश केल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. LIVE : 'गरिबीवर वार,72 हजार'; काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध राहुल गांधी यांची पाच मोठी आश्वासनं 1. प्रत्येक वर्षी 20 टक्के गरिबांच्या खात्यात 72,000 रुपये जमा करणार. काँग्रेसने या योजनेसाठी 'गरीबी पर वार, हर साल 72 हजार' चा नारा दिला आहे. 2. 22 लाख सरकारी नोकऱ्यांचं आश्वासन काँग्रेसने दिलं आहे. 10 लाख लोकांना ग्रामपंचायतींमध्ये रोजगार देण्याचं वचन दिलं आहे. 3 वर्षांपर्यंत तरुणांना व्यवसायासाठी कोणच्याही परवानगीची गरज नाही. 3. मनरेगा योजनेत कामाचे दिवस 100 दिवसांनी वाढवून 150 दिवस करण्याचं आश्वासन काँग्रेसने दिलं आहे. 4. सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याची घोषणा काँग्रेसने केली. 5. जीडीपीचा 6 टक्के भाग शिक्षण क्षेत्रावर खर्च केला जाईल. विद्यापीठं, आयआयटी, आयआयएमसह महत्त्वाच्या संस्थांमध्ये गरिबांना सहजरित्या पोहोचता येईल, यासाठी प्रयत्न करणार वेगळेपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे एसीत बसून नाही तर 121 ठिकाणांना भेट देऊन, लोकांच्या भावना, गरजा समजून घेऊन जाहीरनामा तयार केल्याचा दावा काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे *गरिबीवर वार कसा?*
  • दरवर्षी 72 हजार रुपये गरिबांच्या खात्यात जमा
  • शेतीसाठी वेगळा अर्थसंकल्प
  • शेतकऱ्यांनी कर्ज न फेडल्यास फौजदारी नाही तर दिवाणी गुन्हा
  सुशिक्षित मध्यमवर्गीयांसाठी
  • मार्च 2020 पर्यंत 22 लाख सरकारी जागांची भरती
  • 10 लाख तरुणांना ग्राम पंचायतीमध्ये नोकरी
  • उद्योगधंदा सुरु करण्यासाठी 3 वर्षापर्यंत परवानगीची गरज नसेल
  • GDP च्या सहा टक्के पैसा शिक्षणासाठी
  • राष्ट्रीय सुरक्षेबाबत काँग्रेस कोणतीही तडजोड करणार नाही
टीका
  • एकीकडे मूलभूत मुद्द्यांवर भर देण्याचा दावा कऱणारी काँग्रेस देशद्रोहाच्या गुन्ह्याचं कलम रद्द करणार तसंच लष्कराला विशेषाधिकार देणाऱ्या अफस्फा कायद्यात सुधारणा करणार या आश्वासनामुळे टीकेचं लक्ष्य ठरलीय
  • काँग्रेसचा जाहीरनामा देश तोडणारा असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनी केला आहे.
  •  सत्तेत येण्याची खात्री नसल्यानेच काँग्रेस आर्थिक तरतूदींचा विचार न करताच भलीमोठी आश्वासनं देत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
  • कुटुंबाला किमान 72 हजार देणे म्हणजे काही लाख कोटी लागतील. ते आणणार कुठून? त्यासाठी कर वाढवणे म्हणजे पुन्हा आर्थिक प्रगतीत खिळ घालणं,असंही मानलं जातं. त्यामुळे निधी मिळवणे सोपे नसणार.
काँग्रेसचा बचाव
  • देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात ते विद्यार्थी, आंदोलकांवरच. त्यामुळे ते रद्द झाल्याने फार फरक पडणार नाही.
  • आर्थिक तरतुदींचा विचार करुनच आश्वासने देण्यात आली आहेत. काँग्रेसमधील सुत्रांच्या माहितीनुसार रिझर्व्ह माजी गव्हर्नर रघुनाथ राजन त्याबाबतीत महत्वाची भूमिका पार पाडू शकतात.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election 2026 Sharad Pawar: राज्यसभा निवडणुकीचा सस्पेन्स कायम, शरद पवारांचे मौन; उमेदवारीचा चेंडू मविआच्या कोर्टात टाकला, नेमकी कुणाला संधी मिळणार?
राज्यसभा निवडणुकीचा सस्पेन्स कायम, शरद पवारांचे मौन; उमेदवारीचा चेंडू मविआच्या कोर्टात टाकला, नेमकी कुणाला संधी मिळणार?
Vidhan parishard Leader : राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेत विरोधी पक्षनेता निवडणार? भाजपची मोठी खेळी, दानवेंच्या जागी 'या' काँग्रेस नेत्याच्या नावाची चर्चा
राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेत विरोधी पक्षनेता निवडणार? भाजपची मोठी खेळी, दानवेंच्या जागी 'या' काँग्रेस नेत्याच्या नावाची चर्चा
Rajya Sabha Election 2026: राज्यसभेची जागा शिवसेनेला सोडण्यासाठी आदित्य ठाकरेंचा आग्रह, शशिकांत शिंदे म्हणाले, 'शरद पवारांचं नाव पुढे आल्यावर...'
राज्यसभेची जागा शिवसेनेला सोडण्यासाठी आदित्य ठाकरेंचा आग्रह, शशिकांत शिंदे म्हणाले, 'शरद पवारांचं नाव पुढे आल्यावर...'
Ajit Pawar and Sunetra Pawar Baramati: अजितदादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार, बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
अजितदादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार, बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

व्हिडीओ

Nagpur 12 Exam : नागपूरच्या वैशाली नगरच्या सक्सेस क्लासच्या पेपरफुटी प्रकरणात सहभाग
Sunetra Pawar PC Video : बोलून झाल्यावर उठा, पीसीपूर्वी काय काय घडलं?
Rohit Pawar on Raj Thackeray : राज म्हणाले दादा असो व इतर कुणी मराठी माणसाला न्याय देऊ
Raj Thackeray on Rohit Pawar : दादांचा अपघात कसा झाला हे अजून महराष्ट्राला समजलेलं नाही
Atideb Sarkar Speech : आयडियाज ऑफ इंडियामध्ये एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक अतिदेब सरकार यांचं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! पंकजा मुंडेंना नडला IAS अधिकारी, देवेंद्र सिंगांचं थेट निलंबन; अधिवेशन काळात मुंबईत कारवाई
मोठी बातमी! पंकजा मुंडेंना नडला IAS अधिकारी, देवेंद्र सिंगांचं थेट निलंबन; अधिवेशन काळात मुंबईत कारवाई
मोठी बातमी! शिखर बँक घोटाळाप्रकरणी क्लोजर रिपोर्ट स्वीकारला, अजित पवारांसह 70 जणांना क्लीनचीट
मोठी बातमी! शिखर बँक घोटाळाप्रकरणी क्लोजर रिपोर्ट स्वीकारला, अजित पवारांसह 70 जणांना क्लीनचीट
मनसेचा आगळावेगळा मराठी भाषा गौरव दिन; भैय्यांना शिकवली बाराखडी, देशपांडेंचा हटके टी-शर्ट
मनसेचा आगळावेगळा मराठी भाषा गौरव दिन; भैय्यांना शिकवली बाराखडी, देशपांडेंचा हटके टी-शर्ट
Video: विमान अपघातावर तुम्हाला शंका वाटते का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, रोहित पवारांच्या भूमिकेवरही बोलले
Video: विमान अपघातावर तुम्हाला शंका वाटते का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, रोहित पवारांच्या भूमिकेवरही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणबाबत पटेल, तटकरेंना माहिती होती,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा, अजितदादांसोबतच्या बैठकीचा दाखला दिला  
अजितदादा म्हणालेले एक आमदार सोडून सर्वजण मी सांगेल तिथं सही करतील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची माहिती
Arvind Kejriwal: दिल्लीत निवडणूक घ्या, भाजपच्या 10 पेक्षा अधिक जागा आल्यास राजकारण सोडेन, अरविंद केजरीवालांचं मोदींना चॅलेंज
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, अरविंद केजरीवालांची मागणी, दिल्लीत निवडणूक घेण्याचं चॅलेंज
Satej Patil on Sugar Factory Crisis: बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
Embed widget