एक्स्प्लोर

Ravindra Chavan : संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांवर गोळीबार करणारे काँग्रेसचेच राज्यकर्ते, ठाकरे गटाला सोयीस्कर विसर; रवींद्र चव्हाणांची टीका

Ravindra Chavan On Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं आणि वर्तमानात पाहावं असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाकरे बंधूंना लगावला.

मुंबई : संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानावर गोळीबार करण्याचं पाप काँग्रेसचंच आहे, हे इतिहासात नोंदलेलं सत्य असूनही ठाकरे गट जाणीवपूर्वक त्याकडे डोळेझाक करत आहे, अशी घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली. महापालिका निवडणूक प्रचाराच्या सांगतेवेळी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रवींद्र चव्हाण म्हणाले की, 16 जानेवारी 1956 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. या आंदोलनावर गोळीबार करणारे सरकार हे राज्यातही आणि केंद्रातही काँग्रेसचंच होतं, हा सोयीस्कर विसर ठाकरेंना पडतो, असा आरोप त्यांनी केला.

या घटनांतूनच प्रेरणा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी’ शिवसेनेची स्थापना केली, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र आज ठाकरे गट काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून मराठीचा कैवार घेत आहे, ही मोठी विसंगती असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणाले.

'काँग्रेससोबत सत्तास्थापन म्हणजे हुतात्म्यांचा अपमान'

काँग्रेसच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन करून 105 हुतात्म्यांचा अपमान केला. केवळ स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करताना मराठी अस्मितेचा सोयीस्कर विसर पडला, हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे, असा हल्लाबोल रवींद्र चव्हाण यांनी केला.

कोकण रेल्वे आणि विकासाचा मुद्दा

1990 च्या दशकात कोकण रेल्वे सुरू झाली ती काँग्रेसमुळे नव्हे, तर मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यांमुळे. 2014 नंतर मात्र भाजप सरकारच्या काळात कोकण रेल्वेवरील स्थानकं सुसज्ज झाली आणि परिसराचा कायापालट झाला. काँग्रेसने कोकणासाठी काहीच केलं नाही, असा आरोपही रवींद्र चव्हाण यांनी केला.

मराठीचा कैवार आणि वास्तव

ठाकरेंची सेना आणि मनसे हे इतरांपेक्षा जास्त मराठीचे कैवारी कसे, असा सवाल उपस्थित करताना चव्हाण म्हणाले की, अमराठी भाषिक भाजपात मराठीद्वेषातून येत नाही, तर इतर पक्षांमध्ये नेतृत्व, विचारधारा आणि भवितव्य मर्यादित असल्यामुळे भाजपात येतो, हे वास्तव आहे.

भाजपाचे मराठीसाठी ठोस काम

भाजपाने मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणसासाठी ठोस काम केलं आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हे फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं.

BDD चाळ पुनर्विकास

मुंबईतील BDD चाळींमधील मराठी बांधवांना हक्काचं घर मिळालं, ते केवळ देवेंद्र फडणवीस सरकारच्या पुढाकारामुळेच शक्य झालं. निवडणुका आल्या की ठाकरेंना मराठी माणूस आठवतो, अन्यथा पाच वर्षे मराठी हा शब्दही विसरलेला असतो, अशी टीका रवींद्र चव्हाण यांनी केली.

‘मी मराठी’ ते ‘मी मुंबईकर’, ओळख पुसण्याचा आरोप

मी मराठी” ही ओळख बदलून “मी मुंबईकर” ही संकल्पना कोणी लादली, आणि मुंबईची मराठी ओळख पुसण्याचं पातक कोणी केलं, याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावं, असं आव्हान रवींद्र चव्हाण यांनी दिलं. भावनांचे बुडबुडे नव्हे तर प्रत्यक्ष काम महत्त्वाचं असतं, आणि ते काम फक्त भाजपाने करून दाखवलं आहे असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget