एक्स्प्लोर

Prashant Kishor : प्रशांत किशोर राजकारण सोडणार? बिहार निकालानंतर व्हिडीओ व्हायरल

Bihar Election Result 2025 : प्रशांत किशोर यांच्या जन सुराजने या निवडणुकीत 243 पैकी 238 सीटांवर उमेदवार दिले होते. मात्र त्यांच्या पक्षाला खातंही खोलता आलं नाही.

पाटणा : बिहार निवडणुकीमध्ये एनडीएने दोनशेच्या वर जागा जिंकल्यानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनणार अशी चर्चा सुरू झाली आहे. नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेड (JDU) पक्षाला जवळपास 84 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर आता प्रशात किशोर राजकारण सोडणार का असा प्रश्न विचारला जात आहे. त्याला कारणीभूत आहे ते म्हणजे प्रशांत किशोर (Prashant Kishor)यांचे निवडणुकीपूर्वीचे एक वक्तव्य.

बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेड (JDU) चांगली कामगिरी करत 83 जागांवर आघाडीवर आहे. जेडीयूच्या या मोठ्या यशानंतर जन सुराज चे संस्थापक आणि रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचा एक जुना विधान सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

'जर नितीश कुमार यांच्या पक्षाला 25 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारण सोडून देईन' असं वक्तव्य प्रशांत किशोर यांनी केलं होतं. जुलै 2025 मध्ये प्रशांत किशोर यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

Prashant Kishor Jan Suraaj Party : जन सुराजचा निराशाजनक परफॉर्मन्स

प्रशांत किशोर यांच्या जन सुराजने या निवडणुकीत 243 पैकी 238 सीटांवर उमेदवार दिले होते. मात्र त्यांच्या पक्षाला खातंही खोलता आलं नाही. प्रशांत किशोर यांचे 116 उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तर 122 उमेदवार तिसऱ्याखालील क्रमांकावर राहिले.

प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला 15 लाख इतकी मतं पडली असून त्याचे प्रमाण हे 3 टक्के इतकं आहे. त्यांच्या पक्षाच्या 32 उमेदवारांनी 10 हजाराहून जास्त मतं घेतली आहेत. ज्या प्रमाणात जन सुराजने राज्यभर प्रचार केला, त्यापेक्षा खूपच कमी मत मिळाल्याने पक्षाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Jan Suraaj Party Performance : काही जागांवर जन सुराजचे ‘कटिंग’ मत निर्णायक

जन सुराजचा थेट विजय कुठेही झाला नसला तरी काही मतदारसंघांमध्ये त्यांच्या मतांचा थेट परिणाम प्रमुख पक्षांवर झाला. त्याचा जास्त परिणाम हा राष्ट्रीय जनत दलवर झाला. तर जेडीएस आणि भाजपचेही काही उमेदवार मागे पडले.

जेडीयूच्या मोठ्या यशामुळे प्रशांत किशोरांचा ' नितीश कुमार यांना 25 जागांपेक्षा जास्त मिळाल्या तर राजकारण सोडेन' हा दावा पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान, जन सुराजची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूपच निराशाजनक राहिल्याने पक्षाच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget