एक्स्प्लोर

बदनापूर विधानसभा मतदारसंघ : युतीतली धुसफूस आघाडी आणि वंचीतसाठी फायद्याची ठरणार का?

जालना जिल्ह्यातील बदनापूर हा एक राखीव मतदारसंघ, सध्या भाजपचे नारायण कुचे या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. तसा शिवसेनेचा बऱ्यापैकी प्रभाव असला तरी प्रस्थापितांच्या विरोधात कौल देणं हा या मतदारसंघाचा स्वभाव आहे. अपवाद फक्त शिवसेनेचा, शिवसेना आमदार नारायण चव्हाण सलग तीनवेळा इथून निवडून गेले आहेत.

बदनापूर मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर, म्हणजेच 2009 साली मतदारसंघाच्या भौगोलीक क्षेत्रात बदल होऊन, त्यामध्ये अंबड शहर आणि तालुक्यातील मोठा भाग समाविष्ट झाला. जालना, भोकरदन, जाफराबाद आणि अंबड या चार तालुक्यातील गावांचा समावेश असेलला हा मतदारसंघ आहे.  मतदारसंघात शेती व्यवसायाशीच निगडित असलेला मोठा मतदार आहे. 2009 साली झालेल्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला.
या मतदारसंघाच्या इतिहासात अनेकदा प्रस्थापितांच्या विरोधात मतदान झाल्याचा इतिहास आहे. 1972 मध्ये तत्कालीन काँग्रेसचे वजनदार नेते भगवंतराव गाढे यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार बाजीराव चव्हाण पाटील निवडून आले होते. 1978 मध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून उभे राहिलेले तत्कालीन आमदार बाजीराव चव्हाण यांचा इंदिरा काँग्रेसचे शंकरराव वाकुळणीकर यांनी पराभव केला. तर 1980 मध्ये या मतदारसंघातून इंदिरा काँग्रेसच्या शकुंतला शर्मा निवडून आल्या. त्यानंतर 1985 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करून समाजवादी काँग्रेसकडून आप्पासाहेब चव्हाण निवडून आले. त्यानंतर 1990,1995 आणि 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नारायण चव्हाण सलग निवडून आले.  2004 मध्ये शिवसेनेने नारायण चव्हाण यांना डावलून भानुदास घुगे यांना उमेदवारी दिली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अरविंद चव्हाण यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. 2009 साली हा मतदार संघ आरक्षित झाला आणि शिवसेनेचे उमेदवार संतोष सांबरे हे निवडून आले. 2014 मध्ये शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यामध्ये शिवसेनेचे संतोष सांबरे यांचा पराभव करून निवडणुकीच्या केवळ महिनाभर अगोदर प्रचाराला लागलेले भाजपचे नारायण कुचे निवडून आले.
2014 च्या विधासभा निवडणूक उमेदवारांना मिळालेली मते नारायण कुचे (भाजप) - 73,560 बबलू चौधरी (राष्ट्रवादी) - 50,065 संतोष सांबरे (शिवसेना) - 30,945
2019 लोकसभा बदनापूर मतदारसंघातील मताधिक्य
रावसाहेब दानवे - (भाजप) -1,22818 विलास औताडे - (काँग्रेस) - 60,027
जिल्ह्यात भाजपकडे एक केंद्रीय राज्यमंत्रीपद आणि एक राज्याचे कॅबिनेट मंत्रीपद आहे तर शिवसेनेकडेही एक राज्यमंत्रीपद आहे. बदनापूर पंचायत समिती आणि बदनापूर नगरपंचायत भाजपच्या ताब्यात आहे. त्याशिवाय या मतदारसंघात येणारी अंबड नगरपरिषद ही भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे या मतदारसंघावर सध्या भाजप आणि शिवसेनेचं वर्चस्व आहे.
त्यातुलनेत या मतदारसंघात काँग्रेसची ताकद कमी आहे. 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराला जेमतेम 7 टक्के मते पडली होती आणि काँग्रेस उमेदवार चौथ्या क्रमांकावर होता.
या मतदारसंघावर, शिवसेना दावा सांगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून सध्या बबलू चौधरी यांच्या नावाची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत 50 हजार मते घेऊन ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. तर शिवसेनेचे संतोष सांबरे यांची अनामत रक्कम जप्त होऊन ते या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर ढकलले गेले. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीची भूमिका या मतदारसंघात महत्वाची ठरणार आहे. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक वर्षे काम केलेले सुदाम सदाशिवे यांनी अलीकडे वंचित बहुजनमध्ये प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीकडून या मतदारसंघातील उमेदवारीसाठी ते इच्छुक आहेत. या बरोबरच या मतदारसंघातून सुधाकर निकाळजे देखील वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक आहेत.
शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून राज्यात एकत्रित निवडणूक लढवली गेल्यास, जालना जिल्ह्यातली बदनापूरची जागा कोणाला सोडायची असा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या बदनापूरमध्ये भाजपचा आमदार असला तरी आपला परंपरागत मतदारसंघ म्हणून शिवसेना या मतदारसंघावर दावा करील हे स्पष्ट आहे. या मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार नारायण कुचे हे विद्यमान आमदार असून ते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे खास विश्वासू आहेत. दुसरीकडे शिवसेना नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचाही या मतदारसंघावर प्रभाव असल्याने शिवसेना ही जागा सोडण्यासाठी तयार होईल अशी शक्यता नाही. मागील निवडणुकीत शिवसेना उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेल्याने यावेळी भाजप ही जागा सहजासहजी शिवसेनेला सोडणार नाही. या मतदारसंघाच्या इतिहासात हा मतदारसंघ शिवसेनेच्या हातात अधिक काळ राहिलेला आहे. परंपरेने ही जागा शिवसेनेकडे असल्याने शिवसेना देखील या जागेवरून मागे हटणार नाही असंच सध्याचे चित्र आहे. एकूणच या जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये घमासान निश्चित आहे.
साहजिकच युतीत बिघाडी झाली तर फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो. शिवाय वंचित बहुजन आघाडीकडून प्रबळ उमेदवार मिळाल्यास हा फायदा आपल्या पदरात पाडून घेण्याचा देखील प्रयत्न होईल.
औरंगाबाद जिल्ह्याला लागून असलेल्या या विधानसभा मतदारसंघात विकासाचे अनेक प्रश्न आहेत. बदनापूर शहरातून जाणाऱ्या औरंगाबाद-जालना जाणाऱ्या महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यासाठी बाह्यवळण रस्त्याची गरज असली तरी अद्याप तो झालेला नाही. ग्रामीण भागातील रस्त्यांचे ही गंभीर प्रश्न आहेत. बदनापूर शहराला कायमस्वरूपी आणि निश्चित हमी असलेल्या पाणी पुरवठा योजनेची आवश्यकता आहे. जालना शहराजवळ काम सुरू असलेल्या ड्रायपोर्टचा काही भाग या मतदारसंघात येतो. ओद्योगीकरण नसल्यामुळे शेती हाच या मतदारसंघात प्रमुख व्यवसाय आहे. या मतदारसंघातील अंबड या तालुका मुख्यालय असलेल्या शहरातील पाणी आणि नागरी सुविधांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. साहजिकच हे प्रश्न निवडणुकीत पुन्हा एकदा प्रचाराचे मुद्दे ठरतील यात शंका नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अमरावती विधानपरिषद निवडणूक! भाजपकडून प्रवीण पोटेंच्या नावावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंच्या उपस्थितीत दाखल करणार उमेदवारी अर्ज
अमरावती विधानपरिषद निवडणूक! भाजपकडून प्रवीण पोटेंच्या नावावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंच्या उपस्थितीत दाखल करणार उमेदवारी अर्ज
Nanded Politics : हॉटेलमध्ये मध्यरात्री भेट; श्रीकांत शिंदे अन् चिखलीकरांच्या 'त्या' गुप्त बैठकीमुळे नांदेडच्या राजकारणात भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
हॉटेलमध्ये मध्यरात्री भेट; श्रीकांत शिंदे अन् चिखलीकरांच्या 'त्या' गुप्त बैठकीमुळे नांदेडच्या राजकारणात भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 40 उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई, नेमकं कारण काय? 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 40 उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई, नेमकं कारण काय? 
Solapur MLC Election: सोलापूर विधान परिषदेला धक्कादायक ट्विस्ट! 'या' 3 महिला नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा
सोलापूर विधान परिषदेला धक्कादायक ट्विस्ट! 'या' 3 महिला नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा

व्हिडीओ

Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
Embed widget