एक्स्प्लोर

बदनापूर विधानसभा मतदारसंघ : युतीतली धुसफूस आघाडी आणि वंचीतसाठी फायद्याची ठरणार का?

जालना जिल्ह्यातील बदनापूर हा एक राखीव मतदारसंघ, सध्या भाजपचे नारायण कुचे या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. तसा शिवसेनेचा बऱ्यापैकी प्रभाव असला तरी प्रस्थापितांच्या विरोधात कौल देणं हा या मतदारसंघाचा स्वभाव आहे. अपवाद फक्त शिवसेनेचा, शिवसेना आमदार नारायण चव्हाण सलग तीनवेळा इथून निवडून गेले आहेत.

बदनापूर मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर, म्हणजेच 2009 साली मतदारसंघाच्या भौगोलीक क्षेत्रात बदल होऊन, त्यामध्ये अंबड शहर आणि तालुक्यातील मोठा भाग समाविष्ट झाला. जालना, भोकरदन, जाफराबाद आणि अंबड या चार तालुक्यातील गावांचा समावेश असेलला हा मतदारसंघ आहे.  मतदारसंघात शेती व्यवसायाशीच निगडित असलेला मोठा मतदार आहे. 2009 साली झालेल्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला.
या मतदारसंघाच्या इतिहासात अनेकदा प्रस्थापितांच्या विरोधात मतदान झाल्याचा इतिहास आहे. 1972 मध्ये तत्कालीन काँग्रेसचे वजनदार नेते भगवंतराव गाढे यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार बाजीराव चव्हाण पाटील निवडून आले होते. 1978 मध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून उभे राहिलेले तत्कालीन आमदार बाजीराव चव्हाण यांचा इंदिरा काँग्रेसचे शंकरराव वाकुळणीकर यांनी पराभव केला. तर 1980 मध्ये या मतदारसंघातून इंदिरा काँग्रेसच्या शकुंतला शर्मा निवडून आल्या. त्यानंतर 1985 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करून समाजवादी काँग्रेसकडून आप्पासाहेब चव्हाण निवडून आले. त्यानंतर 1990,1995 आणि 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नारायण चव्हाण सलग निवडून आले.  2004 मध्ये शिवसेनेने नारायण चव्हाण यांना डावलून भानुदास घुगे यांना उमेदवारी दिली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अरविंद चव्हाण यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. 2009 साली हा मतदार संघ आरक्षित झाला आणि शिवसेनेचे उमेदवार संतोष सांबरे हे निवडून आले. 2014 मध्ये शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यामध्ये शिवसेनेचे संतोष सांबरे यांचा पराभव करून निवडणुकीच्या केवळ महिनाभर अगोदर प्रचाराला लागलेले भाजपचे नारायण कुचे निवडून आले.
2014 च्या विधासभा निवडणूक उमेदवारांना मिळालेली मते नारायण कुचे (भाजप) - 73,560 बबलू चौधरी (राष्ट्रवादी) - 50,065 संतोष सांबरे (शिवसेना) - 30,945
2019 लोकसभा बदनापूर मतदारसंघातील मताधिक्य
रावसाहेब दानवे - (भाजप) -1,22818 विलास औताडे - (काँग्रेस) - 60,027
जिल्ह्यात भाजपकडे एक केंद्रीय राज्यमंत्रीपद आणि एक राज्याचे कॅबिनेट मंत्रीपद आहे तर शिवसेनेकडेही एक राज्यमंत्रीपद आहे. बदनापूर पंचायत समिती आणि बदनापूर नगरपंचायत भाजपच्या ताब्यात आहे. त्याशिवाय या मतदारसंघात येणारी अंबड नगरपरिषद ही भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे या मतदारसंघावर सध्या भाजप आणि शिवसेनेचं वर्चस्व आहे.
त्यातुलनेत या मतदारसंघात काँग्रेसची ताकद कमी आहे. 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराला जेमतेम 7 टक्के मते पडली होती आणि काँग्रेस उमेदवार चौथ्या क्रमांकावर होता.
या मतदारसंघावर, शिवसेना दावा सांगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून सध्या बबलू चौधरी यांच्या नावाची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत 50 हजार मते घेऊन ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. तर शिवसेनेचे संतोष सांबरे यांची अनामत रक्कम जप्त होऊन ते या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर ढकलले गेले. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीची भूमिका या मतदारसंघात महत्वाची ठरणार आहे. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक वर्षे काम केलेले सुदाम सदाशिवे यांनी अलीकडे वंचित बहुजनमध्ये प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीकडून या मतदारसंघातील उमेदवारीसाठी ते इच्छुक आहेत. या बरोबरच या मतदारसंघातून सुधाकर निकाळजे देखील वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक आहेत.
शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून राज्यात एकत्रित निवडणूक लढवली गेल्यास, जालना जिल्ह्यातली बदनापूरची जागा कोणाला सोडायची असा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या बदनापूरमध्ये भाजपचा आमदार असला तरी आपला परंपरागत मतदारसंघ म्हणून शिवसेना या मतदारसंघावर दावा करील हे स्पष्ट आहे. या मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार नारायण कुचे हे विद्यमान आमदार असून ते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे खास विश्वासू आहेत. दुसरीकडे शिवसेना नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचाही या मतदारसंघावर प्रभाव असल्याने शिवसेना ही जागा सोडण्यासाठी तयार होईल अशी शक्यता नाही. मागील निवडणुकीत शिवसेना उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेल्याने यावेळी भाजप ही जागा सहजासहजी शिवसेनेला सोडणार नाही. या मतदारसंघाच्या इतिहासात हा मतदारसंघ शिवसेनेच्या हातात अधिक काळ राहिलेला आहे. परंपरेने ही जागा शिवसेनेकडे असल्याने शिवसेना देखील या जागेवरून मागे हटणार नाही असंच सध्याचे चित्र आहे. एकूणच या जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये घमासान निश्चित आहे.
साहजिकच युतीत बिघाडी झाली तर फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो. शिवाय वंचित बहुजन आघाडीकडून प्रबळ उमेदवार मिळाल्यास हा फायदा आपल्या पदरात पाडून घेण्याचा देखील प्रयत्न होईल.
औरंगाबाद जिल्ह्याला लागून असलेल्या या विधानसभा मतदारसंघात विकासाचे अनेक प्रश्न आहेत. बदनापूर शहरातून जाणाऱ्या औरंगाबाद-जालना जाणाऱ्या महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यासाठी बाह्यवळण रस्त्याची गरज असली तरी अद्याप तो झालेला नाही. ग्रामीण भागातील रस्त्यांचे ही गंभीर प्रश्न आहेत. बदनापूर शहराला कायमस्वरूपी आणि निश्चित हमी असलेल्या पाणी पुरवठा योजनेची आवश्यकता आहे. जालना शहराजवळ काम सुरू असलेल्या ड्रायपोर्टचा काही भाग या मतदारसंघात येतो. ओद्योगीकरण नसल्यामुळे शेती हाच या मतदारसंघात प्रमुख व्यवसाय आहे. या मतदारसंघातील अंबड या तालुका मुख्यालय असलेल्या शहरातील पाणी आणि नागरी सुविधांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. साहजिकच हे प्रश्न निवडणुकीत पुन्हा एकदा प्रचाराचे मुद्दे ठरतील यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Embed widget