एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election 2024: विधानपरिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट येणार? अवघे 4 सदस्य असणाऱ्या अजितदादा गटाने शड्डू ठोकला

Maharashtra Politics: विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 तारखेला निवडणूक होत आहे. त्यानंतर विधानपरिषदेतील रिक्त असलेले सभापतीपद भरले जाईल. त्यासाठी महायुतीकडून कोणता उमेदवार निश्चित होणार, हे पाहावे लागेल.

मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेच्या सभापतीची निवड सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनातच केली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत ऑगस्ट 2022 मध्ये संपल्यापासून विधान परिषदेचे (Vidhan Parishad  Election 2024) सभापतीपद रिक्त आहे. मात्र, आगामी राजकारणाच्यादृष्टीने हे पद महत्त्वाचे असल्याने ते भरले जाईल, असे सांगितले जाते. विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीत चुरस असणार, हे अपेक्षितच होते. विधानपरिषद सभागृहात 78 पैकी 27 जागा रिक्त असून महायुतीकडे बहुमत आहे.  मात्र, आता या शर्यतीत विधानपरिषदेत अवघे चार सदस्य असलेल्या अजित पवार गटाने (Ajit Pawar Camp) उडी घेतल्याने सभापतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.  विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, रामराजे नाईक निंबाळकर, सतीश चव्हाण, विक्रम काळे असे चार सदस्य आहेत.

सत्तेत सहभागी होताना विधान परिषदेत सभापतीपद देण्याचे आश्वासन महायुतीने दिले असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळेच अजितदादा गटाने विधान परिषद सभापती पदावर दावा सांगितला आहे.

विधानपरिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीची तारीख ही राज्यपालांकडून निश्चित केली जाते. त्याआधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून निवडणुकीची तारीख निश्चित करण्याची विनंती करणारे पत्र राज्यपालांना पाठवावे लागते. अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या शुक्रवारी संपणार आहे आणि पुढील अधिवेशन विधानसभा निवडणुकीनंतर होईल. त्यामुळे सभापती पदाची निवडणूक घ्यायची असल्यास आजच मुख्यमंत्र्यांकडून निवडणुकीची तारीख कळवण्याबाबत राज्यपालांना पत्र जाणे अपेक्षित आहे. दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडूनही सभापती पदावर दावा करण्यात आला आहे. भाजपकडून राम शिंदे तर शिवसेनेकडून निलम गोऱ्हे विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे आता महायुतीकडून विधानपरिषद निवडणुकीची तारीख निश्चित करुन सर्वसहमतीने एकच उमेदवार निवडला जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत. 

मविआच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांची भेट

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने अलीकडेच राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती. विधानपरिषदेतील सभापतीपद रिक्त आहे. याबाबत लवकरात लवकर निवडणूक जाहीर करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. तसेच याबाबत विरोधी पक्ष आग्रही आहे, असे सांगण्यात आले. यावेळी राज्यपालांनी याबाबत सकारात्मक पाऊल उचलण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. 

आणखी वाचा

विधानपरिषद निवडणुकीसाठी आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये...; कोण किती भाडं मोजतंय; शिंदे गट, ठाकरे की भाजप?

आमदारांमध्ये खेळीमेळीचे वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न, सर्वजण एकाच मजल्यावर, आदित्य ठाकरेही हॉटेलमध्ये राहणार, निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा खास प्लॅन

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Embed widget