एक्स्प्लोर

Yugendra Pawar: अजितदादांविरोधात पराभवानंतर युगेंद्र पवार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! सुरू केला आभार दौरा; मत पडताळणीबाबत केलं मोठं वक्तव्य

Yugendra Pawar: बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवारांचा पराभव झाल्यानंतर युगेंद्र पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघात आभार दौरा काढलेला आहे.

बारामती: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा मोठ्या मताधिक्यांने पराभव झाला. युगेंद्र पवार यांची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामध्ये युगेंद्र पवारांना (Yugendra Pawar) 80,458 इतकी मते मिळाली आहेत. अजित पवारांना (Ajit Pawar) 1,96,640 मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) 1,16,182 मतांनी विजयी झाले आहेत. त्यानंतर आता युगेंद्र पवार (Yugendra Pawar) पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवारांचा (Yugendra Pawar) पराभव झाल्यानंतर युगेंद्र पवारांनी (Yugendra Pawar) बारामती विधानसभा मतदारसंघात आभार दौरा काढलेला आहे.

 या आभार दौऱ्याच्या माध्यमातून ते गावोगावी जाऊन मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत आहेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी काटेवाडी मधून केली. तर दुसरीकडे अजित पवारांचं (Ajit Pawar) अद्यापपर्यंत अभिनंदन केलं नाही, परंतु तुमच्या माध्यमातून अभिनंदन करतो. सातत्याने त्यांना दिल्लीला जावं लागत आहे. त्याच्यामुळे वेळ भेटला नाही, ज्यावेळेस भेटतील त्यावेळेस मी त्यांचे अभिनंदन करेल असा खोचक टोला युगेंद्र पवार यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) लगावला आहे. तर तसेच त्यांनी मत पडताळणीवरून निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत पैशाचा वापर झाला. दहशतीचे वातावरण होतं असा आरोप देखील युगेंद्र पवार यांनी केला आहे. 

गावोगावी मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे मानणार आभार 

अजित पवार (Ajit Pawar) यांचं मी अभिनंदन करतो आणि निवडणुका म्हटलं तर हार-जीत हे होत असतं. आमची पहिली वेळ होती. आम्ही निष्ठेच्या बाजूने आणि सत्याच्या बाजूने उभे राहिलो. आमचे सर्व कार्यकर्ते हे नवीन आहेत. सर्वजण तरुण आहेत. तरीदेखील आम्ही सर्वांनी चांगली टक्कर दिली आणि सर्वत्र परत एकदा गेलं पाहिजे अशी भावना आमच्या सर्वांची होती. त्या लोकांनी आम्हाला मदत केली आणि ज्या लोकांनी मदत केली नाही. तिथे परत एकदा त्यांच्या गावात जाऊन भेट द्यायची गरज होती. ते द्यायचे आम्ही प्रयत्न करत आहे. परत एकदा लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलणं ही पवार साहेबांची शिकवण आहे. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि निवडणुका शेवटी येत असतात जात असतात पण विचार महत्त्वाचे असतात. आम्ही विचारांसोबत राहिलो. 

आम्ही शरद पवारांसोबत राहिलो त्याला पण किंमत असते फक्त माझे एकट्याचा निकाल जर वेगळा असता तर मग ठीक आहे. समजून घेऊ शकलो असतो. माझ्या विरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री होते. मोठी ताकत होती. सत्ता त्यांच्या हातात होती. सत्ता संस्था सर्व त्यांच्यासोबत होते. तरी पण आपण चांगली मतं मिळवली पण अख्या महाराष्ट्रामध्ये असा निकाल लागेल हे कोणालाही वाटलं नव्हतं. पण ते तसं झालं आणि हे सगळं होत असताना इतकी मतं आम्हाला मिळाली तीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आम्ही काम करत राहू लोकांमध्ये जात राहू आणि पाच वर्ष कष्ट घेत राहू आणि येणारा काळा आपलाच असेल, असा विश्वास एबीपी माझाशी बोलताना युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे.  

 एकतर लोकांचा निर्णय हा मान्य करावा लागेल 

मत पडताळणी बाबत बोलताना युगेंद्र  पवार म्हणाले, एकतर लोकांचा निर्णय हा मान्य करावा लागेल तो मी मान्य केला आहे. पण सुप्रीम कोर्टाने आम्हाला तो अधिकार दिला आहे. पाच टक्के ईव्हीएम पडताळणी करू शकता. आज अख्या महाराष्ट्रामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आमची लीगल टीम आहे जो आमची पक्ष आहे जे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही स्वतः आम्हाला असं वाटलं चेक करायला काय हरकत आहे आणि तो अधिकार आम्हाला सुप्रीम कोर्टाने दिला आहे त्यामुळे आज आम्ही ते पडताळणी करण्याची मागणी केली आहे असं ते म्हणालेत. 

त्यामध्ये काहीतरी झाला असेल असा संशय वाटतोय का या प्रश्नावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, असं वाटत आहे. कारण फक्त बारामतीतच नाही तर महाराष्ट्रामध्ये खूप चांगले नेते जुने नेते पराभूत झाले आहेत. फक्त मी एकटा असतो तर मग ठीक होतं. कुठेतरी मी ते स्वीकारलं असतं शेवटी पुढच्या उमेदवाराची ताकद खूप मोठी होती. पण मोठे मोठे दिग्गज नेते जर त्यांच्या मतदारसंघात पडत असतील, तर वीस तीस वर्ष जर त्यांच्या मतदारसंघात काम करून ते पराभूत होत असतील तर तिथे कुठेतरी संशयास्पद वाटतं त्यामुळे आम्ही पडताळणी करण्याची मागणी केली आहे असंही युगेंद्र पवार पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांना अभिनंदन केलं का यावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, नाही अजून पक्षाच्या मिटींग चालू होत्या निकाल लागल्यानंतर तीन चार दिवस मला मुंबईत राहावं लागलं. कारण पक्षाच्या काही बैठका कार्यक्रम होते ते देखील त्यांच्या कामांमध्ये व्यस्त होते. त्यांना आता दिल्लीला जावं लागत आहे आणि त्यांना तिथे सरकार स्थापन बद्दलच्या बैठका घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांना भेटायला मला वेळ मिळाला नाही. जर मला त्यांना कुठे भेटता आलं किंवा अचानकपणे भेट झाली तर मी 100% त्यांना शुभेच्छा देईन असेही देवेंद्र पवार म्हणालेत. 

या निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर आणि पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचा दिसून येत आहे. लाडकी बहीण योजनेचा देखील इम्पॅक्ट या निवडणुकीवर झाल्याचा दिसून येत आहे ही पराभवाची कारणे असू शकतात असेही युगेंद्र पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा - Baramati Assembly Constituency : अजितदादांनी निवडणूक जिंकली, पण पिक्चर अभी बाकी है! आक्षेप घेत युगेंद्र पवार थेट निवडणूक आयोगात; नेमकी काय मागणी केली?

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषदेच्या निवडणुकांचं मतदान गुक्त न ठेवता हात वर करुन घेतल्या पाहिजेत, जयंत पाटलांचं वक्तव्य 
विधान परिषदेच्या निवडणुकांचं मतदान गुक्त न ठेवता हात वर करुन घेतल्या पाहिजेत, जयंत पाटलांचं वक्तव्य 
Vidhan Parishad Election 2026: पुणे विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या माघारीबाबत बैठकीत काय घडलं? काँग्रेसच्या चंदू कदमांनी सांगितली Inside Story
पुणे विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या माघारीबाबत बैठकीत काय घडलं? काँग्रेसच्या चंदू कदमांनी सांगितली Inside Story
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
Embed widget