एक्स्प्लोर

Yugendra Pawar: अजितदादांविरोधात पराभवानंतर युगेंद्र पवार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! सुरू केला आभार दौरा; मत पडताळणीबाबत केलं मोठं वक्तव्य

Yugendra Pawar: बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवारांचा पराभव झाल्यानंतर युगेंद्र पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघात आभार दौरा काढलेला आहे.

बारामती: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा मोठ्या मताधिक्यांने पराभव झाला. युगेंद्र पवार यांची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामध्ये युगेंद्र पवारांना (Yugendra Pawar) 80,458 इतकी मते मिळाली आहेत. अजित पवारांना (Ajit Pawar) 1,96,640 मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) 1,16,182 मतांनी विजयी झाले आहेत. त्यानंतर आता युगेंद्र पवार (Yugendra Pawar) पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवारांचा (Yugendra Pawar) पराभव झाल्यानंतर युगेंद्र पवारांनी (Yugendra Pawar) बारामती विधानसभा मतदारसंघात आभार दौरा काढलेला आहे.

 या आभार दौऱ्याच्या माध्यमातून ते गावोगावी जाऊन मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत आहेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी काटेवाडी मधून केली. तर दुसरीकडे अजित पवारांचं (Ajit Pawar) अद्यापपर्यंत अभिनंदन केलं नाही, परंतु तुमच्या माध्यमातून अभिनंदन करतो. सातत्याने त्यांना दिल्लीला जावं लागत आहे. त्याच्यामुळे वेळ भेटला नाही, ज्यावेळेस भेटतील त्यावेळेस मी त्यांचे अभिनंदन करेल असा खोचक टोला युगेंद्र पवार यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) लगावला आहे. तर तसेच त्यांनी मत पडताळणीवरून निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत पैशाचा वापर झाला. दहशतीचे वातावरण होतं असा आरोप देखील युगेंद्र पवार यांनी केला आहे. 

गावोगावी मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे मानणार आभार 

अजित पवार (Ajit Pawar) यांचं मी अभिनंदन करतो आणि निवडणुका म्हटलं तर हार-जीत हे होत असतं. आमची पहिली वेळ होती. आम्ही निष्ठेच्या बाजूने आणि सत्याच्या बाजूने उभे राहिलो. आमचे सर्व कार्यकर्ते हे नवीन आहेत. सर्वजण तरुण आहेत. तरीदेखील आम्ही सर्वांनी चांगली टक्कर दिली आणि सर्वत्र परत एकदा गेलं पाहिजे अशी भावना आमच्या सर्वांची होती. त्या लोकांनी आम्हाला मदत केली आणि ज्या लोकांनी मदत केली नाही. तिथे परत एकदा त्यांच्या गावात जाऊन भेट द्यायची गरज होती. ते द्यायचे आम्ही प्रयत्न करत आहे. परत एकदा लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलणं ही पवार साहेबांची शिकवण आहे. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि निवडणुका शेवटी येत असतात जात असतात पण विचार महत्त्वाचे असतात. आम्ही विचारांसोबत राहिलो. 

आम्ही शरद पवारांसोबत राहिलो त्याला पण किंमत असते फक्त माझे एकट्याचा निकाल जर वेगळा असता तर मग ठीक आहे. समजून घेऊ शकलो असतो. माझ्या विरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री होते. मोठी ताकत होती. सत्ता त्यांच्या हातात होती. सत्ता संस्था सर्व त्यांच्यासोबत होते. तरी पण आपण चांगली मतं मिळवली पण अख्या महाराष्ट्रामध्ये असा निकाल लागेल हे कोणालाही वाटलं नव्हतं. पण ते तसं झालं आणि हे सगळं होत असताना इतकी मतं आम्हाला मिळाली तीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आम्ही काम करत राहू लोकांमध्ये जात राहू आणि पाच वर्ष कष्ट घेत राहू आणि येणारा काळा आपलाच असेल, असा विश्वास एबीपी माझाशी बोलताना युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे.  

 एकतर लोकांचा निर्णय हा मान्य करावा लागेल 

मत पडताळणी बाबत बोलताना युगेंद्र  पवार म्हणाले, एकतर लोकांचा निर्णय हा मान्य करावा लागेल तो मी मान्य केला आहे. पण सुप्रीम कोर्टाने आम्हाला तो अधिकार दिला आहे. पाच टक्के ईव्हीएम पडताळणी करू शकता. आज अख्या महाराष्ट्रामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आमची लीगल टीम आहे जो आमची पक्ष आहे जे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही स्वतः आम्हाला असं वाटलं चेक करायला काय हरकत आहे आणि तो अधिकार आम्हाला सुप्रीम कोर्टाने दिला आहे त्यामुळे आज आम्ही ते पडताळणी करण्याची मागणी केली आहे असं ते म्हणालेत. 

त्यामध्ये काहीतरी झाला असेल असा संशय वाटतोय का या प्रश्नावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, असं वाटत आहे. कारण फक्त बारामतीतच नाही तर महाराष्ट्रामध्ये खूप चांगले नेते जुने नेते पराभूत झाले आहेत. फक्त मी एकटा असतो तर मग ठीक होतं. कुठेतरी मी ते स्वीकारलं असतं शेवटी पुढच्या उमेदवाराची ताकद खूप मोठी होती. पण मोठे मोठे दिग्गज नेते जर त्यांच्या मतदारसंघात पडत असतील, तर वीस तीस वर्ष जर त्यांच्या मतदारसंघात काम करून ते पराभूत होत असतील तर तिथे कुठेतरी संशयास्पद वाटतं त्यामुळे आम्ही पडताळणी करण्याची मागणी केली आहे असंही युगेंद्र पवार पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांना अभिनंदन केलं का यावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, नाही अजून पक्षाच्या मिटींग चालू होत्या निकाल लागल्यानंतर तीन चार दिवस मला मुंबईत राहावं लागलं. कारण पक्षाच्या काही बैठका कार्यक्रम होते ते देखील त्यांच्या कामांमध्ये व्यस्त होते. त्यांना आता दिल्लीला जावं लागत आहे आणि त्यांना तिथे सरकार स्थापन बद्दलच्या बैठका घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांना भेटायला मला वेळ मिळाला नाही. जर मला त्यांना कुठे भेटता आलं किंवा अचानकपणे भेट झाली तर मी 100% त्यांना शुभेच्छा देईन असेही देवेंद्र पवार म्हणालेत. 

या निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर आणि पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचा दिसून येत आहे. लाडकी बहीण योजनेचा देखील इम्पॅक्ट या निवडणुकीवर झाल्याचा दिसून येत आहे ही पराभवाची कारणे असू शकतात असेही युगेंद्र पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा - Baramati Assembly Constituency : अजितदादांनी निवडणूक जिंकली, पण पिक्चर अभी बाकी है! आक्षेप घेत युगेंद्र पवार थेट निवडणूक आयोगात; नेमकी काय मागणी केली?

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिक विधानपरिषदेत घडामोडींना वेग! महाजनांच्या मध्यस्थीनंतर गणेश गीते घेणार माघार; गोकुळ गीते मात्र निवडणूक लढण्यावर ठाम
नाशिक विधानपरिषदेत घडामोडींना वेग! महाजनांच्या मध्यस्थीनंतर गणेश गीते घेणार माघार; गोकुळ गीते मात्र निवडणूक लढण्यावर ठाम
Abdul Sattar: शिंदेंच्या आदेशानंतर अब्दुल सत्तारांच्या मुलाची विधान परिषदेतून माघार, आता जिल्हा बँकेसाठी ठोकला शड्डू; मंत्री अतुल सावेंचीही एन्ट्री, नेमकं काय घडलं?
शिंदेंच्या आदेशानंतर अब्दुल सत्तारांच्या मुलाची विधान परिषदेतून माघार, आता जिल्हा बँकेसाठी ठोकला शड्डू; मंत्री अतुल सावेंचीही एन्ट्री, नेमकं काय घडलं?
कोकणातील माझ्याच नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी केला, मुलीचा अर्ज माघे घेतल्यानंतर महेंद्र दळवींची भावनिक पोस्ट
कोकणातील माझ्याच नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी केला, मुलीचा अर्ज माघे घेतल्यानंतर महेंद्र दळवींची भावनिक पोस्ट
Vidhan Parishad Election 2026: महायुती अन् मविआला बंडखोरांमुळे डोकेदुखी; परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक रंगतदार होणार; प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीत पहिला उमेदवारी अर्ज मागे
महायुती अन् मविआला बंडखोरांमुळे डोकेदुखी; परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक रंगतदार होणार; प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीत पहिला उमेदवारी अर्ज मागे

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalit Modi : कोची टस्कर्स प्रकरणात शशी थरुर यांना कोण पाठिंबा देत होतं? ललित मोदीचे सोनिया गांधींसह काँग्रेस नेत्यांची नावं घेत खळबळजनक दावे
कोची टस्कर्स प्रकरणात शशी थरुर यांना कोण पाठिंबा देत होतं? ललित मोदीचे खळबळजनक दावे
Aamir Khan Third Wife Gauri Spratt: तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार 'मिस्टर परफेक्शनिस्ट'; आमीर खान आणि सहा वर्षांच्या मुलाची आई असलेल्या गौरी स्प्रॅटच्या वयात किती अंतर?
तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार 'मिस्टर परफेक्शनिस्ट'; आमीर खान आणि सहा वर्षांच्या मुलाची आई असलेल्या गौरी स्प्रॅटच्या वयात किती अंतर?
Kolhapur Crime news: प्रेमाचे आमिष, ब्लॅकमेलिंग, अत्याचाराची जागा अन् माहिती ; धक्कादायक धागेदोरे हाती, आरोपींची आर्थिक परिस्थिती चांगली, पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर
प्रेमाचे आमिष, ब्लॅकमेलिंग, अत्याचाराची जागा अन् माहिती ; धक्कादायक धागेदोरे हाती, आरोपींची आर्थिक परिस्थिती चांगली, पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर
SEBI : एका तक्रारीनं 15 लाख कोटींचा अपहार उघड, सेबीचा राजेश एक्सपोर्टसला दणका,सर्वात मोठ्या सोन्याच्या रिफायनरीचा मालक संकटात, शेअर बाजारात ट्रेडिंगला बंदी
सेबीचा राजेश एक्सपोर्टसला दणका,सर्वात मोठ्या सोन्याच्या रिफायनरीचा मालक संकटात, शेअर बाजारात ट्रेडिंगला बंदी
Andheri Subway Mumbai Rain: अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
Embed widget