एक्स्प्लोर

Lok Sabha Elections 2019 : मतदानादरम्यान पुलवामात तिसऱ्यांदा ग्रेनेड हल्ला

Lok Sabha Elections 2019 - Fifth phase poll voting in 7 states on 51 seats Lok Sabha Elections 2019 : मतदानादरम्यान पुलवामात तिसऱ्यांदा ग्रेनेड हल्ला

Background

Lok Sabha Elections 2019 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यामधील 51 जागांवर आज मतदान पार पडत आहे. या टप्प्यात यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह 674 उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे.

पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 14 जागा, राजस्थानमधील 12 जागा, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशमधील प्रत्येकी सात जागांवर, तर बिहारमधील पाच आणि झारखंडमधील चार जागांसाठी मतदान सुरु आहे. जम्मू-काश्मीरच्या लडाख आणि अनंतनाग जागेसाठी पुलवामा आणि शोपियां जिल्ह्यात मतदान होत आहे.

सत्ताधीश भाजप आणि मित्रपक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण 2014 मधील लोकसभा निवडणुकीत एनडीएला 51 पैकी 40 जागांवर विजय मिळवता आला होता. दोन जागा काँग्रेसने जिंकल्या तर उर्वरित जागांवर इतर विरोधी पक्षांनी विजय मिळवला.

उत्तर प्रदेशातील 14 जागांवर दिग्गजांमध्ये टक्कर होणार आहे, ज्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश आहे.

अमेठी आणि रायबरेलीमध्ये सपा-बसपा गठबंधनने आपले उमेदवार उतरवले नाहीत. त्यांनी या दोन्ही जागा काँग्रेससाठी सोडल्या आहेत. राजनाथ सिंह लखनौमधून पुन्हा मैदानात आहेत तर अमेठीमध्ये स्मृती इराणींनी राहुल गांधींन आव्हान दिलं आहे.

राजस्थानमध्ये 12 लोकसभा जागावर ज्या 134 उमेदवारांचं भवितव्य निश्चित होणार आहे, त्यामध्ये दोन माजी ऑलिम्पिक खेळाडू, एक माजी आयएएस अधिकारी आणि एक माजी आयपीएस अधिकाऱ्याचा समावेश आहे. या टप्प्यानंतर राजस्थानमधील मतदान संपणार आहे. राजस्थानमध्ये  राज्यवर्धन राठोड, कृष्णा पुनिया, अर्जुन राम मेघवाल प्रमुख उमेदवार आहेत.

पश्चिम बंगालच्या सर्व सात जागांवर तृणमूल काँग्रेस, भाजप, काँग्रेस आणि माकपा यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. 2014 च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने सर्व सात जागांवर विजय मिळवला होता.

बिहारच्या पाच मतदारसंघापैकी हाजीपूर हा लोक जनशक्ती पक्षाचा बालेकिल्ला आहे, तर सारण हा राजदचं गड समजला जातो. मुजफ्फरपूर, सीतामढी आणि मधुबनी हे उर्वरित तीन मतदारसंघ आहेत.

झारखंडमध्ये हजारीबाग, कोडरमा, रांची आणि खुंटीमध्ये आज मतदान होत आहे. केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा हजारीबागमधून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मध्य प्रदेशमध्ये टीकमगड, दामोह, खजुराहो, सतना, रीवा, होशंगाबाद आणि बेतुलमध्ये निवडणूक हो आहे. 2014 मध्ये इथे भाजपने विजय मिळवला होता.

लडाखमध्ये चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. भाजपकडून सेरिंग नामग्याल मैदानात आहेत तर रिगजिन स्पालबार काँग्रेसच्या तिकीटावर रिंगणात उतरले आहेत. तसंच दोन उमेदवार अपक्ष आहेत.

कोणत्या राज्यात किती जागांवर मतदान?
उत्तर प्रदेश - 14
बिहार - 5
मध्य प्रदेश - 7
राजस्थान - 12
झारखंड - 4
पश्चिम बंगाल- 7
जम्मू काश्मीर - 2

कोण किती जागांवर लढत आहेत?
भाजप - 48
काँग्रेस - 46
बसपा - 33
माकप - 11
सपा - 09
तृणमूल काँग्रेस - 07
शिवसेना - 05
भाकप - 03
अपक्ष - 511

2014 मध्ये कोणाला किती जागा?
भाजप - 39
लोक जनशक्ती पक्ष - 1
राष्ट्रीय लोक समता पक्ष - 1
काँग्रेस - 2
तृणमूल काँग्रेस - 7
पीडीपी - 1

15:03 PM (IST)  •  06 May 2019

14:57 PM (IST)  •  06 May 2019

जम्मू काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघासाठी सुरु असलेल्या मतदानादरम्यान दहशतवाद्यांचा पुलवामा जिल्ह्यात काही तासांच्या अंतरात तिसऱ्यांदा ग्रेनेड हल्ला केला आहे. अतिरेक्यांनी छतपोरामधील सरकारी शाळेतील मतदान केंद्रावर निशाणा साधला. त्याआधी तिकनपोरा आणि रोहमूमधील मतदान केद्रांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला होता. सुदैवाची गोष्ट म्हणजे तिन्ही हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली

व्हिडीओ

Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report
Zero Hour : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सरकार हाताळतंय असं वाटतं का? ABP Majha
Navi Mumbai Hospital : नवी मुंबईत हॉस्पिटलमध्ये LPG चा तुटवडा, रुग्णांना जेवण पुरवणे अवघड
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
IPL 2026 Schedule : मोठी बातमी, आयपीएलचं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
IPL चं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
Embed widget