एक्स्प्लोर

FYJC Admission : मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज, अकरावीच्या सामान्य गुणवत्ता यादीबाबत मोठी अपडेट, कोणत्या शाखेला सर्वाधिक पसंती?

FYJC Admission : मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अकरावीची सामान्य गुणवत्ता यादी 27 जूनला जारी होणार आहे.

मुंबई : दहावीचे निकाल (SSC Exam Result) जाहीर होत असताना राज्यातील अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला (FYJC Admission ) सुरुवात झाली होती. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला होता. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. मुंबई विभागातील (Mumbai Division ) अकरावी प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी जारी करण्यात आली आहे. यामध्ये नऊ विद्यार्थ्यी शंभर टक्के असणार आहेत. मुंबई विभागात अकरावीमध्ये प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या सर्वांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. 


मुंबई विभागातील जारी करण्यात आलेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीनुसार 2 लाख 47 हजार 664 जागांसाठी 2 लाख 38 हजार 953 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उपलब्ध जागांपेक्षा कमी अर्ज आल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळं विद्यार्थ्यांना त्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. अकरावी प्रवेशाची सामान्य गुणवत्ता यादी 27 जूनला जारी होणार आहे. 


मुंबई विभागातील विद्यार्थ्यांची पसंती वाणिज्य शाखेला असल्याचं स्पष्ट झालं आहे. 1 लाख 20 हजार विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेसाठी नोंदणी केली आहे. त्यापाठोपाठ 93 हजार 895 विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली आहे. कला शाखेसाठी केवळ 20429 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात होणार आहे. पहिली सामान्य फेरी, त्यानंतर विशेष फेरीतून प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. 

तात्पुतरत्या गुणवत्ता यादीतील माहितीनुसार 54 टक्के विद्यार्थी  हे 99 ते 99.99 टक्के गुण मिळवणारे आहेत. 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांना 60 ते 79.99 गुण आहेत. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 2 लाख 34 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. याशिवाय आयसीएसईच्या 13837 तर सीबीएसईच्या 10858 च्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील माहिती आणि अचूकता तपासून विद्यार्थ्यांनी 21 जून पर्यंत दुरुस्तीसाठी विनंती करण्याच्या सूचन देण्यात आलेल्या आहेत.

मुंबईतील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, अमरावतीमध्ये केंद्रीय प्रवेश प्रकियेद्वारे अकरावीचे प्रवेश दिले जातात. मुंबईतील अकरावीच्या एकूण जागांपेक्षा कमी अर्ज दाखल झाल्यानं विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल. दुसरीकडे मुंबईतील विद्यार्थ्यांचा कल हा विज्ञान आणि कला शाखेच्या तुलनेत वाणिज्य शाखेकडे सर्वाधिक आहे. आपल्या मुलांना वाणिज्य शाखेतून शिक्षण देण्यासाठी मुंबईतील बहुतांश पालक आग्रही असल्याचं चित्र आहे.  वाणिज्य शाखेपाठोपाठ विद्यार्थ्यांची विज्ञान शाखेला पसंती आहे. सर्वात कमी प्रतिसाद कला शाखेला मिळत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. 

संबंधित बातम्या : 

पोलीस भरतीच्या 2 लाख उमेदवारांची व्यथा, मनोज जरागेंना मंत्र्यांचा फोन; शंभूराज देसाईंकडून आश्वासन

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dada Bhuse: TET पेपरफुटीवरून दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी, आता शिक्षणमंत्र्याचं भर बैठकीत मोठं वक्तव्य, म्हणाले,'वेळ पडल्यास...'
TET पेपरफुटीवरून दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी, आता शिक्षणमंत्र्याचं भर बैठकीत मोठं वक्तव्य, म्हणाले,'वेळ पडल्यास...'
Balbharati Marathi Book: बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
टीईटी पेपरफुटी प्रकरण! आग्र्यातून तीन आरोपींना अटक, प्रश्नपत्रिका बाहेर काढण्याच्या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचा संशय
टीईटी पेपरफुटी प्रकरण! आग्र्यातून तीन आरोपींना अटक, प्रश्नपत्रिका बाहेर काढण्याच्या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचा संशय
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा

व्हिडीओ

Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Lonavala Rain: धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Amit Thacekray: काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
Devendra Fadnavis on Rain: मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसांत पडला, अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस
मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसांत पडला, अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस
Missing Link Landslide: देवेंद्र फडणवीसांनी मिसिंग लिंकचा प्रत्यक्ष आढावा घ्यायला विश्वासू शिलेदार पाठवला, शिवेेंद्रराजे भोसले यांच्याकडून वाहतुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट
फडणवीसांचा विश्वासू शिलेदार मिसिंग लिंकवर पोहोचला,शिवेेंद्रराजे भोसले यांच्याकडून वाहतुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट
धुळ्यात ST बस अन् ट्रेलरची धडक, ड्रायव्हर फरार; सुदैवाने प्रवासी बचावले, बसचालक गंभीर जखमी
धुळ्यात ST बस अन् ट्रेलरची धडक, ड्रायव्हर फरार; सुदैवाने प्रवासी बचावले, बसचालक गंभीर जखमी
Embed widget