एक्स्प्लोर

FYJC Admission : मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज, अकरावीच्या सामान्य गुणवत्ता यादीबाबत मोठी अपडेट, कोणत्या शाखेला सर्वाधिक पसंती?

FYJC Admission : मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अकरावीची सामान्य गुणवत्ता यादी 27 जूनला जारी होणार आहे.

मुंबई : दहावीचे निकाल (SSC Exam Result) जाहीर होत असताना राज्यातील अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला (FYJC Admission ) सुरुवात झाली होती. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला होता. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. मुंबई विभागातील (Mumbai Division ) अकरावी प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी जारी करण्यात आली आहे. यामध्ये नऊ विद्यार्थ्यी शंभर टक्के असणार आहेत. मुंबई विभागात अकरावीमध्ये प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या सर्वांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. 


मुंबई विभागातील जारी करण्यात आलेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीनुसार 2 लाख 47 हजार 664 जागांसाठी 2 लाख 38 हजार 953 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उपलब्ध जागांपेक्षा कमी अर्ज आल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळं विद्यार्थ्यांना त्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. अकरावी प्रवेशाची सामान्य गुणवत्ता यादी 27 जूनला जारी होणार आहे. 


मुंबई विभागातील विद्यार्थ्यांची पसंती वाणिज्य शाखेला असल्याचं स्पष्ट झालं आहे. 1 लाख 20 हजार विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेसाठी नोंदणी केली आहे. त्यापाठोपाठ 93 हजार 895 विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली आहे. कला शाखेसाठी केवळ 20429 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात होणार आहे. पहिली सामान्य फेरी, त्यानंतर विशेष फेरीतून प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. 

तात्पुतरत्या गुणवत्ता यादीतील माहितीनुसार 54 टक्के विद्यार्थी  हे 99 ते 99.99 टक्के गुण मिळवणारे आहेत. 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांना 60 ते 79.99 गुण आहेत. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 2 लाख 34 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. याशिवाय आयसीएसईच्या 13837 तर सीबीएसईच्या 10858 च्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील माहिती आणि अचूकता तपासून विद्यार्थ्यांनी 21 जून पर्यंत दुरुस्तीसाठी विनंती करण्याच्या सूचन देण्यात आलेल्या आहेत.

मुंबईतील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, अमरावतीमध्ये केंद्रीय प्रवेश प्रकियेद्वारे अकरावीचे प्रवेश दिले जातात. मुंबईतील अकरावीच्या एकूण जागांपेक्षा कमी अर्ज दाखल झाल्यानं विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल. दुसरीकडे मुंबईतील विद्यार्थ्यांचा कल हा विज्ञान आणि कला शाखेच्या तुलनेत वाणिज्य शाखेकडे सर्वाधिक आहे. आपल्या मुलांना वाणिज्य शाखेतून शिक्षण देण्यासाठी मुंबईतील बहुतांश पालक आग्रही असल्याचं चित्र आहे.  वाणिज्य शाखेपाठोपाठ विद्यार्थ्यांची विज्ञान शाखेला पसंती आहे. सर्वात कमी प्रतिसाद कला शाखेला मिळत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. 

संबंधित बातम्या : 

पोलीस भरतीच्या 2 लाख उमेदवारांची व्यथा, मनोज जरागेंना मंत्र्यांचा फोन; शंभूराज देसाईंकडून आश्वासन

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील शाळांसाठी उन्हाळी सुट्टी जाहीर, 2 मे पासून ते 14 जून पर्यंत शाळा राहणार बंद 
राज्यातील शाळांसाठी उन्हाळी सुट्टी जाहीर, 2 मे पासून ते 14 जून पर्यंत शाळा राहणार बंद 
२०२६ मध्ये तुमचे करिअर बदलू शकणारे टॉप ग्लोबल फायनान्स सर्टिफिकेशन्स
२०२६ मध्ये तुमचे करिअर बदलू शकणारे टॉप ग्लोबल फायनान्स सर्टिफिकेशन्स
Bhandara Education News: वाघाच्या जबड्यात शिक्षणाची वाट! डिजिटल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, कोणी एसटीत घेईना, जंगलातून चालत शाळेपर्यंतचा प्रवास
वाघाच्या जबड्यात शिक्षणाची वाट! डिजिटल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, कोणी एसटीत घेईना, जंगलातून चालत शाळेपर्यंतचा प्रवास
सांगोला पेपर चोरी प्रकरण! भूगोलाचा अभ्यास झाला नसल्यानं पठ्ठ्यानं थेट पेपरचीच केली चोरी, पोलिसांनी घेतलं ताब्यात
सांगोला पेपर चोरी प्रकरण! भूगोलाचा अभ्यास झाला नसल्यानं पठ्ठ्यानं थेट पेपरचीच केली चोरी, पोलिसांनी घेतलं ताब्यात

व्हिडीओ

Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Houthi Rebels : कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
US-Iran War : पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
Kerosene : 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, परवानगी किती दिवसांसाठी?
21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय,परवानगी किती दिवसांसाठी?
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
Embed widget