एक्स्प्लोर

FYJC Admission : मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज, अकरावीच्या सामान्य गुणवत्ता यादीबाबत मोठी अपडेट, कोणत्या शाखेला सर्वाधिक पसंती?

FYJC Admission : मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अकरावीची सामान्य गुणवत्ता यादी 27 जूनला जारी होणार आहे.

मुंबई : दहावीचे निकाल (SSC Exam Result) जाहीर होत असताना राज्यातील अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला (FYJC Admission ) सुरुवात झाली होती. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला होता. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. मुंबई विभागातील (Mumbai Division ) अकरावी प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी जारी करण्यात आली आहे. यामध्ये नऊ विद्यार्थ्यी शंभर टक्के असणार आहेत. मुंबई विभागात अकरावीमध्ये प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या सर्वांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. 


मुंबई विभागातील जारी करण्यात आलेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीनुसार 2 लाख 47 हजार 664 जागांसाठी 2 लाख 38 हजार 953 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उपलब्ध जागांपेक्षा कमी अर्ज आल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळं विद्यार्थ्यांना त्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. अकरावी प्रवेशाची सामान्य गुणवत्ता यादी 27 जूनला जारी होणार आहे. 


मुंबई विभागातील विद्यार्थ्यांची पसंती वाणिज्य शाखेला असल्याचं स्पष्ट झालं आहे. 1 लाख 20 हजार विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेसाठी नोंदणी केली आहे. त्यापाठोपाठ 93 हजार 895 विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली आहे. कला शाखेसाठी केवळ 20429 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात होणार आहे. पहिली सामान्य फेरी, त्यानंतर विशेष फेरीतून प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. 

तात्पुतरत्या गुणवत्ता यादीतील माहितीनुसार 54 टक्के विद्यार्थी  हे 99 ते 99.99 टक्के गुण मिळवणारे आहेत. 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांना 60 ते 79.99 गुण आहेत. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 2 लाख 34 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. याशिवाय आयसीएसईच्या 13837 तर सीबीएसईच्या 10858 च्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील माहिती आणि अचूकता तपासून विद्यार्थ्यांनी 21 जून पर्यंत दुरुस्तीसाठी विनंती करण्याच्या सूचन देण्यात आलेल्या आहेत.

मुंबईतील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, अमरावतीमध्ये केंद्रीय प्रवेश प्रकियेद्वारे अकरावीचे प्रवेश दिले जातात. मुंबईतील अकरावीच्या एकूण जागांपेक्षा कमी अर्ज दाखल झाल्यानं विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल. दुसरीकडे मुंबईतील विद्यार्थ्यांचा कल हा विज्ञान आणि कला शाखेच्या तुलनेत वाणिज्य शाखेकडे सर्वाधिक आहे. आपल्या मुलांना वाणिज्य शाखेतून शिक्षण देण्यासाठी मुंबईतील बहुतांश पालक आग्रही असल्याचं चित्र आहे.  वाणिज्य शाखेपाठोपाठ विद्यार्थ्यांची विज्ञान शाखेला पसंती आहे. सर्वात कमी प्रतिसाद कला शाखेला मिळत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. 

संबंधित बातम्या : 

पोलीस भरतीच्या 2 लाख उमेदवारांची व्यथा, मनोज जरागेंना मंत्र्यांचा फोन; शंभूराज देसाईंकडून आश्वासन

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं

व्हिडीओ

NCP Merger : विलिनीकरणाचा हुकलेला मुहूर्त, अजितदादांच्या नेत्यांकडून सावध भूमिका Special Report
Special Report Pune Police : बांगलादेशी तरुणीची पोलिसांकडे धाव, मदतीऐवजी महिला पोलिसाकडून विश्वासघात
Bhandara Crime 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखांना विक्री, डॉक्टरचा प्रताप,5 जणांवर गुन्हा Special Report
Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget