एक्स्प्लोर

Vasai Crime : चप्पल आणि बॅग ठेवण्यावरून वाद, वसईत प्रवाशी लॉजमध्ये ड्रायव्हरने चाकूने वार करत गायकाला संपवलं

Vasai Murder : आरोपी राजेश शहा हा व्यक्ती या लॉजमध्ये गेल्या चार वर्षांपासून राहतोय, तर मृत व्यक्ती चारच दिवसांपूर्वी राहायला आला होता. 

वसई : चप्पल, बॅग ठेवण्यावरून वसईत प्रवाशी लॉज मध्ये एका 54 वर्षाच्या व्यक्तीची धारदार हत्याराने छातीत वार करून निर्घृणपणे हत्या (Vasai Crime) केली असल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. या बाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे. राजेश शहा ( वय 54) असे आरोपीचे नाव आहे तर राधाकृष्ण व्यंकटरमन ( वय 58 ) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

आरोपी आणि मृत व्यक्ती हे दोघेही वसई रोड पश्चिम परिसरातील एका प्रवाशी लॉज मध्ये राहत होते. आरोपी राजेश शहा हा वाहन चालक असून मागच्या चार वर्षांपासून या लॉज मध्ये राहत होता. तर हत्या झालेले राधाकृष्ण हे गायक असून मागच्या चार दिवसांपूर्वीच या लॉज मध्ये राहण्यासाठी आले होते. आज दुपारच्या सुमारास बॅग आणि चप्पल ठेवण्यावरून या दोघांत वादविवाद सुरू झाला होता

दोघांमधील हा वाद वाढला आणि या वादातून राजेश शहा याने चक्क धारदार चाकूने राधाकृष्ण यांच्या छातीत एक जोरदार वार केला. त्यात चाकू त्यांच्या छातीत रुतून बसला. हा रुतून बसलेला चाकू काढण्याचा प्रयत्न झाला, पण तो निघाला नाही. शेवटी लॉज व्यवस्थापकाला ही घटना कळाल्यावर त्याने जखमीला बाजूच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान जखमीचा मृत्यू झाला. याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली आहे.

आईच्या चारित्र्यावर संशय घेत मुलाने केली हत्या

गेल्या महिन्यात वसईत अशीच एक घटना घडली होती. वसईच्या माजिवली देपिवली ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्य महिलेची तिच्याच मुलाने राहत्या घरात गळा चिरुन हत्या केली. ही घटना वसई तालुक्यातील देपीवली गावात रविवारी (20 ऑगस्ट) रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली होती. सुनिता सुनिल घोघरा (वय 36 वर्षे) असे या महिलेचे नाव असून ती याच गावात आपल्या कुटुंबासह राहत होती. ही महिला मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत माजिवली देपिवली ग्रामपंचायतमधून ग्रामपंचायत सदस्यपदी निवडूनही आली होती. स्वत:च्या मुलाने आईच्या चारित्र्यावर संशय घेत कुऱ्हाडीने वार करत आईची हत्या केली आहे. आरोपी मुलगा 17 वर्षांचा आहे. 

सुनिता घोघरा वालीव परिसरात नोकरीला जात होती रविवार सुट्टी असल्याने या दिवशी ती घरात होती. रात्रीचे जेवण करुन महिला आपल्या खोलीत झोपी गेली असता तिच्या अल्पवयीन मुलाने आपल्या तिच्यावर कुऱ्हाडीने तीन वार करुन घराबाहेर गेला. काही वेळाने मृत महिलेचा पती घरी आल्यावर त्याने आपल्या पत्नीला जखमी अवस्थेत बघून तिला उपचारांसाठी भिवंडी येथे रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मात्र संबंधित घटनेची नोंद मांडवी पोलिसात करण्यात आली. पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत तिचा पतीला ताब्यात घेतले. मात्र त्यानंतर  मुलाची चौकशी केली असता आपणच आईची हत्या केल्याचे मुलाने कबूल केले. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

ही बातमी वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget