Mumbai Crime: मुंबईत गुन्हे शाखेची मोठी कारवाई, दादरमधून 10 कोटींचे ड्रग्ज जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
अटक करण्यात आलेल्या आरोपींवर माटुंगा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai: मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने दादर परिसरात मोठी कारवाई करत तब्बल 10 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले आहेत. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी एक आरोपी पश्चिम बंगालचा असल्याची माहिती समोर आली आहे. एनकाउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या दया नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता तब्बल 5 किलो एमडी ड्रग्स आढळले. (Mumbai Crime)
माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अटक करण्यात आलेल्या आरोपींवर माटुंगा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची तस्करी कुठून आणि कुठे केली जात होती, याचा तपास पोलीस करत आहेत.
ड्रग माफियांचा सुळसुळाट, चौकशी सुरु
मुंबईसह उपनगरांमध्ये अमली पदार्थांचा वाढता सुळसुळाट रोखण्यासाठी पोलिसांनी आक्रमक मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर दादरमध्ये केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी सुरू केली असून, यामागे मोठे ड्रग रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबई पोलिसांनी अलीकडच्या काळात ड्रग माफियांविरोधात केलेल्या कारवाया वाढल्या आहेत. या अगोदरही लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. मात्र, ड्रग्सचा प्रवाह थांबत नसल्याने पोलिसांनी आता आणखी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी कोणाचे या रॅकेटमध्ये कनेक्शन आहे का, याचा शोध घेतला जात आहे. दोन आरोपींची पोलीस कोठडी मिळवून तपास अधिक वेगाने केला जाणार आहे.
कल्याणमध्ये चुलत भावाची भयंकर पद्धतीनं हत्या
कल्याणधील काटेनमोली परिसरात बुधवारी रात्री एका व्यक्तीचा खून करण्यात आला. येथील नाना पावशे चौकात ही घटना घडली. रंजीत दुबे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रंजीत दुबे (Ranjit Dube) याची त्याचा चुलत भाऊ राम सागर यानेच त्याची हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रंजीत दुबे आणि रामसागर (Ram Sager) यांच्या कुटुंबात गावच्या जमिनीवरुन वाद होता. याच वादातून राम सागर यांनी आपल्या चुलत भावाला निर्घृणपणे संपवले. या घटनेनंतर कोळशेवाडी पोलिसांनी (Kalyan Police) राम सागर याच्यावर गुन्हा दाखल केला होता. अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी राम सागर याला बेड्याही ठोकल्या.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
