एक्स्प्लोर

Cyber Attack : भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक, जाणून घ्या त्यामागचे कारण

 Cyber attack on India : नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबर यांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगातील मुस्लिम देश आणि संघटना भारतावर नाराज आहेत

मुंबई :  देशातल्या अनेक सरकारी वेबसाईटवर सायबर हल्ला झाला. ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह सत्तर वेबसाईट हॅक करण्यात आल्या. मलेशियातील हॅक्टिविस्ट  ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशभरातील अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या. या ग्रुपनं जगभरातल्या मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर अटॅक करण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्रसह सर्व भारतातील अनेक वेबसाईट आज सकाळी हॅकर्स कडून हॅक करण्यात आल्या होत्या. अचानक झालेल्या या सायबर हल्ल्यानंतर पोलिसांची सायबर गुन्हे शाखा पुरती गोंधळून गेली होती. कुणी केला होता हा सायबर अटॅक आणि त्यामागचे कारण काय हे जाणून  हे जाणून घेऊया. 

नुपूर शर्मा यांचं वक्तव्य, मंदिर-मशिद वादाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाच संदेश या वेबसाईटवरून देण्यात आला. पहाटे 4 पासून हॅक करण्यात आलेली ठाणे पोलिसांची वेबसाईट दुपारी बाराच्या सुमारास पूर्ववत करण्यात यश आलं. हॅकर्सकडून डेटा पुन्हा मिळवण्यात यश आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. 

 सकाळीच ठाणे पोलिसांच्या अधिकृत वेबसाईट हॅक झाल्यान खळबळ उडाली. कोणालाच कळेना की नेमके काय झाले आहे. 
 ठाणे शहर पोलिसांची वेब साईट ओपन केल्यावर हॅक बाय वन हॅट सायबर टीम असा संदेश येत होत. त्याखाली, भारत सरकारला उद्देशून असे सांगण्यात आले होते की, तुम्ही वारंवार इस्लाम धर्मासमोर अडचणी निर्माण करत आहात.  तुम्हाला सहनशीलता कळत नाही, लवकरात लवकर सर्व मुस्लिम बांधवांची माफी मागा नाही तर आम्ही गप्प बसणार नाही.  फक्त ठाणे पोलीसच नाही तर हळूहळू महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील इतर देखील अनेक सरकारी आणि खाजगी संस्थांच्या वेबसाईट कोणीतरी हॅक केल्याचे निष्पन्न झाले आणि महाराष्ट्र सरकारला देखील याची दखल घ्यावी लागली. 

 एकीकडे गृहमंत्री प्राथमिक माहिती सांगत होते तर दुसरीकडे महाराष्ट्र पोलिसांची सायबर क्राईम टीम या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत होती. आणि सायबर क्राईम टीमच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या.  या सर्व वेबसाईटच्या हॅकिंग मागे जागतिक हॅकर्स असल्याचे काही वेळातच स्पष्ट झाले. एकाच वेळी अनेक वेबसाइट हॅक केल्यामुळे हा एक सायबर हल्ला असल्याचे तज्ज्ञ बोलू लागले. मात्र त्यांनी अचानक भारतावर हा सायबर हल्ला का केला असा प्रश्न विचारला जाऊ लागला. तर याचे उत्तर होते नुपुर शर्मा प्रकरण. 

 नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबर यांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगातील मुस्लिम देश आणि संघटना भारतावर नाराज आहेत. त्यातच मलेशिया येथील हॅक्टीविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्स यांनी भारताविरुद्ध सायबर वॉर सुरू केले आहे. आपल्या ट्विटर अकाउंट वरून त्यांनी जगभरातल्या हॅकर्स लोकांना भारतावर सायबर अटॅक करण्याचे आव्हान केले आहे. यासोबतच इंडोनेशिया आणि इतर देशातील हॅकर्सनी भारताविरोधात ops patuk सुरू केले आहे याचा अर्थ होतो स्ट्राइक बँक. सरकारी वेबसाईट हॅक होण्याची ही पहिलीच घटना असून याआधी देखील अनेक महत्वाच्या सरकारी वेबसाईट हॅक झालेल्या आहेत. यासाठी आपल्या इथे असलेली कमकुवतच सायबर सुरक्षा कारणीभूत आहे असे तज्ञांचे मत आहे.  

नुपुर शर्मा प्रकरणामुळे संपूर्ण जगभरात मुस्लिम संघटना मुस्लिम देश आणि मुस्लिम अतिरेकी गट यांनी भारताविरुद्ध नाराजी व्यक्त करून आपापल्या परीने भारताचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे. अल कायदासारख्या अतिरेकी गटाने देखील भारताला इशारा दिला आहे. त्यातच भारतावर आता हॅकर्स करून देखील सायबर हल्ला केले जात आहेत. यामुळे भारतातील सरकारी अधिकृत वेबसाइटवर असलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण डेटा लिंक होण्याची शक्यता जास्त आहे. आणि असे झाले तर याची खूप मोठी किंमत भारत सरकारला मोजावी लागेल. 

संबंधित बातम्या :

भारतावर सायबर हल्ला! ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BEST Election Result: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचा बेस्ट पतपेढी निवडणुकीत पराभव; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचा बेस्ट पतपेढी निवडणुकीत पराभव; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले...
Sumeet Raghavan On Poor Road Conditions: 'रस्त्यावरची कुत्री, कबुतरं यांपेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी आहेत देशात...'; गडकरी-फडणवीसांना टॅग करुन मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केला संताप
'रस्त्यावरची कुत्री, कबुतरं यांपेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी आहेत देशात...'; गडकरी-फडणवीसांना टॅग करुन मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केला संताप
Maharashtra Heavy Rain: मुंबईनंतर पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, पंचगंगा धोक्याच्या पातळीला, पंढरपुरात चंद्रभागा नदीचं पाणी शिरलं
मुंबईनंतर पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, पंचगंगा धोक्याच्या पातळीला, पंढरपुरात चंद्रभागा नदीचं पाणी शिरलं
मोठी बातमी! पावसात भिजलेल्या मुंबईकरांनो 72 तासांत वैद्यकीय सल्ला घ्या; आयुक्तांचे आवाहन, लेप्टोच्या संसर्गाची शक्यता
मोठी बातमी! पावसात भिजलेल्या मुंबईकरांनो 72 तासांत वैद्यकीय सल्ला घ्या; आयुक्तांचे आवाहन, लेप्टोच्या संसर्गाची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BEST Election Result: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचा बेस्ट पतपेढी निवडणुकीत पराभव; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचा बेस्ट पतपेढी निवडणुकीत पराभव; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले...
Sumeet Raghavan On Poor Road Conditions: 'रस्त्यावरची कुत्री, कबुतरं यांपेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी आहेत देशात...'; गडकरी-फडणवीसांना टॅग करुन मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केला संताप
'रस्त्यावरची कुत्री, कबुतरं यांपेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी आहेत देशात...'; गडकरी-फडणवीसांना टॅग करुन मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केला संताप
Maharashtra Heavy Rain: मुंबईनंतर पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, पंचगंगा धोक्याच्या पातळीला, पंढरपुरात चंद्रभागा नदीचं पाणी शिरलं
मुंबईनंतर पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, पंचगंगा धोक्याच्या पातळीला, पंढरपुरात चंद्रभागा नदीचं पाणी शिरलं
मोठी बातमी! पावसात भिजलेल्या मुंबईकरांनो 72 तासांत वैद्यकीय सल्ला घ्या; आयुक्तांचे आवाहन, लेप्टोच्या संसर्गाची शक्यता
मोठी बातमी! पावसात भिजलेल्या मुंबईकरांनो 72 तासांत वैद्यकीय सल्ला घ्या; आयुक्तांचे आवाहन, लेप्टोच्या संसर्गाची शक्यता
नाशिकमध्ये दोन मजली इमारत कोसळली, मलाब्याखाली नागरिक अडकले, सहा ते सात जण जखमी 
नाशिकमध्ये दोन मजली इमारत कोसळली, मलाब्याखाली नागरिक अडकले, सहा ते सात जण जखमी 
Stocks to Watch: शेअर बाजारात तेजी सुरु, सेन्सेक्स निफ्टीवर 21 ऑगस्टला 'या' सात स्टॉकवर लक्ष ठेवा, कमाईची संधी 
शेअर बाजारात तेजी सुरु, सेन्सेक्स निफ्टीवर 21 ऑगस्टला 'या' सात स्टॉकवर लक्ष ठेवा, कमाईची संधी 
जिल्हा परिषदेच्या 1183 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; कारवाई होणार, सीईओंचे आदेश
जिल्हा परिषदेच्या 1183 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; कारवाई होणार, सीईओंचे आदेश
EPFO June Pay Roll Data : ईपीएफओकडून जून महिन्याचा पे रोल डेटा जाहीर, 21.89 लाख सदस्यांची वाढ, महाराष्ट्र टॉपवर
ईपीएफओकडून जून महिन्याचा पे रोल डेटा जाहीर, 21.89 लाख सदस्यांची वाढ, महाराष्ट्र टॉपवर
Embed widget