एक्स्प्लोर

Chhatrapati sambhaji nagar crime: 'दीडशहाण्या तुझा कार्यक्रमच करतो, माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे', माजी आमदाराच्या मुलाची धमकी; सरकारी अधिकारीही शेवटपर्यंत नडला, म्हणाला....

Chhatrapati sambhaji nagar news: 'तुला माझी रेंज दाखवतो, तू 15 हजार पगार घेणारा चतुर्थश्रेणी कर्मचारी'; माजी आमदाराच्या मुलाने सरकारी अधिकाऱ्याला धमकावलं, ऑडिओ क्लीप व्हायरल

छत्रपती संभाजीनगर: जायकवाडी धरणाच्या कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्यात आलेले आहे मात्र हे सोडलेले पाणी ज्या कालव्यांचे रोटेशन पूर्ण झालेले आहे, ते कालवे मुरुम टाकून बंद करण्यात आले आहेत. याचमुळे शेतकरी आणि पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद होत आहेत. सेलूतील नंबरच्या वरखेडवरून वडीला जाणाऱ्या कालव्याच्या बंद केलेल्या पाण्यावरून पाथरीचे माजी आमदार यांचा मुलगा गोविंद वडीकर आणि कालवा निरीक्षक कृष्णा आकात यांच्यातही फोनवरून जोरदार वादावादी झाल्याचे ऑडियो क्लिप द्वारे समोर आले आहे.

दोघांच्या संभाषणातील एक ऑडियो सध्या वायरल होत आहेत ज्यात गोविंद वडीकर यांच्याकडून बंद केलेलं पाणी पुन्हा सोडण्यासाठी कालवा निरीक्षक कृष्णा आकात यांना धमकावण्यात आले आहे. तुम्ही पाणी बंदच कसे केले शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यामुळे होत आहे. पाणी सोड, मी खुप अधिकारी बघितले आहेत. त्यांच्या बदल्याही केल्या आहेत. माझ्याकडे बंदूक पण आहे, अशाप्रकारे गोविंद वडीकर हे आकात यांना धमकावत असल्याचे या ऑडियो क्लिप मधून समोर आले आहे. आकात हे मला वरिष्ठांचा आदेश आहे, तुम्ही त्यांना बोला, असे म्हणत आहेत. मात्र, वडीकर ऐकायला तयार नाहीत. मी पालकमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार राजेश विटेकर यांनाही बोलतो. ते एका मिनिटात माझा फोन उचलतात, असेही वडीकर आकात यांना म्हणत आहेत. या व्हायरल झालेल्या या ऑडियो क्लिपची पुष्टी 'एबीपी माझा' करत नाही.

नेमकं काय संभाषण झालं?

गोविंद वडीकर यांनी कालवा निरीक्षक कृष्णा आकात यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी म्हटले की, मी माझी आमदार वडीकर साहेबांचा मुलगा बोलताय संभाजीनगरवरुन. तुम्ही ते 54 चारीचं पाणी बंद केलं, तिकडे आमचा 10-12 एक ऊस आहे, तो जळून चाललाय. त्यावर कृष्णा आकात यांनी सांगितले की, 54 चारी नेहमी चालू असल्यामुळे सगळ्या चाऱ्यांमध्ये मुरुम टाकलाय आपण. त्यावर गोविंद वडीकर यांनी आकात यांना, तुमच्याकडे लेखी आदेश आहे का?, असे विचारले. तेव्हा आकात यांनी वरिष्ठांची तोंडी सूचना हादेखील आदेशच असतो, असे म्हटले. त्यामुळे गोविंद वडीकर चांगलेच संतापले. त्यांनी म्हटले की, मी उद्या अधीक्षक अभियंत्यांना भेटतो. तुमच्या गेल्या चार-पाच वर्षांपासून खूप तक्रारी आहेत, आकात साहेब. मी आमदाराचा मुलगा आहे. तुम्ही सहकार्य करा, तुम्ही लोकांचे ऊस जाळू नका. उद्या मी तिकडे 50 पोरं घेऊन येतो. तुम्हाला लोकं कॅनॉलमध्ये ढकलून देतील. चार वर्षांपूर्वी तुम्हाला पोलीस संरक्षण घ्यावे लागले होते ना. मी तिकडे आल्यावर माझ्याकडं रिव्हॉल्व्हर असते, मी दम धरणारा नाही, असे गोविंद वडीकर यांनी म्हटले.

त्यावर कृष्णा आकात यांनी वडीकर यांना ठणकावून उत्तर दिले. आम्हाला साहेबांनी जो आदेश दिला आहे,  त्याप्रमाणे आम्हाला करावे लागते. मला तुम्ही वरिष्ठांचा आदेश आणून द्या. तुम्ही माझी बदली कुठे गडचिरोलीला करणार ना?, असे त्यांनी म्हटले. त्यावर गोविंद वडीकर आणखी संतापले. मेघना बोर्डीकर आमचं जिल्ह्यातील लोकांचं पाहतील की तुमच्यासारख्या बाहेरुन आलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचे पाहतील. तुम्ही मला उद्या रोखून दाखवा, असे त्यांनी म्हटले. मी तुझी बदली नाही तुला सस्पेंड करेन. माझं चॅलेंज आहे. मी चार आमदार खिशात घेऊन फिरतो. आमदार राजेश विटेकर एका मिनिटांत माझा फोन उचलतात, म्हणतात, बोला गोविंदराव. तुम्ही शेतकरी आहे, लोकांना 15 दिवस पाणी बंद करता का?, असे गोविंद वडीकर यांनी म्हटले.

कृष्णा आकात यांनी यावर पुन्हा एकदा गोविंद वडीकर यांना उत्तर दिले. तुमचे वडील माजी आमदार होते. जलसंपदा खात्याची प्रॉपर्टी असते, त्याची एक समिती असते. त्या समितीचा अध्यक्ष जलसंपदा मंत्री असतो. तुम्ही आम्हाला एवढं दाबताय ना, तुम्ही हीच हिंमत संभाजीनगरला धरणावर दाखवली तर तुमच्या शेतात पाणी-पाणी होऊन जाईल. तुम्ही कोणालाही फोन लावला तर मी सामान्य माणूस आहे, मी माझ्या परीने माझ्यासाठी काय करायचं ते करेन, असे कृष्णा आकात यांनी म्हटले.

त्यावर गोविंद वडीकर यांनी म्हटले की, तुम्ही स्वत:चं नुकसान करु नका. तुम्ही आमदाराच्या मुलाला शिकवणार का? तुमच्यासारखे 50 लोक मी कामाला लावलेत. तुमच्यासारखा चतुर्थश्रेणी कर्मचारी मला शिकवणार का? मी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचं ऐकत नसतो. तुझी-माझी काय रेंज आहे. तुम्ही मला जास्तच दीडशहाणे दिसता. आता मी तुमचाच कार्यक्रम लावतो, लिहून घ्या लिहून. दोन महिन्यांनी, सहा महिन्यांनी लावेन, पण लावेन. लीडरच्या समोरून आणि गाढवाच्या समोरुन जाऊ नये, असे म्हणतात. तुम्ही उद्या फक्त पाणी सोडू नका. मग दाखवतो आमदाराचा पोरगा काय करु शकतो, ते दाखवतो. औकातीत राहायचं, 15 हजार पगार आहे ना, ठेव फोन, उद्या दाखवतो तुला, असे गोविंद वडीकर यांनी म्हटले.

आणखी वाचा

कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
Amit Satam: संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
Ghulam Nabi Azad: झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambernath Shivsena Leader Accident : अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याचा कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Malegaon Morcha : मालेगावचा आक्रोश! आरोपी फाशीच्या मागणीसाठी हजारोंचा मार्चा Special Report
Deshmukh Family : विरोधकाशी बट्टी, मुलाची सोडचिठ्ठी; देशमुख पितापुत्रात गृहकलह Special Report
Thane BJP and Shivsena Rada : शिंदेंचा बालेकिल्ला, श्रेयवादावरून कल्ला Special Report
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
Amit Satam: संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
Ghulam Nabi Azad: झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
Dharashiv Accident: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, गाडीचे टायर्स फुटले, धाराशिवमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, गाडीचे टायर्स फुटले, धाराशिवमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू
Local Train Block: मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा खोळंबा; ट्रेनचे बदलले मार्ग, वेळेत बदल, कुठल्या लोकल रद्द? पाहा सविस्तर
मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा खोळंबा; ट्रेनचे बदलले मार्ग, वेळेत बदल, कुठल्या लोकल रद्द? पाहा सविस्तर
D Mart sale: आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
Amabadas Danve: भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
Embed widget