Beed VIDEO : संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी उभे केलेल्या महिलेची हत्या? मृतदेह सडलेला, जागेवरच पोस्टमॉर्टम आणि अत्यंविधी; अंजली दमानियांचा दावा
Santosh Deshmukh Murder Case: संबंधित महिला ही वाल्मिक कराडसाठी काम करत होती. अनेकांवर खोटे आरोप करण्यासाठी ही महिला पाच नावांचा वापर करायची असाही दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

मुंबई : संतोष देशमुख यांना चुकीच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी उभे करण्यात आलेल्या महिलेची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. मनिषा उघाडे असं त्या महिलेचं नाव असून संतोष देशमुखांनी अनैतिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यासाठी या महिलेला कराड गँगकडून तयार करण्यात आलं होतं. या महिलेचा बीड जिल्ह्यात कळंबमध्ये पाच दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असून पोलिसांनी जागेवरच पोस्टमॉर्टम आणि अत्यंविधी उरकल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.
संबंधित महिला ही वाल्मिक कराडसाठी काम करायची. लोकांवर अनैतिक अत्याचार केल्याचा दावा करण्यासाठी कराड गँगकडून या महिलेचा वापर करण्यात येत होता. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर त्यांच्यावरही खोटा आरोप करण्यासाठी या महिलेला तयार करण्यात आलं होतं.
देशमुखांचा मृतदेह घेऊन जाणारी अँब्युलन्स कळंबच्या दिशेने नेण्यात येत होती. पण देशमुखांच्या मित्रांच्या गाड्या त्या अँब्युलन्ससोबत असल्याने पोलिसांचा हा डाव उलटला असल्याचं समोर आलं होतं. आता याच महिलेची हत्या झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
पाच दिवसांपूर्वीच हत्या झाल्याचा दावा
या महिलेचा पाच दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असून ती हत्या आहे असं अंजली दमानिया म्हणाल्या. पोलिसांना ही माहिती मिळताच कंबळमधील घराचा दरवाजा तोडून बीड पोलीस व स्थानिक पोलिसानी आत प्रवेश केला. त्या ठिकाणी या महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेह सडलेला आसल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले आणि अंत्यविधीही उरकला असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय.
काय म्हटलंय अंजली दमानियांनी?
गुढ संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या?
संतोष देशमुखावर अनैतीक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगर मधे राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळतय.
या महिलेची ७ ते ८ दिवसापुर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.
कुठल्या कारणाने हत्या झाली अन बीड पोलीसांना ही बातमी कळाली अन ते घटना स्थळी पोहचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलीसाना कळाली व अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतीक संबधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. असं असलं तरी शहर आणि परिसरात या घटनेने दहशत पसरली आहे.
शहरातील द्वारका नगरीत राहणाऱ्या लोकांना २ दिवसांपासून उग्र वास येत होता. पन ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते.
दरवाजा तोडून बीड पोलीस व स्थानिक पोलीसानी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला. व मृतदेह सडलेला आसल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोष्टमार्टम केले व अंत्यविधी ही उरकला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत
गुड संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या ?
संतोष देशमुखावर अनैतीक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगर मधे राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळतय.
या महिलेची ५ दिवसापुर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.
कुठल्या कारणाने हत्या झाली अन बीड पोलीसांना ही बातमी कळाली अन ते घटना स्थळी पोहचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलीसाना कळाली व अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतीक संबधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. असं असलं तरी शहर आणि परिसरात या घटनेने दहशत पसरली आहे.
शहरातील द्वारका नगरीत राहणाऱ्या लोकांना २ दिवसांपासून उग्र वास येत होता. पन ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते.
दरवाजा तोडून बीड पोलीस व स्थानिक पोलीसानी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला. व मृतदेह सडलेला आसल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोष्टमार्टम केले व अंत्यविधी ही उरकला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी ती खाली दिलेल्या नावांचा वापर करायची
१)मनीषा आकुसकर आडस
२)मनीषा बिडवे कळंब
३)मनीषा मनोज बियाणी कळंब
४)मनीषा राम उपाडे अंबाजोगाई
५)मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी
गुड संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 31, 2025
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या ?
संतोष देशमुखावर अनैतीक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगर मधे राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळतय.
या महिलेची ७ ते ८ दिवसापुर्वी…























