एक्स्प्लोर

विमा कंपनी क्लेम नाकारत असेल तर काय करावं? 'या' दोन मार्गांनी मिळू शकतो क्लेम!

विमा कंपन्या अनेकवेळा विम्याचा क्लेम नाकारतात. यामुळे विमाधारकाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. अशा वेळी अन्य मार्गांनीही विम्याचा क्लेम करता येतो.

मुंबई : भविष्यात कोणतेही आर्थिक संकट येऊ नये म्हणून विमा हा उत्तम पर्या आहे. आरोग्य विमा, जीवन विमा, अपघात विमा अशा वेगवेगळ्या प्रकारचे विमे काढून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. पण अनेकवेळा आपण प्रत्यक्ष अडचणीत सापडल्यांतर जेव्हा विमा कंपन्यांकडे आपला विमा क्लेम करायला जातो, तेव्हा आपल्या हाती निराशाच येते. विमा कंपन्या अनेकवेळा लोकांचे क्लेम रिजेक्ट करतात. अशा वेळी विमाधारकापुढे निराशेशिवाय दुसरे काहीही नसते. अशा वेळी घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य ठिकाणी तुम्ही तक्रार दिल्यावर किंवा योग्य ठिकाणी अधिक चौकशी केल्यावर तुम्हाला विम्यावरील क्लेम (Insurance Claim) मिळू शकतो.  

भविष्यकालीन सुरक्षिततेसाठी विमा काढणाऱ्या लोकांना ऐनवेळी अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून आयआरडीएआयने विमा कंपन्यांना अनेक नियम घातलेले आहेत. या नियमांच्या अधीन राहूनच विमा कंपन्यांना लोकंचा विमा काढावा लागतो आणि क्लेम केलेल्या विम्यांना मंजुरी द्यावी लागते.

विम्याचे क्लेम नाकारले का जातात? 

वेगवेगळी कारणं समोर करून विमा कंपन्या क्लेम नाकारतात. याची काही कारणं आहेत. पॉलिसी घेताना किंवा क्लेम करताना पॉलिसी होल्डर्स योग्य माहिती देत नाहीत. पॉलिसींच्या अटी नाकारल्यावरदेखील कंपन्या क्लेम नाकारतात. विमा क्लेम करताना विमाधारकांनी संपूर्ण कागदपत्रे कंपन्यांना देणे अपेक्षित असते. पण तसे न झाल्यामुळे कंपन्या क्लेम नाकारतात. मात्र विमा धारकांनी येथेच थांबू नये. कारण विमा घेण्याचे अन्य पर्यायही आहेत. 

क्लेम नाकारल्यावर काय करावे? 

एखाद्या कंपन्यांनी तुमचा क्लेम नाकारल्यास घाबरून जाऊ नये. अशा वेळी विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. त्यांच्याकडे क्लेम नाकारला गेल्याची तक्रार करावी. अनेकवेळा योग्य माहिती न दिल्यामुळेही क्लेम नाकारला जातो.अशा स्थितीत तक्रार निवारण अधिकाऱ्याशी चर्चा केल्यानंतर क्लेम स्वीकारला जाऊ शकतो. दुसरा मार्ग म्हणजे IRDAI कडे जाऊनही क्लेम नाकारण्यात आल्याची तक्रार करताय येते.

मेल किंवा कॉल करूनही तक्रार करता येते

विमा कंपनीकडे तक्रार करूनही क्लेम स्वीकारला जात नसेल तर थेट IRDAI कडे तक्रार करता येते. Complaints@irdai.gov.in या ई-मेलवरही IRDAI कडे थेट तक्रार करता येते. यासह 1800 4254 732 किंवा 155255  टोल फ्री क्रमांकांवरही कॉल करून तुम्हाला तुमची तक्रार दाखल करता येते. 

हेही वाचा :

करप्रणालीत बदल कसा करावा? नव्या वर्षात हे शक्य आहे का? जाणून घ्या सविस्तर

SIP करताय पण चौपट, पाचपट परतावा हवाय? मग 'या' सूत्राचा अवलंब करा अन् खोऱ्याने पैसे ओढा!

आलिशान बंगला, महागडी कार, विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आहे कोट्यवधीची मालकीण, एकूण संपत्ती किती?

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
Gold Silver Price Today: सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget