एक्स्प्लोर

RBI : आता यूपीआयला क्रेडिट कार्ड लिंक होणार, आरबीआयचा महत्त्वाचा निर्णय

Credit Cards Links to UPI : यूपीआयद्वारे व्यवहार आणखी वाढवण्यावर आरबीआयचा भर असून त्याचाच भाग म्हणून आता यूपीआयला क्रेडिट कार्ड लिंक करण्यात येणार आहे.

मुंबई : आरबीआय आता यूपीआय अर्थात यूनिफाईड पेमेन्ट्स इंटरफेस (Unified Payments Interface -UPI) संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. येत्या काळात क्रेडिट कार्ड यूपीआयला जोडण्यात येणार असून त्यामुळे देशातल्या असंख्य ग्राहकांना, क्रेडिट कार्ड धारकांना याचा फायदा होणार आहे. त्याची सुरुवात रुपे कार्डपासून (RuPay card) करण्यात येणार असल्याची  माहिती आहे. 

कॅशलेस इंडियाकडे वळतांना सर्वात मोठा वाटा होता तो फिनटेक कंपन्यांचा. नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहारात वाढ झाली. त्यातल्या त्यात यूपीआय मार्फत मोठ्या प्रमाणात व्यवहार वाढू लागलेत. यात आणखी भर पडावी यासाठी आरबीआयकडून आणखी एक सुविधा अंमलात आणण्याचा विचार आहे. आता युपीआयच्या माध्यमातून कोट्यवधी ग्राहक केवळ बचतखाते किंवा चालू खात्यातूनच नव्हे तर क्रेडिट कार्डद्वारेही पेमेंट करू शकतील. त्यामुळे युपीआयद्वारे पेमेंट करणं सोपं होईल. 
 
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारा जारी केलेल्या रुपे क्रेडिट कार्डद्वारे याची सुरुवात होईल. सिस्टिम विकसित होत असताना इतर कार्ड जसे मेस्ट्रो, व्हिजा क्रेडिट कार्डसारख्या कार्डसाठी देखील ही सुविधा उपलब्ध होईल. या निर्णयाचा शेअरबाजारावरही परिणाम बघायला मिळाला. एसबीआय कार्ड, पेटीएम, ॲक्सिस बॅंकसारख्या बॅंकांचे देखील शेअर्स वधारलेत. याचं मुख्य कारण, बॅंकांसोबतच फिनटेक कंपन्यांना ही सुविधा गेमचेंजर मानली जात आहे. 

कसा होणार फायदा?

  • देशात तब्बल 10 लाख कोटींहून अधिकचे व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून होतात.
  • यूपीआयला 26 कोटी वापरकर्ते तर 5 कोटी व्यापारी जोडले गेलेत.  
  • मे महिन्यात युपीआयद्वारे 594.63 व्यवहार झाले आहेत. ज्यात 10.40 लाख कोटींचे व्यवहार एकट्या यूपीआयद्वारे झाल्याची माहिती आरबीआयनं दिली आहे.
  • यूपीआयद्वारे व्यवहार आणखी वाढवण्यावर आरबीआयचा भर आहे. 
  • ग्राहकांना या निर्णयाचा फायदा तर होईलच, सोबतच बॅंकिंग सिस्टिम, फिनटेक कंपन्या आणि पेमेंट गेटवेंना देखील मदत होईल.
  • मागील अनेक दिवस गटांगळ्या खात असलेल्या पेटीएमचे शेअर्स देखील वधारल्याचे चित्र आहे 

यूपीआयची व्याप्ती वाढवण्यासोबतच रुपी कार्डद्वारे व्यवहार वाढवण्यावरही सरकारचा भर आहे. मात्र, आतापर्यंत तुम्ही तुमच्या खिशात जितके पैसे असायचे तितकेच पैसे खर्च करायचा. आता मात्र तुम्ही यूपीआयद्वारे तुमच्या खिशात नसलेले पैसेही वापरू शकणार आहात. त्यामुळे जर तुम्ही क्रेडिट कार्डच्या बिलचे नियोजन नीट करत असाल तर हा निर्णय तुमच्या फायद्याचा आहे, नाहीतर तुमच्यावरील कर्ज वाढण्याचा धोका देखील आहे. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Eknath Shinde Majha Katta :मुंबई,श्रेयवाद,ठाकरे बंधू ते महायुती! एकनाथ शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Tejasvee Ghosalkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
Embed widget