एक्स्प्लोर

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादलं, आता केंद्राचं संसदेत उत्तर,पीयूष गोयल यांनी दोन्ही देशांच्या चर्चेत काय काय घडलं ते सांगितलं....

Piyush Goyal on Trump Tariff: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी भारत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर असल्याचं सांगितलं.   

नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ आणि दंड लादण्याची घोषणा केली. यानंतर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत संसदेत उत्तर दिलं. ते म्हणाले की अमेरिकेनं भारतावर जे टॅरिफ लादले आहेत त्याचा काय परिणाम होईल हे समजून घेतलं जात आहे. देशाचं हित सुरक्षित करण्यासाठी आणि पुढं जाण्यासाठी जे आवश्यक असेल ती पावलं उचलली जातील, असंही ते म्हणाले.  

10 ते 15 टक्क्यांवर चर्चा झालेली 

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी "भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार कराराला अंतिम रुप देण्यासाठी महत्त्वाच्या बैठका झाल्या. आयातीवर 10-15 टक्के टॅरिफची चर्चा झाली होती. दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष चार बैठका पार पडल्या तर अनेकदा डिजीटल माध्यमातून चर्चा झाली, असंही गोयल यांनी सांगितलं. ते म्हणाले, अगोदर टॅरिफ 9 एप्रिलपासून लागू होणार होतं, मात्र 10 एप्रिलला 90 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं.त्यानंतर ही मुदत 1 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती.  

गोयल म्हणाले की भारत आणि अमेरिका यांच्यातील द्वीपक्षीय व्यापार समझोता यावर मार्च 2025 मध्ये चर्चा सुरु झाली होती. कराराचा पहिला टप्पा ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा होता. दोन्ही देशांमध्ये पहिली बैठक 29 मार्च 2025 ला दिल्लीत झाली होती, त्यावेळी द्वीपक्षीय चर्चा सुरु करण्यासाठी टीओआरला अंतिम रुप देण्याबाबत चर्चा सुरु होत्या.  

गोयल म्हणाले दोन्ही देशांमध्ये चार फेऱ्यांमध्ये समोरासमोर बैठका झाल्या. निर्धारित टीओआरनुसार द्वीपक्षीय व्यापार कराराला अंतिम रुप देण्याचं काम करायचं होतं. गोयल म्हणाले केंद्र सरकार सध्याच्या घडामोडींचा काय परिणाम होईल याचं परीक्षण करत आहे. सरकार शेतकरी, श्रमिक, उद्योजक, निर्यातदार, लघू आणि मध्यम उद्योग यासह उद्योग विश्वातील सर्व स्टेक होल्डर्सच्या हितांचं रक्षण करण्यास सर्वोच्च महत्त्व देईल. आम्ही आपल्या राष्ट्रीय हितांना सुरक्षित करण्यास आणि ते पुढं नेण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलेल.

पीयूष गोयल यांनी भारताची अर्थव्यवस्था पाच कमजोर अर्थव्यवस्थांमधून बाहेर पडून गेल्या दशकात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था झाली आहे, असं म्हटलंय. भारत आपल्या सुधारणा आणि शेतकरी, एमएसएमई आणि उद्योजकांच्या कठोर मेहनतीच्या जोरावर पहिल्या पाच अर्थव्यवस्था पोहोचला आहे.  भारत लवकरच जगातील तिसरी अर्थव्यवस्था होईल, असंही ते म्हणाले.  पीयूष गोयल यांनी भारतानं गेल्या 11  वर्षात अनेक देशांसोबत व्यापार करार केल्याची माहिती देखील दिली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
BMC Election 2026 Rahul Narvekar: 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
Embed widget