एक्स्प्लोर

Train Ticket Refund New Rules : भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, कन्फर्म तिकीट रद्द केल्यास किती रिफंड मिळणार? रेल्वेनं नियम बदलले, जाणून घ्या 

Indian Railway : भारतीय रेल्वेनं कन्फर्म तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशांना रिफंड किती द्यायचा या संदर्भातील नियमांमध्ये बदल केला आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेनं कन्फर्म तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशांना किती रक्कम परत द्यायची यासंदर्भातील नवे नियम जारी केले आहेत. नव्या नियमानुसार एखाद्या प्रवाशाकडे कन्फर्म तिकीट असेल आणि त्यानं ट्रेन सुटण्यापूर्वी  24 ते 72 तासांच्या काळात तिकीट रद्द केल्यास त्यानं तिकिटासाठी मोजलेल्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम कपात करुन राहिलेली रक्कम त्याला दिली जाईल. ट्रेन सुटण्यापूर्वी 8 तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास रिफंड दिला जाणार नाही.

कन्फर्म तिकीट रद्द करण्यासंदर्भातील नियम (Train Ticket Refund New Rules)

1. एखाद्या प्रवाशाकडे रेल्वे प्रवासासाठी आरक्षित केलेलं कन्फर्म तिकीट असेल आणि त्यानं ती ट्रेन सुटण्यापूर्वी 72 तासांच्या अगोदर तिकीट रद्द केलं तर त्याला अधिकाधिक रक्कम दिली जाईल. यातून प्रति प्रवासी फक्त किमान तिकीट रद्द फी वजा केली जाईल. 
 
2. तुमच्याकडे ट्रेनचं कन्फर्म तिकीट असेल आणि तुम्ही ट्रेन सुटण्यापूर्वी 72 ते 24 तासांच्या कालावधीत ते तिकीट रद्द केल्यास तिकीट दराच्या 25 टक्के रक्कम किमान शुल्क म्हणून वजा करुन राहिलेली रक्कम प्रवाशाला परत केली जाईल. 

3. ट्रेन सुटण्यापूर्वी प्रवाशानं 24 ते 8 तासांच्या कालावधीत तिकीट रद्द केल्यास तिकीटाच्या 50 टक्के रक्कम वजा केली जाईल आणि राहिलेली रक्कम प्रवाशाला दिली जाईल. 

4. जर तुम्ही ट्रेन सुटण्यापूर्वी  8 तासांच्या कालावधीत तिकीट रद्द केलं तर कोणत्याही प्रकारची रक्कम परत दिली जाणार नाही. 

रेल्वे तिकीट रद्द करण्यासंदर्भातील प्रक्रिया

तुम्ही जर तिकीट एखाद्या रेल्वे स्टेशनच्या काऊंटरवरुन तिकीट बुक केलं असेल तर रेल्वे प्रवास संपणाऱ्या स्टेशनला रद्द करावं लागत होतं. आता मात्र,  कणत्याही स्टेशनवर तिकीट रद्द करु शकता. ई तिकीट काढणाऱ्यांना यापूर्वी ऑनलाईन टीडीआर फाईल करावा लागायचा. आता टीडीआर फाईल करावा लागणार नाही, ऑटोमेटिक रिफंड जमा केला जाईल.

बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी देखील आता ट्रेन निघण्यापूर्वी 30 मिनिटांपर्यंत देण्यात आली आहे. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी ही सुविधा देण्यात आली आहे. रेल्वे तिकीट रिफंड संदर्भातील नियम 1 ते  15 एप्रिल दरम्यान लागू केले जाऊ शकतात.

दरम्यान, भारतीय रेल्वेकडून तिकीट आरक्षित करण्यासंदर्भातील नियमांमध्ये देखील यापूर्वी मोठे बदल करण्यात आले आहेत. रेल्वेच्या नियमानुसार 60 दिवसांच्या कालावधीसाठी रेल्वे तिकीट बुक करता येते. याशिवाय रेल्वे तिकीट बुकिंग सुरु झाल्यानंतर सुरुवातीचा काही वेळ आधार प्रमाणीकरण केलेल्या प्रवाशांसाठी राखीव करण्यात आले आहेत. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बांधण्यासाठी मिळणार स्वस्त कर्ज,  रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय 
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बांधण्यासाठी मिळणार स्वस्त कर्ज,  रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय 
Income Tax Return: आयटीआर फायलिंग दोन आठवड्यांमध्येच करुन घ्या, आयटीआर-1 फाईल करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक? 31 जुलैनंतर किती दंड भरावा लागणार?
आयटीआर फायलिंग दोन आठवड्यांमध्येच करुन घ्या, 31 जुलैनंतर किती दंड भरावा लागणार?
Amitabh Bachchan Ranbir Kapoor Invested In Ayodhya: राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
Business News : किर्लोस्कर ब्रदर्सच्या यूके शाखेला 150 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचा शेअर किती रुपयांवर?
Business News : किर्लोस्कर ब्रदर्सच्या यूके शाखेला 150 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
Embed widget