एक्स्प्लोर

Sugar Export : कमी पावसाचा फटका... साखरेचे उत्पादन घटण्याचा अंदाज, सण-उत्सव, निवडणुकीमुळे साखर निर्यातीवर बंदी?

Sugar Export Ban : कमी पावसाचा फटका साखर उत्पादनाला बसण्याची शक्यता आहे. साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारकडून साखर निर्यातीवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली गहू आणि तांदळानंतर आता केंद्र सरकार साखर निर्यातीवर (Sugar Export) बंदी घालण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यापासून साखर उत्पादनाचा नवीन हंगाम सुरू होणार आहे. त्यावेळी निर्यात बंदीचा निर्णय होऊ शकतो. हा निर्णय झाल्यास, मागील सात वर्षानंतर पहिल्यांदा साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली जाईल. 

यंदाच्या मान्सूनमध्ये पाऊस न पडल्याने ऊस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आगामी सणासुदीचा हंगाम आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालू शकते.

'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने सरकारी अधिकाऱ्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. सरकाचे पहिले लक्ष्य हे देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेची गरज पूर्ण करणे, तसेच अतिरिक्त साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर आहे. येत्या हंगामासाठी सरकारकडे निर्यात कोट्यासाठी पुरेशी साखर उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. 

भारताने यावर्षी 30 सप्टेंबरपर्यंत केवळ 6.1 दशलक्ष टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे, तर गेल्या हंगामात 11.1 दशलक्ष टन साखर निर्यात झाली होती. भारताने साखर निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यास जगभरात साखरेच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. न्यूयॉर्क आणि लंडन बेंचमार्कच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते जिथे साखर आधीच अनेक वर्षांच्या उच्चांकावर व्यापार करत आहे. असे झाले तर अन्नधान्याच्या महागाईत जगभरात मोठी वाढ दिसून येईल.

ऊसाची लागवड केलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात मान्सूनमध्ये फक्त 50 टक्के पाऊस झाला आहे. या दोन राज्यांमध्ये देशातील 50 टक्के साखरेचे उत्पादन होते. पावसाअभावी या हंगामात साखरेचे उत्पादन कमी होईल. मात्र पुढील हंगामात ऊस लागवडीवर परिणाम होऊ शकतो. 2023-24 हंगामात भारताचे साखर उत्पादन 3.3 टक्क्यांनी घटून 31.7 दशलक्ष टन होईल असा अंदाज आहे.

दरम्यान, मागील दोन महिन्यात महाराष्ट्रातही पावसाने सर्वत्र हजेरी लावली नाही. साखर उत्पादन (Sugar Production) करणार्‍या क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत नसल्याने त्याचा परिणाम  साखर उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. त्याच्या परिणामी शेतकरी आणि साखर कारखान्याचे आर्थिक गणित तर बिघडणार आहेच सोबतच साखरेच्या दरावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा वगळता ऊस साखर कारखानदारी असणार्‍या अहमदनगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. नेमका हाच पट्टा साखर कारखानदारीशी निगडीत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बांधण्यासाठी मिळणार स्वस्त कर्ज,  रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय 
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बांधण्यासाठी मिळणार स्वस्त कर्ज,  रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय 
Income Tax Return: आयटीआर फायलिंग दोन आठवड्यांमध्येच करुन घ्या, आयटीआर-1 फाईल करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक? 31 जुलैनंतर किती दंड भरावा लागणार?
आयटीआर फायलिंग दोन आठवड्यांमध्येच करुन घ्या, 31 जुलैनंतर किती दंड भरावा लागणार?
Amitabh Bachchan Ranbir Kapoor Invested In Ayodhya: राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
Business News : किर्लोस्कर ब्रदर्सच्या यूके शाखेला 150 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचा शेअर किती रुपयांवर?
Business News : किर्लोस्कर ब्रदर्सच्या यूके शाखेला 150 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Embed widget