एक्स्प्लोर

निवडणुकीच्या काळातच डाळीच्या दरात मोठी वाढ, सरकार घेणार मोठा निर्णय

Pulse Prices : सध्या डाळींच्या किंमतीत देखील वाढ होतेय. यामुळं सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.   

Pulse Prices : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) रणसंग्राम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. या काळात कोणत्याही वस्तू महाग होऊ नये आणि त्याचा रोष सरकारवर येऊ नये म्हणून सत्ताधारी प्रयत्न करतायेत. महागाई वाढू नये म्हणून सरकारकडून विविध धोरणं आखली जातायेत. दरम्यान, सध्या डाळींच्या किंमतीत देखील वाढ होतेय. यामुळं सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महागाई वाढू नये असा सरकारचा प्रयत्न आहे.

डाळींच्या किंमती 100 रुपयांच्या आसपास

सध्या बाजारात डाळींच्या किंमती 100 रुपयांच्या आसपास गेल्या आहेत. सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरु आहेत, अशातच किंमतीत वाढ होत असल्यानं सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळं महागाई नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकार आता डाळींच्या व्यापाऱ्यांवर निर्बंध आणण्याची तयारी करत आहे.

व्यापाऱ्यांना डाळींचा साठा जाहीर करणे बंधनकारक

दरम्यान, सरकार डाळी व्यापाऱ्यांना डाळींचा साठा जाहीर करणे बंधनकारक करण्याची शक्यता आहे. मोठे व्यापारी आणि किरकोळ विक्रेते या दोघांनाही त्यांचा साठा जाहीर करावा लागेल. यामुळं सरकारला व्यवस्थापन करणं सोपं जाईल. त्यामुळं दरावर नियंत्रण ठेवणं शक्य होईल. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून डाळींच्या दरात वाढ होत आहे. डाळींचे दर 100 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. याचा सर्वसामान्यांना फटका बसतोय. 

कांद्यावर निर्यातबंदी

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम आहे. सगळीकडे या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गरम झालं आहे. या काळात कोणत्याही वस्तू महाग होऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. कारण, सामन्या लोक निवडणुकीआधी सरकारवर नाराज होऊ नये आणि याचा फटका निवडणुकीत बसू नये म्हणून सरकारनं सावध पवित्रा घेतलाय. यातीलच एक उदाहरण म्हणजे कांदा निर्यातबंदी. सध्या कांद्यावर निर्यातबंदी सुरु आहे. 8 डिसेंबर 2023 मध्ये सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी घालताना सरकारनं 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम राहणार असल्याची भूमिका घेतली होती. मात्र, 31 मार्चलाही सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी उठवली नाही. जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कांद्यावर निर्यातबंदी कायम राहणार असल्याची भूमिका सरकारनं घेतली आहे. याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरात मोठी घररण झाली आहे. त्यामुळं कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. 

महत्वाच्या बातम्या:

Pulses Price Hike: एका वर्षात तूर डाळ 27 टक्क्यांनी महागली; डाळींची अजून भाववाढ होण्याची शक्यता

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget