एक्स्प्लोर

Explainer : शेल कंपन्यांसाठी कोलकाता 'नंदनवन'; असा होतो काळा पैसा पांढरा

Shell Companies In Kolkata : सध्या सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप-प्रत्यारोपात शेल कंपन्यांचा उल्लेख होत आहे. या शेल कंपन्यांचे पत्ते कोलकातामधील असल्याचे म्हटले जाते. कोलकाता शेल कंपन्यांचे नंदनवन असल्याचे म्हटले जाते.

Shell Companies In Kolkata :  भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आरोप करताना शेल कंपन्यांचा (बनावट कंपन्या) सातत्याने उल्लेख केला. या बनावट कंपन्या कोलकातामधील असल्याचे समोर आले होते. याआधीदेखील अनेक शेल कंपन्या कोलकातामधील असल्याचे दिसून आले होते. सेबीच्या एका अहवालानुसार, बंदी घातलेल्या 40 टक्के शेल कंपन्या कोलकातामधील असल्याचे सेबीच्या एका अहवालात समोर आले होते. 

शेल कंपन्यांबाबत केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली होती. या अहवालात अनेक गोष्टी समोर आल्यात. कोलकाता हे बनावट कंपन्यांसाठी नंदनवन असल्याची चर्चा सुरू असते. केंद्र सरकारच्या एका अहवालानुसार काळा पैशांतील 48 टक्के पैसा या शेल कंपन्यांच्या मार्फत पांढरा केला जातो.  यामध्ये कोलकातामधील शेल कंपन्यांचा मोठा वाटा असतो. या शेल कंपन्यांमध्ये अनेक राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याने या कंपन्यांवर कारवाई होत नसल्याची चर्चा सुरू असते. कोलकातामधील एकदा तपासणीच्या वेळेस  एक सीए 800 कंपन्यांच्या बॅलेन्स शीटवर सही करताना आढळून आला. 

कोलकाताच पसंतीचे ठिकाण का?

कमी कर असल्याने शेल कंपन्यांची पसंती कोलकाताला असल्याचे म्हटले जाते. सन 2017 मधील एका वृत्तानुसार, कोलकातामधील कंपन्यांना 24 टक्के कर भरावा लागत होता. कोलकातामध्ये शेल कंपनी तयार करण्यासाठी एन्ट्री ऑपरेटरला 50 ते 70 हजार रुपये अथवा ठरलेला हिस्सा द्यावा लागतो. त्यांच्या मार्फत कंपनी नोंदणी आणि कर भरला जात असल्याचे म्हटले जाते. 

काळा पैसा पांढरा कसा होतो?

काळा पैसा पांढरा करण्यामध्ये एन्ट्री ऑपरेटरची महत्त्वाची भूमिका असते. एखाद्याला काळा पैशातील एक कोटी रुपये पांढरे करायचे असतील तर तो मूळ मालक एक लाख रुपये एन्ट्री ऑपरेटरला देईल. त्यानंतर एन्ट्री ऑपरेटर प्रति 10 रुपये या दराने 10 हजार शेअरमध्ये विभागणी करेल. प्रत्येक शेअर हा शेल कंपन्यांच्या संचालकांना सुमारे एक हजार रुपयांच्या प्रीमियमवर विकला जाईल. 

बनावट कंपन्यांच्या द्वारे एक लाख रुपयांचे मूल्य एक कोटी रुपये होईल. त्यानंतर ही रक्कम मूळ मालकाकडे जाते. यासाठी एन्ट्री ऑपरेटर शुल्क आकारतो. अनेकदा या कंपन्यांचे संचालक हे चहा विक्रेते, सुरक्षा रक्षक, वाहन चालक, रोजंदारीवर काम करणारे असतात. 

सीएचा गट कार्यरत 

शेल कंपन्यांच्या व्यवहारांमध्ये सीएचा (लेखा परीक्षक) एक गट कार्यरत असल्याची चर्चा सुरू असते. आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, किमान 5000 हजार रुपयांसाठी कागदपत्रांवर सही करणारे अनेक 'संचालक' मिळतात. त्याशिवाय, एन्ट्री ऑपरेटर आणि दलालांकडून एकाच ठिकाणांवरून एकाच वेळी शेकडो कंपन्या चालवल्या जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

कोलकात्यामधील 75 टक्के शेल कंपन्यांचे सीए हे व्यावसायिक सीए नसतात. त्यांच्याकडे योग्य अर्हतादेखील नसते. कंपनी स्थापन करण्यासाठी सीए असावा असे नाही. याबाबतचे पुस्तकी ज्ञान असलेली व्यक्तीदेखील ही कंपनी स्थापन करू शकते. सीए हा कंपनीतील व्यवहारांना प्रमाणित करतो. कंपनीला प्रमाणित करत नाही, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले. विशेष म्हणजे मुंबईपेक्षा कोलकातामधील सीए हे कमी दरात काम करतात. त्यांचे शुल्क मुंबईच्या तुलनेत चारपटीने कमी आहे. कोलकाता शेअर बाजार 2013 मध्ये बंद केल्यानंतर शेल कंपन्यांचे व्यवहार काही प्रमाणात कमी झाले होते, असे म्हटले जाते. 

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget