एक्स्प्लोर

EPFO ने केला महत्त्वाच्या नियमात बदल, कोट्यवधी कर्मचाऱ्यांची डोकेदुखीपासून सुटका; वाचा सविस्तर!

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांची डोकेदुखी कमी होणार आहे.

मुंबई : निवृत्तीनंतर आर्थिक चणचण भासू नये यासाठी कर्मचारी 'कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना'नेच्या (ईपीएफओ) खात्यामध्ये प्रतिमहिना ठराविक रक्कम जमा करत करतात. कर्मचाऱ्यांना हीच रक्कम निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन म्हणून दिले जाते. कर्मचाऱ्याने कामाची संस्था बदलल्यावर त्याने जमा केलेली रक्कम (PF) नव्या संस्थेकडे वर्ग करावी लागायची. आता मात्र ईपीएफओने आपल्या नियमांत बदल केला असून कर्मचाऱ्यांना आपला पीएफ ट्रान्सफर करावा लागणार नाही. या नियमामुळे देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार आहे. 

कर्मचाऱ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागायचा?

कर्मचाऱ्याने आपल्या कामाची संस्था बदलल्यावर त्याने ईपीएफओ खात्यात जमा केलेली पीएफ रक्कम नव्या संस्थेच्या पीएफ खात्यात वर्ग करावी लागायची. त्यासाठी कर्मचाऱ्यांना वेगळा फॉर्म-31 भरावा लागायचा. यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) असूनदेखील कर्मचाऱ्यांना त्यासाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करू फॉर्म भरावा लागायचा. ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर जुन्या संस्थेतील पीएफ रक्कम कर्मचाऱ्याच्या नव्या संस्थेच्या पीएफ खात्यात वर्ग केली जायची. ही प्रक्रिया पार पाडताना कर्मचाऱ्यांकडून अनेक चुका व्हायच्या. प्रक्रियेची पूर्ण माहिती नसल्यामुळे यात बराच वेळ जायचा. आता मात्र ईपीएफओने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची डोकेदुखी संपणार आहे. जुन्या संस्थेतील पीएफ रक्कम नव्या संस्थेच्या खात्यात वर्ग करण्यासाठी आता कर्मचाऱ्यांना वेगळी प्रक्रिया पार पाडावी लागणार नाही. 

ईपीएफओने नेमका काय निर्णय घेतला आहे? 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या नियमांत महत्त्वाचा बदल केला आहे. आता नव्या नियमानुसार कर्मचाऱ्याने कामाच्या संस्थेत बदल केल्यास जुन्या संस्थेच्या पीएफ खात्यातील पैसे नव्या संस्थेच्या पीएफ खात्यात आपोआप ट्रान्सफर होणार आहेत. म्हणजेच कर्मचाऱ्याला आता फॉर्म-३१ भरण्याची गरज नाही. ईपीएफओच्या या निर्णयामुळे पीएफ ट्रान्सफर करून घेताना कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडणार नाही.

ईपीएफओ नेमकं काय करते?

दरम्यान, ईपीएफओच्या नियमानुसार कर्मचाऱ्याला भविष्य निर्वाह निधी म्हणून त्याच्या पगारातील 12 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा करावी लागते. एवढीच रक्कम संबंधित संस्थादेखील कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करत असते. याच पीएफ खात्यात जमा झालेली रक्कम कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून दिली जाते. 

यूएएन नंबरची गरज काय? 

कर्मचारी आपल्या नोकरीदरम्यान अनेक संस्था बदलतात. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची अनेक पीएफ खाती असतात. ही सर्व पीएफ खाती यूएएन नंबरच्या माध्यमातून एकत्र जोडली जातात. यूएएन नंबर असेल तर कर्मचाऱ्याला त्याची याआधीच्या संस्थेतील सर्व पीएफ खाती पाहता येता. याच क्रमांच्या मदतीने कर्मचारी त्याचे यूएएन कार्ड आणि पीएफचे पासबूकही डाऊनलोड करू शकतो.

हेही वाचा :

'पिंक टॅक्स' म्हणजे काय रे भाऊ? महिलांना कसं लुटलं जातं? वाचा...

सोनं रोजच खातंय भाव! पण का? सोन्याचा दर कसा ठरवतात? समजून घ्या सोप्या शब्दांत!

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
Embed widget