एक्स्प्लोर

बाप्पा माझा

कोकणातला गणेशोत्सव माझ्या हृदयाच्या जवळ आहे. इथला गणपती अजून कमर्शिअल झालेला नाही किंवा तो मुंबईसारखा इन्स्टंट आणि वेगवानही नाही. तो परंपरा जपतो. डेकोरेशनही पारंपरिक. देवघरात मंडपी बांधण्याची पद्धत आहे. मंडपी म्हणजे बाप्पाच्या डोईवरचं छत. तेरडा, सुपारी, हिरणीची फुलं, थोडक्यात त्या काळात उपलब्ध असलेल्या निर्सगातल्या सौंदर्याने बाप्पालाही सजवलं जातं. आणि इथला बाप्पा चित्रशाळेतून घरी डोईवरुनच येतो. कोकणात आजही मुंबईतल्यासारखा बाप्पा पोटाशी धरुन आणला जात नाही.

या वर्षी गणपती कधी आहेत..? सप्टेंबरला का..? मग आपल्याला जून-जुलै महिन्यातच बुकिंगचं बघावं लागेल. शनिवार-रविवार जोडून आहेत का..? मग तशी सुट्टी टाकायला. घरात नव्या वर्षाचं कॅलेंडर आलं की हा संवाद ठरलेलाच. कारण कोकण, कोकणातली माणसं आणि त्यांचा लाडका गणपती हे खास नातं आहे. त्याच्याशी वर्षभारतली ही अपॉईमेंट ठरलेली. त्यात कोणताच बदल नाही. किंवा कॉम्प्रमाईज नाही. गावातला गणेशोत्सव कोकणातल्या प्रत्येक माणसाचा हळवा आणि स्वप्नाळू कोपरा. कोकणात जावं तर गणेशोत्सवातच. या बद्दल माझं दुमत नाही. मी नशिबवान आहे असं म्हणते कारण मला कोकणातला म्हणजे अगदी तळ कोकणातला गणेशोत्सव लहानपणापासून जवळून अनुभवायला मिळतो. बाप्पा माझा गणपतीत कोकणातल्या गावी जाण्याची मजा काही वेगळीच. लहानपणी, शाळा, अभ्यास, क्लास, सुट्ट्या या कसलंच टेन्शन नसायचं. पण या काळात म्हणजे २०-२५ वर्षांपूर्वी मला आणि ताईला गणपतीसाठी गावी घेऊन जाणं आई-पप्पांसाठी खूप त्रासदायक होतं. तेव्हा कोकण रेल्वेची चैन नव्हती, गावात लाईट नव्हते, रस्त्यांचा पत्ता नाही, आमची गाई-गुरं नसल्यानं ताब्यांभर दूध मिळवणंही मुश्किल. रस्ता नसल्यानं घरापर्यंत एसटी नाहीच. एकदम करेक्ट सांगता येणार नाही पण मुख्य हायवेपासून घरी पोहोचण्यासाठी किमान तीनेक किलोमीटर्सची पायपीट ठरलेली. आणि हो, तेव्हा या प्रवासात पाऊस आत्तासारखा भाव खात नव्हता, तर तो धो-धो बरसायचा. माझं गावं सावडाव, खलांत्री वाडी. कणकवलीपासून सहा मैलांवर. माझ्या लहानपणी एसटीतून आम्ही जानवली किंवा हुंबरटला उतरायचोय तिथे चहाचं टपरीवजा दुकान होतं, कदाचित आताही असेल!  तिथे चवीला पांचट आणि गोड चहा प्यायचो आणि वाट तुडवायला(  तीन किलोमीटरची) सुरुवात. आजोबा आम्हाला घ्यायला यायचे. या प्रवासातली सगळ्यात भारी आठवण म्हणजे एका वहाळाची. वहाळ म्हणजे पाण्याचा छोटा ओढा. कोकणातल्या गावागावात असे लहान-मोठे वहाळ तुम्हाला बघायला मिळतील. पावसाच्या दिवसात या वहाळाला तुफान पाणी असायचं. त्याच्यावर पूल नव्हता. पप्पा किंवा आजोबा आम्हाला उचलून घ्यायचे. कोसळणारा पाऊस, पाण्यातनं काढायची वाट, हातातलं सामान आणि छत्री. प्रचंड करसतीचा हा प्रवास मला जाम थ्रिलींग वाटायचा. त्या वहाळाच्या पाण्याचा आवाज मात्र त्या वयात भीतीदायकच होता. काही वर्षांनी या वहाळावर साकव (पूल) बांधला आणि तो थ्रिलींग प्रवास तिथेच संपला. बाप्पा माझा गावी रात्री जाम भीती वाटायची. कारण गावात लाईटच नव्हते. कंदील आणि पेट्रोमॅक्सच्या बत्तीत आपण गावी दिवस काढलेत यावर आज सांगूनही विश्वास बसत नाही. जेवतानाची एक गंमत म्हणजे गावचा हातसडीचा तांदूळ लाल असतो, हा लाल भात आम्ही खाणार नाही यासाठी पसरलेलं भोकाड लख्ख आठवतंय. आणि आज जरा डाएट कॉन्शिअस झाल्यावर गावावरुन येताना तब्येतीला चांगला असलेला तोच UNPOLISHED तांदूळ माझ्यासाठी घेऊन ये असं आईला सांगताना जाम हसू येतं. खरंतर गावात आणि कोकणात जायच्या प्रवासात टप्प्याटप्यानं बदल होत गेले. कोकण रेल्वे आणि इतर सोयींमुळे गावाला जाणं खूपच आरामदायी बनलंय. गावी जाताना आता लालपरीची साथ सुटलीय. गावापर्यंत किंबहुना घरापर्यंत रस्ता झालाय. रिक्षा, गाड्या अगदी सहज उपलब्ध होतात. कणकवली रेल्वे स्टेशनवरुन अवघ्या अर्ध्या तासात घरी पोहोचता येतं. गावात लाईट तर केव्हाच आलेत, अगदी स्ट्रीट लाईटमुळे गणपतीच्या काळात दिवाळीचा भास होतो. गावची आणखी एक भारी आठवण म्हणजे पाण्याची. लहानपणी घरात पाण्याचा नळ नव्हता. खरंतर पाणी योजनाच नव्हती. त्यामुळे विहिरीवरुन पाणी भरण्याचं कम्पलशन असायचं. सकाळी उठलं की घरातले मोठे आणि आम्ही पोरं-टोरं पाणी मिशनवर. तासाभराचा हा कार्यक्रम झाला की मग बाकीची कामं. संध्याकाळी घरातलं पाणी संपलं तर पुन्हा मिशनवर निघायचं. आज विहीरीवर पंप बसलाय आणि घरी नळाला पाणी आहे. नगरपंचायतीचं पाणीही दोन तास असतं. आता विहिर सुनी पडलीय. फक्त शास्त्रापुरतंच तिकडे जाणं होतं. आणि लहानपणीच्या पाणी भरण्यासाठी घेतलेल्या छोटे हंडे-कळशा माळ्यावर पडून आहेत. बाप्पा माझा या झाल्या बाकीच्या गप्पा. कोकणातला गणेशोत्सव माझ्या हृदयाच्या जवळ आहे. इथला गणपती अजून कमर्शिअल झालेला नाही किंवा तो मुंबईसारखा इन्स्टंट आणि वेगवानही नाही. तो परंपरा जपतो. आजही घराघरातून नागपंचमीच्या दिवशी गणपतीच्या पाटाची पूजा करुन पाट मूर्तीकाराकडे जातो. हा मूर्तीकार, मूर्तीची ठेवण बऱ्यापैकी ठरलेली असते. डेकोरेशनही पारंपरिक. देवघरात मंडपी बांधण्याची पद्धत आहे. मंडपी म्हणजे बाप्पाच्या डोईवरचं छत. तेरडा, सुपारी, हिरणीची फुलं, थोडक्यात त्या काळात उपलब्ध असलेल्या निर्सगातल्या सौंदर्याने बाप्पालाही सजवलं जातं. आणि इथला बाप्पा चित्रशाळेतून घरी डोईवरुनच येतो. कोकणात आजही मुंबईतल्यासारखा बाप्पा पोटाशी धरुन आणला जात नाही. गणेशोत्सवातला महत्त्वाचा दिवस म्हणजे गौरी आगमन आणि पूजनाचा. गौराई आगमन आणि पूजन हे दोन्ही दिवस सुपरफास्ट स्पीडनं संपतात. गौराईसाठी खास नैवेद्य. भाजणीचे वडे, काळ्या वाटाण्याचं सांबार, लापशी, पाच प्रकारच्या भाज्या, भाकरी, पाल्याची भाजी आणि लापशी. या सगळ्याची चव त्या दिवशी काही वेगळीच लागते. बाप्पा जायच्या दिवशी पुन्हा मोदकांसह सगळं साग्रसंगीत जेवण. बाप्पा निघताना त्याच्यासोबत पुढच्या 11 महिन्यांची शिदोरीही बांधून देण्याची पद्धत इकडे आहे. गावातले सगळे बाप्पा एकत्र येतात आणि आम्हाला बाय-बाय म्हणतात. हा निरोपाचा क्षण खूप भावूक करुन जातो. बाप्पा माझा नशिबानं गावा-गावातल्या गणेशोत्सवांना अजूनही पारंपरिकपणाची झालर आहे. मुंबईत न भेटणारे लोक गावात भेटतात. निर्सग मुक्तहस्तानं हिरव्या रंगाची उधळण करत असताना बाप्पा येतो आणि पुढच्या वर्षभरासाठीचं जगणं रंगीबेरंगी करुन जातो. बाप्पा, आता तर सिंधुदुर्गात विमानही आलंय. प्रवास सोप्पा हाईल, वेळ वाचेल, परिसराचा विकासही वेग पकडेल. पण तुझा उत्सव असाच राहुदे. तू पळू नको. तू असाच आरामात, निवांत आमच्याकडे असलेला आम्हाला आवडतोस. गेली दोन वर्ष तुझ्यासाठी कोकणात येणं जमलं नाहीये रे मला. पण तुझं आगमनच इतकं हर्षोल्हासाचं की कुठेही असो या दिवसात जीव तुझ्यातच गुंततो.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Hardik Pandya Credits Girlfriend Mahieka Sharma: भर मैदानात मिठी, गालावर किस; हार्दिककडून वर्ल्डकप जिंकल्याचं सर्व श्रेय माहिकाला, आता तिनंही पोस्टवर लिहिलीय 'दिल की बात'
भर मैदानात मिठी, गालावर किस; हार्दिककडून वर्ल्डकप जिंकल्याचं सर्व श्रेय माहिकाला, आता तिनंही पोस्टवर लिहिलीय 'दिल की बात'
Nashik Crime: डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, भावाकडून मनोविकारतज्ज्ञ निलेश जेजुरकरांवर गंभीर आरोप , म्हणाला, 'चर्चेसाठी बोलावलं पण...'
नाशिकमध्ये माईंड क्लिनिक चालवणाऱ्या डॉ. निलेश जेजुरकरांच्या पत्नीने आयुष्य संपवलं, भावाचे गंभीर आरोप, म्हणाला...
Hardik Pandya-Mahika Sharma T20 World Cup 2026: मिठी मारली, मैदानात हार्दिक पांड्यासोबत नाचली...; पुढे महिकाने जे केलं संपूर्ण ग्राऊंड स्टाफ बघत बसलं, पाहा PHOTO
मिठी मारली, मैदानात हार्दिक पांड्यासोबत नाचली...; पुढे महिकाने जे केलं संपूर्ण ग्राऊंड स्टाफ बघत बसलं, पाहा PHOTO
ABP Premium

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Hardik Pandya Credits Girlfriend Mahieka Sharma: भर मैदानात मिठी, गालावर किस; हार्दिककडून वर्ल्डकप जिंकल्याचं सर्व श्रेय माहिकाला, आता तिनंही पोस्टवर लिहिलीय 'दिल की बात'
भर मैदानात मिठी, गालावर किस; हार्दिककडून वर्ल्डकप जिंकल्याचं सर्व श्रेय माहिकाला, आता तिनंही पोस्टवर लिहिलीय 'दिल की बात'
Nashik Crime: डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, भावाकडून मनोविकारतज्ज्ञ निलेश जेजुरकरांवर गंभीर आरोप , म्हणाला, 'चर्चेसाठी बोलावलं पण...'
नाशिकमध्ये माईंड क्लिनिक चालवणाऱ्या डॉ. निलेश जेजुरकरांच्या पत्नीने आयुष्य संपवलं, भावाचे गंभीर आरोप, म्हणाला...
Hardik Pandya-Mahika Sharma T20 World Cup 2026: मिठी मारली, मैदानात हार्दिक पांड्यासोबत नाचली...; पुढे महिकाने जे केलं संपूर्ण ग्राऊंड स्टाफ बघत बसलं, पाहा PHOTO
मिठी मारली, मैदानात हार्दिक पांड्यासोबत नाचली...; पुढे महिकाने जे केलं संपूर्ण ग्राऊंड स्टाफ बघत बसलं, पाहा PHOTO
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 Team India Celebration: कुणी रडलं, कुणी माती चेहऱ्याला लावली; टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या सेलिब्रेशनाचे भावूक करणारे दहा PHOTO
कुणी रडलं, कुणी माती चेहऱ्याला लावली; टीम इंडियाच्या सेलिब्रेशनाचे भावूक करणारे दहा PHOTO
Sandeepa Virk Share Tihad Jail Experience: 'दररोज मृत्यूसाठी देवाला साकडं घालायचे...'; तिहार जेलमध्ये शिक्षा भोगून आलेली अभिनेत्री ढसाढसा रडली, आतल्या गोष्टी सांगताना म्हणाली...
'दररोज मृत्यूसाठी देवाला साकडं घालायचे...'; तिहार जेलमध्ये शिक्षा भोगून आलेली अभिनेत्री ढसाढसा रडली, आतल्या गोष्टी सांगताना म्हणाली...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: सगळ्यांना बाहेर काढलं, खिडकीवरील पडदा लावला...; विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन जय शाह सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरला कुठे घेऊन गेले?, VIDEO
सगळ्यांना बाहेर काढलं, खिडकीवरील पडदा लावला...; विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन जय शाह सूर्यकुमार-गंभीरला कुठे घेऊन गेले?, VIDEO
India won T20 World Cup : विश्वविजयी भारत! गौतम गंभीरनेही रचला इतिहास, एमएस धोनीला मागे टाकत तिसऱ्यांदा कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव
विश्वविजयी भारत! गौतम गंभीरनेही रचला इतिहास, एमएस धोनीला मागे टाकत तिसऱ्यांदा कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव
Embed widget