एक्स्प्लोर

इट्स नेव्हर टू लेट टू मेक थिंग्ज राईट !

गेल्या महिन्यात रेल्वे इतिहासातील सर्वात मोठी अशक्य घटना नेदरलॅण्ड्स या देशाने करून दाखवली आणि अख्या जगाने तोंडात बोटे घातली. 1 जानेवारीपासून एनएस (Nederlandse Spoorwegen) डच रेल्वे पूर्णतः पवन उर्जेवर चालणारी जगातली पहिली आणि एकमेव रेल्वे बनली. अनेक देश हे स्वप्न बघत होते. अचानक डच रेल्वे सर्वात पुढे निघुन गेली. या देशाने अशी काही सिस्टीम उभारली की पवन चक्कीचे प्रत्येक पाते एक ट्रेन चालवू शकेल. डच रेल्वे दिवसाला 5500 ट्रेनच्या फेऱ्या चालवते. या सर्व इलेक्ट्रिक ट्रेन आहेत. आता यापुढे ही प्रत्येक ट्रेन कोणतेही कार्बन फुटप्रिंट न ठेवता धावेल आणि प्रत्येक प्रवासी देखील पर्यावरणाला वाचवण्यात हात भार लावेल. याहूनही आश्चर्याची गोष्ट पुढे आहे. जेव्हा अपारंपरिक स्त्रोतापासून ट्रेन चालवायची असे डच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ठरवले, तेव्हा 2018 हे लक्ष ठेवण्यात आले होते. पण एक वर्ष आधीच हा प्रोजेक्ट 100% पूर्ण आणि यशस्वी या देशाने करून दाखवला. आता एक तास चालणारी एक पवन चक्की 120 मैलाची ऊर्जा एखाद्या ट्रेनला देईल. आणि हो, सर्व ट्रेन एसी आहेत बरं का! आपल्या सारख्या नाहीत. याचेच अनुकरण आता इतर देश करतील, ज्यात आपणही असू. कदाचित लवकरच आपले ‘प्रभु’ नेदरलॅण्डसाठी एखादा अभ्यास दौरा देखील काढतील. पण उपयोग काय तर शून्य! आज आपण एखादया मार्गाचे विद्युतीकरण करण्यासाठी बजेटमध्ये तरतुदी करत आहोत. उदाहरणार्थ कोकण रेल्वे. इतक्या प्राथमिक पातळीवर आपण सध्या आहोत. ते पूर्ण करण्याचे टार्गेटही बरीच वर्षे आहे. नाही म्हणायला, मुंबई, चेन्नई, इथल्या लोकल्स आणि पुणे-मुंबईसारखे मार्ग विजेवर चालतात. पण डिझेल इंजिनाचा असलेला सिंहाचा वाटा यामुळे भरून निघत नाही. 2015-16 साली रेल्वेच्या इंधनावर झालेला एकूण खर्च 31,220 कोटी इतका होता. त्यात 18,536 कोटींचं द्रव इंधन होते, तर 10,436 कोटींची वीज इंधन म्हणून वापरली गेली. आजही आपण 2.4 बिलियन गॅलेन इतके प्रचंड इंधन वापरतो. म्हणजे आधी आपल्याला संपूर्ण मार्ग विजेवर चालणारे करावे लागणार आणि मग पुढचा पर्याय पवन किंवा सौर उर्जेचा. त्यामुळे घोडा मैदान अजुन लांब आहे असेच वाटते. इट्स नेव्हर टू लेट टू मेक थिंग्ज राईट ! त्यातल्या त्यात सुरेश प्रभू आल्यावर वेगवेगळे प्रयोग केले गेले. त्यात 5% बायोडिझेल मिसळून गाड्या चालवल्या गेल्या. जो प्रयोग खरच उपयोगाचा ठरतो आहे. नंतर काही लोको आणि कोचवर सौर उर्जेचे पैनल बसवले गेले. पण हे सर्व अजूनही बालवाडीमधले वाटते. आपल्यासमोर डच रेल्वे ग्रॅज्युएट म्हणावी लागेल. असो. डच रेल्वेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 2015 साली पवन उर्जेवर रेल्वे चालवायची हे निश्चित करण्यात आले. त्यानंतर Eneco या कंपनी सोबत करार करण्यात आला आणि 2018 हे साल प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निश्चित करण्यात आले. पण या Eneco कंपनीने हे सर्व काम एक वर्ष आधीच पूर्ण केले आणि या एक वर्ष्यात होणारे प्रदूषणही थांबवले. त्यामुळे डच रेल्वे आतापासूनच ‘ग्रीन रेल्वे’ हे बिरुद मिरवेल. हाही भाग भारतीय रेल्वेसाठी अवघड वाटतो आहे. कारण इथे 10 ते 15 वर्षे जुने मंजूर प्रकल्प आजही निधीअभावी धूळ खात पडले आहेत. निधी उपलब्ध झाला तरी, जमिनीचे हस्तांतर, त्याचा मोबदला, त्याच्या कोर्ट केसेस या आणि अशा अनेक अनैसर्गिक संकटात हे प्रकल्प रखडतात. काही ठिकाणी अधिकारी चुकीचे निर्णय घेतात. त्यामुळे ते प्रकल्प रखडतात. आपण सध्या जी सुरुवात केलीय आणि आपल्या कामाचा वेग अतिशय कमी असल्याने येत्या 20 वर्षात एखादा मार्ग जरी अपारंपरिक ऊर्जेवर सुरु करण्यात आला तरी आश्चर्य मानावे लागेल. आपल्या येथील प्रवाशांना देखील यासाठी काही करावे असे वाटत नाही. एक दोन ट्रेन उशिरा आल्या की लगेच संपूर्ण व्यवस्था बंद पाडणारे आपले प्रवासी कधी पर्यावरण पूरक प्रकल्पसाठी आंदोलन करतील का? यासाठी प्रवासी देखील अशा गोष्टींसाठी आग्रही असले पाहिजेत, तरच असे प्रकल्प यशस्वी होऊ शकतील. आपले रेल्वे मंत्री सुरेश प्रभू सध्या शर्थीचे प्रयत्न करून भारतीय रेल्वेला तोट्याच्या ट्रॅकवरुन विकासाच्या ट्रॅकवर आणायचा प्रयत्न करत आहेत. अगदी काही प्रमाणात त्याला यश देखील मिळत आहे. त्यामुळे आपल्याकडे प्रयत्न होत नाहीत असे नाही पण अनेक गोष्टींचा अभाव आपल्या विकासाच्या आड येतो. त्यामुळे उशिरा का होईना, सुरुवात झाली हेच आपल्यासाठी यशप्राप्त करण्याप्रमाणे आहे. म्हणतात ना, It's never too late to make things right.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
Team India Coach: गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?
गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?

व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी  यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
Team India Coach: गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?
गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
Rajesh Kshirsagar: रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
Nashik Crime News: सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
Embed widget