एक्स्प्लोर

Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?

Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: एबीपी माझाच्या 'माझा महाकट्टा' या विशेष माझा कट्ट्यामध्ये बोलताना मूनी यांनी मराठी विरुद्ध मारवाडी वादावर सविस्तर भाष्य केले.

Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: आम्ही कधीही मराठीचा अपमान केलेला नाही, मराठी माणसाचा अपमान केलेला नाही, ते आमच्या संस्कारात नाही, असं जैन मुनि निलेश चंद्र यांनी म्हटलं आहे. आज (28 नोव्हेंबर) एबीपी माझाच्या 'माझा महाकट्टा' या विशेष माझा कट्ट्यामध्ये बोलताना मूनी यांनी मराठी विरुद्ध मारवाडी वादावर सविस्तर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सुद्धा खोचक शब्दांमध्ये टीका केली. 

तुम्ही चापट मारणार असाल तर..

राज ठाकरे यांच्या संदर्भात बोलताना जैन मुनि निलेशचंद्र म्हणाले की, ते (राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत) म्हणाले की, तुम्ही मारवाड्याला मारा म्हणता, पण फोटो काढू नका म्हणता. मात्र, आम्ही मराठी बोलायचं, म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे अशी विचारणा जैन मुनि यांनी केली. ते म्हणाले की, आम्ही कधीही मराठीचा अपमान केलेला नाही. ते आमच्या संस्कारात नाही. जर तुम्ही मराठी बोल म्हणा असाल तर आम्ही मराठी बोलतो. मात्र, तुम्ही चापट मारणार असाल तर आम्ही बोलणार नसल्याचे जैन मुनि म्हणाले. अशा पद्धतीने बोलणारे तुम्ही कोण आहात? अशी विचारणा जैन मुनि निलेशचंद्र यांनी केली. यावेळी बोलताना जैन मुनि यांनी मुंबईमधील मारवाडी विरुद्ध मराठी झालेल्या वादाची उदाहरणे दिली. भाईंदरमध्ये काय झालं? अशीही विचारणा त्यांनी केली. 

मला हा वाद संपवायचा आहे 

मला हा वाद संपवायचा आहे असेही मुनि म्हणाले. राज ठाकरे यांना उद्देशून बोलताना ते म्हणाले की राज ठाकरे मराठी हिंदू हृदयसम्राट आहेत. त्यामुळे तुम्हीच हा वाद निपटू शकता, दुसरं कोणीच हा वाद संपवू शकत नाही. राजसाहेब आले की सर्व मराठी एकत्र होतील आणि सर्व प्रकरण संपून जाईल असेही जैन मुनि यावेळी म्हणाले. ते म्हणाले की, राज ठाकरे म्हणतात तुम्ही मारवाड्याला मारा, पण फोटो काढू नका म्हणता. मात्र, आता मी मारवाड्यांचे संघटन करणार असल्याचे जैन मुनि म्हणाले. जवळपास मारवाड्यांच्या 36 कोम असून त्यांचे संघटन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठीचा वाद हा फक्त मुंबईमध्येच असून बाकी राज्यात कुठेही वाद नसल्याचा दावा जैन मुनि यांनी केला. ते म्हणाले की यांचं बघून आता आंध्रमध्ये हा वाद सुरू झाला आहे. 

प्रत्येकाला धर्म रक्षण करण्याचा अधिकार 

मला कबूतर, मंदिर, गोमाता सुरक्षित हवे असल्याचे एका प्रश्नाचे उत्तर देताना जैन मुनि यांनी सांगितले. दरम्यान, अशीच भाषा काही मुस्लिम शासकाकडून सुद्धा केली जात होती, फतवे काढले जात होते, या संदर्भात आपलं मत काय? अशी विचारणा केली असता जैन मुनि म्हणाले की, प्रत्येकाला धर्म रक्षण करण्याचा अधिकार असल्याचे मत व्यक्त केलं. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Jantar Mantar Lathi Charge: आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
BEST Bus Accident: 'व्हिडीओ गेमसारखी बस पळवली अन्...'; BEST अपघातातील जखमींचा टाहो; म्हणाले, 'खिशात फक्त 200 रुपये, उपचार करायचे कसे?'
'व्हिडीओ गेमसारखी बस पळवली अन्...'; BEST अपघातातील जखमींचा टाहो; म्हणाले, 'खिशात फक्त 200 रुपये, उपचार करायचे कसे?'
Chaityabhumi Protest : चैत्यभूमीवरील आंदोलनाला परवानगी नाकारली; आंदोलनकर्त्यांवर FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
चैत्यभूमीवरील आंदोलनाला परवानगी नाकारली; आंदोलनकर्त्यांवर FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, अंधेरी सबवे पाण्याखाली, वाहतूक बंद 
मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, अंधेरी सबवे पाण्याखाली, वाहतूक बंद 

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Maharashtra Government: राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Jantar Mantar Lathi Charge: आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
Embed widget