एक्स्प्लोर

1965 india pakistan war : काश्मीर बळकावण्यासाठी 33 हजार पाकड्यांची घुसखोरी, भारताने 15 दिवसांत पलटवली बाजी, 1965 च्या युद्धात काय झालं?  

1965 india pakistan war : एप्रिल 1965 ची गोष्ट. कच्छच्या रणमध्ये पाकिस्तानची भारतीय सैनिकांशी चकमक झाली होती. ब्रिटनचे पंतप्रधान हॅरोल्ड विल्सन यांनी मध्यस्थी करून दोन्ही देशांमधील वाद मिटवला. मात्र यावेळी पाकिस्तानला 910 किमी क्षेत्रफळ देण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानचे मनोबल आणखी वाढले. त्यावेळी भारतातील अनेक राज्यांमध्ये राजकीय हालचाली सुरू होत्या. काश्मीर मिळवण्यासाठी पाकिस्तानने ऑपरेशन जिब्राल्टर सुरू केले. 5 ऑगस्ट 1965 रोजी 33 हजार पाकिस्तानी सैनिक वेशांतर करुन काश्मिरी  खोऱ्यात घुसले. त्यानंतर 15 ऑगस्ट 1965 रोजी भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानवर हल्ला केला. भारताच्या शूर सैनिकांनी पाकिस्तानमधील 8 किमी अंतरावरील हाजीपीर खिंड काबीज केली. येथूनच पाकिस्तान घुसखोरांना प्रवेश मिळवून देत असे. भारताने कारगिल ताब्यात घेतले. 15 दिवसात पाकिस्तानचे ऑपरेशन जिब्राल्टर अयशस्वी झाले आणि काश्मीर जिंकण्याच्या त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या.

पंजाब विधानसभेचे माजी उपसभापती दरबारी लाल या युद्धाबद्दल सांगतात, "मला 1965 च्या भारत-पाक युद्धाविषयी अतिशय  गूढ आणि आश्चर्यकारक माहिती मिळाली. जेव्हा 2005 मध्ये गौहर अयुब खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे एक शिष्टमंडळ पंजाब विधानसभेच्या समित्यांच्या अधिकार आणि कार्यपद्धतीची माहिती घेण्यासाठी चंदीगडला आले होते. मला पंजाब सरकारच्या वतीने शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. 

शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मी गौहरला माझ्या ऑफिसमध्ये मोठ्या आदराने घेऊन गेलो. जिथे आम्ही दोघांनी  भारत-पाक संबंधांवर सविस्तर चर्चा केली. जर अमेरिका आणि कॅनडा शांततेत राहू शकतात, फ्रान्स आणि इंग्लंड 100 वर्षांच्या युद्धानंतर मित्र बनू शकतात, रशिया आणि चीन सीमा विवाद असूनही एकत्र राहू शकतात, तर भारत आणि पाकिस्तान का नाही? अखेर भारताचीच भूमी कापून पाकिस्तान हा वेगळा देश बनवण्यात आला आहे.  

दरबारी लाल सांगतात, मी गौहरला 1965 मध्ये पाकिस्तानने काश्मीरवर केलेल्या हल्ल्याबद्दल काही प्रश्न विचारले आणि संपूर्ण लढाईची माहिती जाणून घेतली. ज्याला त्यांनी मोठ्या संकोचाने आणि मुत्सद्दी शब्दांत उत्तर दिले. तत्कालीन परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुट्टो हे अत्यंत महत्त्वाकांक्षी व्यक्ती होते. त्यांनी राष्ट्राध्यक्ष अयुब खान यांना पटवून दिले की काश्मीरवरील लढा फारच मर्यादित असेल. वाईट परिस्थितीमुळे भारत दुसरी कोणतीही आघाडी उघडणार नाही आणि पाकिस्तान भारताकडून काश्मीर सहज हिसकावून घेईल. पण जेव्हा भारतीय सैन्याने प्रचंड वेगाने हल्ला केला आणि इछोगिल कालवा पार करून लाहोर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही मैलांवर असलेल्या बाटापूरला पोहोचले तेव्हा संपूर्ण पाकिस्तान हादरला.  

15 दिवसात पाकिस्तानचे ऑपरेशन जिब्राल्टर अयशस्वी झाले आणि काश्मीर जिंकण्याच्या त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या. त्यामुळे 1 सप्टेंबर 1965 रोजी पाकिस्तानने ऑपरेशन ग्रँड स्लॅम सुरू केले. अयुब खान यांना वाटले की, भारतीय सैन्य आधुनिक शस्त्रे, रणगाडे आणि दारूगोळा स्पर्धा करू शकणार नाहीत आणि पाकिस्तान अखनूर काबीज करू शकेल . पाकिस्तानने अखनूरवर केलेल्या जोरदार हल्ल्याने भारत सरकारला आश्चर्याचा धक्का बसला. भारताचे तत्कालिन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी एअर मार्शल अर्जुन सिंग यांना त्यांच्या घरी बोलावून विचारले की आम्ही पाकिस्तानवर किती वेळात हवाई हल्ला करू शकतो. अर्जुनसिंग यांनी तत्परतेने पंधरा मिनिटांत असे उत्तर दिले. त्याच वेळी  छांबमध्ये जोरदार हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्याचे मनसुबे पुन्हा धुळीस मिळाले.

दरबारी लाल सांगतात, दुसरीकडे 6 सप्टेंबर 1965 रोजी भारताने पंजाब आणि राजस्थानची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून जोरदार हल्ला चढवला. मेजर जनरल निरंजन प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य इछोगिल कालव्यापर्यंत पोहोचले. भारत आंतरराष्ट्रीय सीमेवरून हल्ला करेल याची पाकिस्तान कल्पना देखील करू शकत नव्हता. लाहोरला धोका असल्याचे पाहून पाकिस्तानने आपल्या सैन्याचा मोठा भाग पंजाबकडे वळवला. त्यामुळे काश्मीरमधील त्यांचा दबाव कमी होऊ लागला. भारतीय सैन्याने बाटापूर, बर्की ताब्यात घेतल्याची भारतातील उच्च पदावरील अधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना नव्हती. भारतीय सैन्याला पुढे जाण्याऐवजी परत बोलावण्यात आले. हे सर्वांसाठी आश्चर्यकारक आणि दुःखदायकही होते. कारण 9 सप्टेंबर रोजी सैन्याला बाटापूर आणि डोगराई येथून परत बोलावून गौशाला दयाळ येथे येण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचवेळी भारताने सियालकोटवर जोरदार हल्ला केला आणि पाकिस्तानमध्ये घुसून तो ताब्यात घेतला. 

दुसरीकडे परिस्थिती अचानक बदलली. पाकिस्तानी सैन्य पुढे सरकले आणि खेमकरनवर ताबा मिळवला. बियासवरील पूल आणि हरी बंदर ताब्यात घेऊन अमृतसरचा संपूर्ण परिसर ताब्यात घेण्याची त्यांची योजना होती. भारतासाठी ही अत्यंत धोकादायक आणि चिंताजनक स्थिती बनली. जनरल जे.एन. चौधरी यांनी पंजाबच्या वेस्टर्न कमांडचे प्रमुख सरदार हरबख्श सिंग यांना अमृतसर सोडण्यास सांगितले. त्यावेळी जनरल हरबक्ष सिंग यांच्यासोबत कॅप्टन अमरिंदर सिंग (पंजाबचे मुख्यमंत्री) यांना देशाच्या सुरक्षेची लष्करी जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळाली. 

जनरल हरबख्श सिंग कोणत्याही स्थितीत अमृतसर सोडायला तयार नव्हते. त्याच रात्री भारतीय सैन्याचे  पाकिस्तानशी घनघोर युद्ध झाले आणि त्यांचे 100 रणगाडे उद्ध्वस्त झाले. परंतु, हे रणगाडे उद्ध्वस्त करणारे अब्दुल हमीद शहीद झाले. अमृतसर वाचवण्याचे श्रेय जनरल हरबख्श सिंग यांना जाते. अशा प्रकारे भारताने पाकिस्तानचा 1920 किमीचा भाग (ज्यात सियालकोट, लाहोर आणि काश्मीर प्रदेश) ताब्यात घेतला. तर पाकिस्तानने भारताच्या छंब आणि सिंधला लागून असलेल्या 550 किमी वाळवंटाचा ताबा मिळवला. 

भारत पाकिस्तानमधील युद्ध थांबले आणि रशियाच्या पंतप्रधानांनी दोघांनाही मध्यस्थ म्हणून ताश्कंदला बोलावले. 10 जानेवारी 1966 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक करार झाला. भारताने जिंकलेले सर्व प्रदेश परत केले. याचा भारतीयांना प्रचंड राग आला. 11 जानेवारी 1966 रोजी लाल बहादूर शास्त्री यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले आणि संतापाने सहानुभूतीची लाट निर्माण झाली. भारताने अशा व्यक्तीला गमावले होते, ज्याच्या आज्ञेने अन्नधान्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी सोमवारी रात्री उपास सुरू केला, असे दरबारी लाल यांनी सांगितले. 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले,  पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले,  पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Embed widget