एक्स्प्लोर

1965 india pakistan war : काश्मीर बळकावण्यासाठी 33 हजार पाकड्यांची घुसखोरी, भारताने 15 दिवसांत पलटवली बाजी, 1965 च्या युद्धात काय झालं?  

1965 india pakistan war : एप्रिल 1965 ची गोष्ट. कच्छच्या रणमध्ये पाकिस्तानची भारतीय सैनिकांशी चकमक झाली होती. ब्रिटनचे पंतप्रधान हॅरोल्ड विल्सन यांनी मध्यस्थी करून दोन्ही देशांमधील वाद मिटवला. मात्र यावेळी पाकिस्तानला 910 किमी क्षेत्रफळ देण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानचे मनोबल आणखी वाढले. त्यावेळी भारतातील अनेक राज्यांमध्ये राजकीय हालचाली सुरू होत्या. काश्मीर मिळवण्यासाठी पाकिस्तानने ऑपरेशन जिब्राल्टर सुरू केले. 5 ऑगस्ट 1965 रोजी 33 हजार पाकिस्तानी सैनिक वेशांतर करुन काश्मिरी  खोऱ्यात घुसले. त्यानंतर 15 ऑगस्ट 1965 रोजी भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानवर हल्ला केला. भारताच्या शूर सैनिकांनी पाकिस्तानमधील 8 किमी अंतरावरील हाजीपीर खिंड काबीज केली. येथूनच पाकिस्तान घुसखोरांना प्रवेश मिळवून देत असे. भारताने कारगिल ताब्यात घेतले. 15 दिवसात पाकिस्तानचे ऑपरेशन जिब्राल्टर अयशस्वी झाले आणि काश्मीर जिंकण्याच्या त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या.

पंजाब विधानसभेचे माजी उपसभापती दरबारी लाल या युद्धाबद्दल सांगतात, "मला 1965 च्या भारत-पाक युद्धाविषयी अतिशय  गूढ आणि आश्चर्यकारक माहिती मिळाली. जेव्हा 2005 मध्ये गौहर अयुब खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे एक शिष्टमंडळ पंजाब विधानसभेच्या समित्यांच्या अधिकार आणि कार्यपद्धतीची माहिती घेण्यासाठी चंदीगडला आले होते. मला पंजाब सरकारच्या वतीने शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. 

शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मी गौहरला माझ्या ऑफिसमध्ये मोठ्या आदराने घेऊन गेलो. जिथे आम्ही दोघांनी  भारत-पाक संबंधांवर सविस्तर चर्चा केली. जर अमेरिका आणि कॅनडा शांततेत राहू शकतात, फ्रान्स आणि इंग्लंड 100 वर्षांच्या युद्धानंतर मित्र बनू शकतात, रशिया आणि चीन सीमा विवाद असूनही एकत्र राहू शकतात, तर भारत आणि पाकिस्तान का नाही? अखेर भारताचीच भूमी कापून पाकिस्तान हा वेगळा देश बनवण्यात आला आहे.  

दरबारी लाल सांगतात, मी गौहरला 1965 मध्ये पाकिस्तानने काश्मीरवर केलेल्या हल्ल्याबद्दल काही प्रश्न विचारले आणि संपूर्ण लढाईची माहिती जाणून घेतली. ज्याला त्यांनी मोठ्या संकोचाने आणि मुत्सद्दी शब्दांत उत्तर दिले. तत्कालीन परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुट्टो हे अत्यंत महत्त्वाकांक्षी व्यक्ती होते. त्यांनी राष्ट्राध्यक्ष अयुब खान यांना पटवून दिले की काश्मीरवरील लढा फारच मर्यादित असेल. वाईट परिस्थितीमुळे भारत दुसरी कोणतीही आघाडी उघडणार नाही आणि पाकिस्तान भारताकडून काश्मीर सहज हिसकावून घेईल. पण जेव्हा भारतीय सैन्याने प्रचंड वेगाने हल्ला केला आणि इछोगिल कालवा पार करून लाहोर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही मैलांवर असलेल्या बाटापूरला पोहोचले तेव्हा संपूर्ण पाकिस्तान हादरला.  

15 दिवसात पाकिस्तानचे ऑपरेशन जिब्राल्टर अयशस्वी झाले आणि काश्मीर जिंकण्याच्या त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या. त्यामुळे 1 सप्टेंबर 1965 रोजी पाकिस्तानने ऑपरेशन ग्रँड स्लॅम सुरू केले. अयुब खान यांना वाटले की, भारतीय सैन्य आधुनिक शस्त्रे, रणगाडे आणि दारूगोळा स्पर्धा करू शकणार नाहीत आणि पाकिस्तान अखनूर काबीज करू शकेल . पाकिस्तानने अखनूरवर केलेल्या जोरदार हल्ल्याने भारत सरकारला आश्चर्याचा धक्का बसला. भारताचे तत्कालिन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी एअर मार्शल अर्जुन सिंग यांना त्यांच्या घरी बोलावून विचारले की आम्ही पाकिस्तानवर किती वेळात हवाई हल्ला करू शकतो. अर्जुनसिंग यांनी तत्परतेने पंधरा मिनिटांत असे उत्तर दिले. त्याच वेळी  छांबमध्ये जोरदार हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्याचे मनसुबे पुन्हा धुळीस मिळाले.

दरबारी लाल सांगतात, दुसरीकडे 6 सप्टेंबर 1965 रोजी भारताने पंजाब आणि राजस्थानची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून जोरदार हल्ला चढवला. मेजर जनरल निरंजन प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य इछोगिल कालव्यापर्यंत पोहोचले. भारत आंतरराष्ट्रीय सीमेवरून हल्ला करेल याची पाकिस्तान कल्पना देखील करू शकत नव्हता. लाहोरला धोका असल्याचे पाहून पाकिस्तानने आपल्या सैन्याचा मोठा भाग पंजाबकडे वळवला. त्यामुळे काश्मीरमधील त्यांचा दबाव कमी होऊ लागला. भारतीय सैन्याने बाटापूर, बर्की ताब्यात घेतल्याची भारतातील उच्च पदावरील अधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना नव्हती. भारतीय सैन्याला पुढे जाण्याऐवजी परत बोलावण्यात आले. हे सर्वांसाठी आश्चर्यकारक आणि दुःखदायकही होते. कारण 9 सप्टेंबर रोजी सैन्याला बाटापूर आणि डोगराई येथून परत बोलावून गौशाला दयाळ येथे येण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचवेळी भारताने सियालकोटवर जोरदार हल्ला केला आणि पाकिस्तानमध्ये घुसून तो ताब्यात घेतला. 

दुसरीकडे परिस्थिती अचानक बदलली. पाकिस्तानी सैन्य पुढे सरकले आणि खेमकरनवर ताबा मिळवला. बियासवरील पूल आणि हरी बंदर ताब्यात घेऊन अमृतसरचा संपूर्ण परिसर ताब्यात घेण्याची त्यांची योजना होती. भारतासाठी ही अत्यंत धोकादायक आणि चिंताजनक स्थिती बनली. जनरल जे.एन. चौधरी यांनी पंजाबच्या वेस्टर्न कमांडचे प्रमुख सरदार हरबख्श सिंग यांना अमृतसर सोडण्यास सांगितले. त्यावेळी जनरल हरबक्ष सिंग यांच्यासोबत कॅप्टन अमरिंदर सिंग (पंजाबचे मुख्यमंत्री) यांना देशाच्या सुरक्षेची लष्करी जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळाली. 

जनरल हरबख्श सिंग कोणत्याही स्थितीत अमृतसर सोडायला तयार नव्हते. त्याच रात्री भारतीय सैन्याचे  पाकिस्तानशी घनघोर युद्ध झाले आणि त्यांचे 100 रणगाडे उद्ध्वस्त झाले. परंतु, हे रणगाडे उद्ध्वस्त करणारे अब्दुल हमीद शहीद झाले. अमृतसर वाचवण्याचे श्रेय जनरल हरबख्श सिंग यांना जाते. अशा प्रकारे भारताने पाकिस्तानचा 1920 किमीचा भाग (ज्यात सियालकोट, लाहोर आणि काश्मीर प्रदेश) ताब्यात घेतला. तर पाकिस्तानने भारताच्या छंब आणि सिंधला लागून असलेल्या 550 किमी वाळवंटाचा ताबा मिळवला. 

भारत पाकिस्तानमधील युद्ध थांबले आणि रशियाच्या पंतप्रधानांनी दोघांनाही मध्यस्थ म्हणून ताश्कंदला बोलावले. 10 जानेवारी 1966 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक करार झाला. भारताने जिंकलेले सर्व प्रदेश परत केले. याचा भारतीयांना प्रचंड राग आला. 11 जानेवारी 1966 रोजी लाल बहादूर शास्त्री यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले आणि संतापाने सहानुभूतीची लाट निर्माण झाली. भारताने अशा व्यक्तीला गमावले होते, ज्याच्या आज्ञेने अन्नधान्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी सोमवारी रात्री उपास सुरू केला, असे दरबारी लाल यांनी सांगितले. 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC :  शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget