एक्स्प्लोर

Ganeshotsav 2024 : गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन 10 दिवसांनीच का करावं लागतं? पौराणिक कथेत दडलंय महत्त्वाचं रहस्य

Ganeshotsav 2024 : सुख-समृद्धीसाठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाची विधीपूर्वक पूजा केली जाते.

Ganeshotsav 2024 : सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2024) धामधूम पाहायला मिळतेय. गणेश चतुर्दशीपासून सुरु झालेला हा उत्सव 10 दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्दशीला संपतो. या दरम्यान घरी लाडक्या बाप्पाचं आगमन केलं जातं. सुख-समृद्धीसाठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाची विधीपूर्वक पूजा केली जाते. एक प्रकारे गणपतीची (Lord Ganesh) सेवा केली जाते. मात्र, जेव्हा गणपती विसर्जनाची वेळ येते तेव्हा मात्र, लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू आल्याशिवाय राहत नाही. अनेकदा लहान मुलांना प्रश्नही पडतो की देवबाप्पा आपल्या घरी येतात मग त्यांचं विसर्जन का करतात? याच संदर्भात आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. 

गणेश विसर्जनाचं महत्व

यंदा 7 सप्टेंबर रोजी घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन झालं. त्यानुसार 10 दिवसांनी म्हणजेच 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला बुद्धी, वाणीची देवता म्हटलं जातं. यासाठीच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात भगवान गणेशापासून केली जाते. त्यानंतर इतर देवी-दैवतांची पूजा केली जाते. गणपतीची पूजा, आराधना केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात अशी पौराणिक मान्यता आहे. त्याचबरोबर श्रीगणेशाची पूजा केल्याने घरातील वास्तूदोषही दूर होतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते. यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घराघरांत गणपतीची स्थापना केली जाते आणि पुढचे 10 दिवस त्यांची पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जित केल्याने श्रीगणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे.

गणेश विसर्जनाची पौराणिक कथा 

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते, कारण असे मानले जाते की गणपती हे जल तत्वाचे अधिपती आहेत. पुराणानुसार, वेद व्यासजी गणपतीला कथा सांगत असत आणि बाप्पा त्या लिहीत असत. कथा सांगताना वेद व्यासजींनी डोळे मिटले. ते सतत 10 दिवस कथा सांगत राहिले आणि बाप्पा लिहून ठेवत राहिले. पण दहा दिवसांनी जेव्हा वेद व्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की गणपतीच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे. गणपतीच्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी वेद व्यासजींनी त्यांना पाण्यात विसर्जित केलं, ज्यामुळे त्यांचे शरीर थंड झाले. तेव्हापासून गणेश विसर्जन हे गणपतीला थंड, शांत करण्यासाठी केले जाते, अशी धार्मिक मान्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Astrology : आज सौभाग्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; देवी लक्ष्मी 'या' 5 राशींवर होणार प्रसन्न

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Gold Rate : 2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञ खरेदीबाबत म्हणाले...
2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञांचा खरेदीबाबत सल्ला
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Leopard Attack: शिरूरमध्ये 13 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांचा उद्रेक, वनविभागाची गाडी पेटवली
Mahayuti Special Reportराष्ट्रवादी शरद पवारांची,शिवसेना ठाकरेंची,पाटलांच्या वक्तव्याने राजकारण तापलं
Uddhav Thackeray Marathwada Tour: ठाकरेंचा मराठवाड्यात 4 दिवस दगाबाजरे संवाद दौरा Special Report
Beed Special Report आष्टी मतदारसंघात लक्ष घालणार, Pankaja Munde यांची घोषणा, मुंडे वि. धस वाद पेटला
Maharashtra Politics : निवडणुकांची लगबग; कुठे तारखांचा अंदाज, कुठे गाऱ्हाणं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Gold Rate : 2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञ खरेदीबाबत म्हणाले...
2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञांचा खरेदीबाबत सल्ला
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget