एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2024 : घरात गणपतीची स्थापना करताना 'या' 10 गोष्टींची काळजी घ्या; जाणून घ्या बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi 2024 Sthapna : गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. पण, लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी हे जाणून घेऊयात.

Ganesh Chaturthi 2024 Sthapna : गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार आहे. गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथी रोजी साजरी केली जाणार आहे. त्यानुसार, घराघरांत लाडक्या बाप्पाची स्थापना होणार आहे. 

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते. पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचं महत्त्व पौराणिक मान्यतांमध्ये सर्वात खास मानण्यात आलं आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. पण, लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी याच संदर्भात काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

गणेश चतुर्थी 2024 शुभ मुहूर्त (Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurta)

पंचांगानुसार, गणेश चतुर्थी शनिवारी, 7 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3:01 वाजता सुरू होईल आणि रविवार, 8 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:37 वाजता समाप्त होईल.

मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त : सकाळी 11:03 ते दुपारी 1:34 पर्यंत

म्हणजेच तुम्ही 7 सप्टेंबरला 2 तास 31 मिनिटांच्या शुभ मुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता.

घरात गणपतीची स्थापना करताना 'या' 10 गोष्टी लक्षात घ्या 

जर तुम्ही यंदा घरी गणपतीचं आगमन करणार आहात तर तुम्हाला गणपतीच्या स्थापनेपासून ते पूजेच्या काही नियमांची काळजी घेणं गरजेचं आहे. 

1. गणपतीच्या मूर्तीसमोर रोज सकाळ-संध्याकाळ दिवा लावा. तसेच, बाप्पाची मनोभावे पूजा करा. 

2. गणपती जितके दिवस तुमच्या घरी विराजमान आहेत तितके दिवस कमीत कमी 3 वेळा गणपतीला प्रसाद चढवा. 

3. लाडका बाप्पा जितके दिवस तुमच्या घरी आहे त्या दिवसांत सात्विक भोजन करा. 

4. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करा. गणरायासाठी उपवास ठेवा तसेच गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका. 

5. गणपतीची स्थापना योग्य दिशेलाच करा. गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ मानले जाते तसेच त्या स्थानी रोज गंगाजल शिंपडा. 

6. घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्या. 

7. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणू शकता. पण, शेंदूर लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेशमूर्ती घरी आणणं शुभ मानले जाते. 

8. तुम्ही घरात तुमच्या आवडीनुसार गणपतीची मूर्ती आणा. पण जर शाडूच्या मातीची मूर्ती असेल तर फार उत्तम. यामुळे पर्यावरणाचं देखील नुकसान होणार नाही. 

9. घरात गणपती विराजमान असताना घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा. 

10. घरात जेवण बनवताना मांसाहारी पदार्थ अजिबात बनवू नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Ganesh Chaturthi 2024 : अवघ्या काही दिवसांवर गणरायाचं आगमन, बाप्पाच्या स्थापनेची 'अशी' करा तयारी, 'या' वस्तू घेतल्या का?

महत्त्वाच्या बातम्या

Shani Dev: 2027...पुढचं वर्ष 4 राशींसाठी राजासारखं आयुष्य! शनिची मोठी चाल, कर्जातून मुक्ती, नव्या संधी, धनलाभ, तुमची रास? ज्योतिषशास्त्र...
2027...पुढचं वर्ष 4 राशींसाठी राजासारखं आयुष्य! शनिची मोठी चाल, कर्जातून मुक्ती, नव्या संधी, धनलाभ, तुमची रास? ज्योतिषशास्त्र...
Shani Vakri 2026 : शनिच्या वक्री चालीचा 5 राशींवर सर्वात पॉवरफुल्ल परिणाम; 27 जुलैपासून उलटी गिनती सुरु, आर्थिक संकटांना सामोरं जाण्याची येणार वेळ
शनिच्या वक्री चालीचा 5 राशींवर सर्वात पॉवरफुल्ल परिणाम; 27 जुलैपासून उलटी गिनती सुरु, आर्थिक संकटांना सामोरं जाण्याची येणार वेळ
Horoscope Today 23 July 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Ashadhi Ekadashi 2026: एकादशीचा जन्म कसा झाला? आषाढी एकादशीचे व्रत का करतात? भगवान विष्णूंचे 'ते' अद्भूत वरदान! 'ही' पौराणिक कथा कमी लोकांना माहित...
एकादशीचा जन्म कसा झाला? आषाढी एकादशीचे व्रत का करतात? भगवान विष्णूंचे 'ते' अद्भूत वरदान! 'ही' पौराणिक कथा कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget