एक्स्प्लोर

Chanakya Niti: प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी लागते मोजक्याच लोकांची गरज! जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति..

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिमध्ये प्रत्येक काम योग्य पद्धतीने करण्याचा मंत्र सांगितला आहे. त्यांच्या मते, आयुष्यात अशी पाच कामे आहेत, जी निर्धारित मनुष्यबळासहच पूर्ण करावी, तरच यश मिळते.

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतिशास्त्रामध्ये (Chanakya Niti) व्यवसाय, वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींविषयी चर्चा केली आहे. जीवनात यश मिळवण्यासाठीची गुरुकिल्ली या नीतिशास्त्रात सांगितली आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनातील प्रत्येक ध्येय साध्य करण्यासाठी केवळ काही मोजक्याच लोकांची गरज असते. एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी त्यात मोजक्याच लोकांचा सहभाग असावा, तरच यश मिळवता येते, असे चाणक्य सांगतात. यातील काही कामं तर एकट्यानेच करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिमध्ये प्रत्येक काम योग्य पद्धतीने करण्याचा मंत्र सांगितला आहे. त्यांच्या मते, आयुष्यात अशी पाच कामे आहेत, जी निर्धारित मनुष्यबळासहच पूर्ण करावी, तरच यश मिळते. चला तर, जाणून घेऊया आचार्य चाणक्य याबद्दल काय सांगतात...

तपश्चर्या

आचार्य चाणक्य म्हणतात की, तपश्चर्या नेहमी एकट्याने करावी, तरच त्याचे पूर्ण फळ मिळते. अनेक लोकांसह मिळून तपश्चर्या केल्याने मन व लक्ष विचलित होते आणि ध्येय साध्य होत नाही. तुम्ही एकट्याने तपश्चर्या करूनच आपले ध्येय गाठू शकता.

अभ्यास

अभ्यास करण्यासाठी कार्यात दोन व्यक्तींचा सहभाग असणे योग्य आहे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणी बसून अभ्यास करत असतील, तर ज्ञानाची देवाणघेवाण होते. तसेच, एखाद्या विषयात एखादी अडचण आली की, एकमेकांची मदतही करता येते.

मनोरंजन

आचार्य चाणक्यांच्या मते मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी किमान तीन लोक असणे आवश्यक आहे. यामध्ये लोकांची संख्या अधिकही असू शकते. परंतु, तीनपेक्षा कमी लोकांमध्ये मनोरंजन होत नाही.

शेती

शेती करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. शेती हे कोणा एका किंवा दोन लोकांचे काम नाही. कारण, शेतीशी संबंधित अनेक कामे असतात, ज्यात अनेक लोकांचे सहकार्य आवश्यक आहे. चाणक्य नीतिनुसार शेतीचे काम किमान पाच जणांनी मिळून केले पाहिजे. तरच, याचे चांगले परिणाम प्राप्त होतात.

युद्ध

युद्धात जेव्हा तुमच्या बाजूने अनेक लोक उभे असतात, तेव्हाच विजयाची शक्यता वाढते. राजा-महाराजही युद्धावर जाण्यापूर्वी सैन्याच्या संख्येचा विचार करत असत. परंतु, अतिउत्साहात कधीही भान हरवू नये, असे म्हणतात. यामुळेच मोठी लढाई जिंकायची असेल, तर अनेक मित्रपक्षांना सोबत घ्यावे लागते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
Shravan 2026 : श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
Chandra Grahan 2026: सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Shravan 2026: यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget