Astrology : हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
Astrology : भारतीय परंपरेनुसार हातात काळा धागा बांधण्याची प्रथा खूप जुनी आहे. काही लोक नजर लागू नये म्हणून हातात काळा धागा घालतात.

Astrology : ज्योतिष शास्त्रात, अनेक लोकांसाठी मनगटावर काळा धागा बांधणं हा श्रद्धा आणि परंपरेचा भाग आहे. परंतु या संदर्भात काही धार्मिक आणि ज्योतिष शास्त्राच्या मते काही नियम देखील आहेत. काळा धागा कोणी घालावा, कोणी तो टाळावा आणि तो घालण्यापूर्वी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे जाणून घ्या.
भारतीय परंपरेनुसार हातात काळा धागा बांधण्याची प्रथा खूप जुनी आहे. काही लोक नजर लागू नये म्हणून हातात काळा धागा घालतात. काही लोक धार्मिक श्रद्धा आणि कौटुंबिक परंपरेच्या कारणाने काळा धागा धारण करतात.
धार्मिक मान्यतेनुसार, ज्या लोकांना सारखी सारखी नजर लागते, कामात अडथळे येतात, मानसिक अस्थिरता जाणवते. काही कुटुंबात लहान मुलाच्या हातात, पायात आणि कमरेतसुद्धा काळा धागा बांधला जातो. कारण वाईट नजरेपासून रक्षण होऊ शकेल. हे सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेवर अवलंबून आहे. याच्या आधारावर काही वैज्ञानिक प्रमाण उपलब्ध नाही.
काळा धागा 'या' लोकांनी परिधान करू नये
ज्योतिष शास्त्रातील काही मान्यतेनुसार, काळा धागा प्रत्येकासाठी लाभदायक असेलच असे नाही. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनी ग्रह आधीच बलवान आहे किंवा ज्यांना एखाद्या विशिष्ट ग्रहासाठी वेगळे ज्योतिषीय उपाय करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा वेळी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेतल्याशिवाय काळा धागा परिधान करू नये. तसेच, एखाद्या धार्मिक विधी, व्रत किंवा पूजेमध्ये विशिष्ट रंगाच्या धाग्याला महत्त्व दिले असल्यास, त्या परंपरेचे पालन करणे अधिक योग्य मानले जाते.
कोणत्या हातात घालावा?
या बाबतीत वेगवेगळ्या परंपरांमध्ये वेगवेगळ्या समजुती आहेत. अनेक जण पुरुषांच्या उजव्या हातावर आणि महिलांच्या डाव्या हातावर काळा धागा बांधणं शुभ मानतात. काही लोक तो दोन्हीपैकी कोणत्याही हातात घालतात. त्यामुळे, जर तुम्ही एखाद्या विशिष्ट धार्मिक परंपरेचे पालन करत असाल, तर त्यानुसार तिचे पालन करणे हेच योग्य आहे.
काळा धागा घालताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
धार्मिक आणि पारंपारिक मान्यतेनुसार, काळा धागा परिधान करताना काही गोष्टींची काळजी घेणं योग्य मानलं जातं. सर्वात आधी, धागा स्वच्छ, अखंड आणि चांगल्या स्थितीत असावा. जर तो आपोआप तुटला, खूप जुना झाला किंवा खराब झाला, तर तो काढून नवीन धागा परिधान करावा. अनेक जण मंगळवार किंवा शनिवार या दिवशी काळा धागा बांधणं शुभ मानतात. मात्र, या प्रथा वेगवेगळ्या धार्मिक परंपरा आणि कौटुंबिक श्रद्धेनुसार बदलू शकतात.
याशिवाय, दुसर्याने वापरलेला किंवा तुटलेला काळा धागा वापरणे टाळावे, अशीही मान्यता आहे. धागा परिधान करताना मनात सकारात्मक भावना, श्रद्धा आणि चांगला संकल्प ठेवावा, असेही अनेक ठिकाणी सांगितले जाते.
टीप : हे लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहे की, काळा धागा परिधान करणे ही प्रामुख्याने श्रद्धा आणि परंपरेशी संबंधित बाब आहे. कोणत्याही आरोग्य समस्या किंवा जीवनातील अडचणींवर तो निश्चित उपाय मानता येत नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :



















