एक्स्प्लोर

Washim: वाशिमच्या शेतकऱ्यांचा विषमुक्त शेतीचा यशस्वी प्रयोग; काय आहे ही भन्नाट फार्मर कप स्पर्धा 

वाशीमच्या जयपूर आणि विळेगाव येथील शेतकरी गटाने  विषमुक्त सोयबीनची  शेती करून या शेतीला विषमुक्तचं मानांकनही मिळवून दिलं आहे.

Washim Farmer Cup News:  पाणी फाउंडेशनच्या (Paani Foundation) वतीने  जलसंधारणचे काम राज्यभरात करण्यात आलं आहे. परिणामी या माध्यमातून अनेक गावं दुष्काळमुक्त देखील झाली आहे. या प्रयोगाच्या  यशानंतर  शेतकऱ्यांच्या  उत्पन्नात वाढ होऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी आणि विष मुक्त शेतीतून पोषक धान्य मिळावे  याकरता पाणी फाउंडेशनच्यावतीने फार्मर  कपचे आयोजन करण्यात आले. 

या स्पर्धेमध्ये पहिल्याच वर्षी बाजी मारली ती वाशीमच्या जयपूर आणि विळेगाव येथील शेतकरी गटाने.  विषमुक्त सोयबीनची  शेती करून या शेतीला विषमुक्तचं मानांकनही मिळालं आहे. त्यामुळं  गावातील शेतकरी गटाने गावात दिवाळीच साजरी केली. या कामगिरीनं गावकरी देखील खूश असून गावात उत्साहाचे वातावरण आहे. 

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील अनेक गावांनी जल संधारणाची काम केली.  या स्पर्धेमुळं अनेक गावावरी दुष्काळाचा डाग कायमस्वरूपी मिटल्याचं देखील समोर आलं आहे. मात्र  शेतकऱ्यांच्या जीवनात या स्पर्धेतून बदल घडावा यासाठी एक पाउल पुढं टाकत यंदा पानी फाऊंडेशनच्या वतीनं पहिल्यांदाच फार्मर कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आले.

पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभागी वाशिम जिल्ह्यातील जयपूर गावातील शेतकरी गटांनी यावर्षी स्पर्धेच्या नैसर्गिक कीड व्यवस्थापन करत विषमुक्त सोयाबीन उत्पादित करण्याची यशस्वी प्रयोग केला आहे. याच उत्पादित सोयाबीनची पुणे येथील प्रयोगशाळेत या सोयाबीनच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी  शेतकऱ्यांच्या गटाची रात्रीच्या वेळेस  डिजिटल पद्धतीने कार्यशाळा घेण्यात आली. याच माध्यमातून कीटनाशक,  खुरपणी,  खताचं  नियोजन,  लागवड पद्धत आणि काढणीपासून कशा पद्धतीनं विष मुक्त शेतीमधून विष मुक्त धान्य पिकवू शकतो याचं मार्गदर्शन शेतकऱ्याना केलं गेलं. 

शेतकऱ्यांयानी नोंदविलेल्या सहभागामुळे आणि त्यांच्या चिकाटीमुळे या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना पहिल्याच वर्षी विष मुक्त सोयाबीनचं धान्य उत्पादन केल्यामुळं प्रमाणित करण्यात आले. या  गावानं प्रथम  क्रमांक पटकावला आहे. 

गावाच्या विकासात पाणी फाऊंडेशनने  दिलेल्या योगदान मोठं आहे. पानी फाऊंडेशनमुळं गाव दुष्काळ मुक्त झाल्याचं गावकरी सांगतात. आता विष मुक्त शेतीतून शेतकरी चांगले उत्पन्न घेऊन  आपल्या शेतातील उत्पन्न खर्च कमी करून आपला आर्थिक विकास करत आहे.  त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी या गावच्या शेतकऱ्यांचा आदर्श घेतला तर नक्की शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होईल यात मात्र शंका नाही .

ही बातमी देखील वाचा

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Embed widget