एक्स्प्लोर

Weather Updates : 28 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत राज्यात 38 अंश ते 44 अंशापर्यंत तापमान राहणार, शेतकऱ्यांनी हरभरा, गहू आणि ज्वारीची काढणी करावी

राज्यात 28 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच वाऱ्याचा वेग देखील वाढणार आहे.

Weather Updates : राज्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. उन्हाचा चटका वाढल्यानं लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, राज्यात 28 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच वाऱ्याचा वेग देखील वाढणार आहे. 28 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत राज्यात 38 अंशपासून 44 अंश पर्यंत तापमान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं वाढणाऱ्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेणं गरजेचं आहे.

हळद, हरभरा, गहू आणि ज्वारीची काढणी करावी

उन्हाचा चटका वाढल्या उकाड्यातही वाढ झाली आहे. त्यामुले या वाढत्या तापमानाच्या काळात नागरिकांना स्वत: सह लहान मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच हळद, हरभरा, गहू, करडी आणि ज्वारी ही पिके काढणीस आली आहेत. पुढच्या आठ दिवसात शेतकऱ्यांनी शेतातली आपापली पिकं काढूण घ्यावी असे देखील सांगण्यात आले आहे.
                              
दरम्यान, राज्यात 29 मार्चपर्यंत सांगली, पुणे कराड, विटा, जत, आटपाडी, सोलापूर, इस्लापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड, वाई आणि सातारा या भागात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. तर 29 मार्चपासून उन्हाचा पारा वाढून वारे जोराने वाहु लागतील. दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान वाढताना दिसत आहे. हळूहळू तापमानात वाढ होणार असल्याचं देखील बोललं जात आहे. 14 मार्चनंतर विदर्भात सूर्यनारायण भयंकर तापला असून अकोला आणि चंद्रपुरात सर्वोच्च तापमानाच्या नोंदी झाल्या आहेत. संपूर्ण राज्यात अकोल्याचा पहिला नंबर आहे. तापमान वाढीत मागील 5 दिवस सलग उच्चांकी नोंद अकोल्यात करण्यात आली आहे. 

23 मार्च ते 27 मार्च अकोल्यातील तापमान सर्वाधिक असल्याची भारतीय हवामान खात्याची नोंद आहे.  वायव्येकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पश्चिम विदर्भात काही दिवसात सर्वाधिक तापमान होण्याची चिन्हं आहेत.  राजस्थानमधून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात बदल झाला आहे. 

दरम्यान, मागच्या तीन ते चार दिवसापूर्वी राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊसही झाला. त्याचा मोटा फटका राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे द्राक्ष तडकण्याची भिती व्यक्त केली जातेय. तसेच दरही कमी होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. ज्या भागांमध्ये द्राक्षाची काढणी झाली आहे, त्याठिकाणी पाऊस चांगला आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा अद्याप उतरल्या नाहीत त्यांच्यासाठी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस धोक्याचा ठरण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
Devendra Fadnavis on Loan Waiver: कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...
कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...
पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री

व्हिडीओ

Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Devendra Fadnavis On T 20 World Cup : मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचं कौतुक
Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Embed widget