एक्स्प्लोर

Weather Updates : 28 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत राज्यात 38 अंश ते 44 अंशापर्यंत तापमान राहणार, शेतकऱ्यांनी हरभरा, गहू आणि ज्वारीची काढणी करावी

राज्यात 28 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच वाऱ्याचा वेग देखील वाढणार आहे.

Weather Updates : राज्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. उन्हाचा चटका वाढल्यानं लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, राज्यात 28 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच वाऱ्याचा वेग देखील वाढणार आहे. 28 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत राज्यात 38 अंशपासून 44 अंश पर्यंत तापमान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं वाढणाऱ्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेणं गरजेचं आहे.

हळद, हरभरा, गहू आणि ज्वारीची काढणी करावी

उन्हाचा चटका वाढल्या उकाड्यातही वाढ झाली आहे. त्यामुले या वाढत्या तापमानाच्या काळात नागरिकांना स्वत: सह लहान मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच हळद, हरभरा, गहू, करडी आणि ज्वारी ही पिके काढणीस आली आहेत. पुढच्या आठ दिवसात शेतकऱ्यांनी शेतातली आपापली पिकं काढूण घ्यावी असे देखील सांगण्यात आले आहे.
                              
दरम्यान, राज्यात 29 मार्चपर्यंत सांगली, पुणे कराड, विटा, जत, आटपाडी, सोलापूर, इस्लापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड, वाई आणि सातारा या भागात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. तर 29 मार्चपासून उन्हाचा पारा वाढून वारे जोराने वाहु लागतील. दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान वाढताना दिसत आहे. हळूहळू तापमानात वाढ होणार असल्याचं देखील बोललं जात आहे. 14 मार्चनंतर विदर्भात सूर्यनारायण भयंकर तापला असून अकोला आणि चंद्रपुरात सर्वोच्च तापमानाच्या नोंदी झाल्या आहेत. संपूर्ण राज्यात अकोल्याचा पहिला नंबर आहे. तापमान वाढीत मागील 5 दिवस सलग उच्चांकी नोंद अकोल्यात करण्यात आली आहे. 

23 मार्च ते 27 मार्च अकोल्यातील तापमान सर्वाधिक असल्याची भारतीय हवामान खात्याची नोंद आहे.  वायव्येकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पश्चिम विदर्भात काही दिवसात सर्वाधिक तापमान होण्याची चिन्हं आहेत.  राजस्थानमधून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात बदल झाला आहे. 

दरम्यान, मागच्या तीन ते चार दिवसापूर्वी राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊसही झाला. त्याचा मोटा फटका राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे द्राक्ष तडकण्याची भिती व्यक्त केली जातेय. तसेच दरही कमी होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. ज्या भागांमध्ये द्राक्षाची काढणी झाली आहे, त्याठिकाणी पाऊस चांगला आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा अद्याप उतरल्या नाहीत त्यांच्यासाठी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस धोक्याचा ठरण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात 250 रुपयांची वाढ, तर क्विंटलला तीन हजार रुपयांचा दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी 
सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात 250 रुपयांची वाढ, तर क्विंटलला तीन हजार रुपयांचा दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी 
पावसाच्या ढगांमध्ये आढळला 'ब्लॅक कार्बन', ढगांसंदर्भात महत्वाचं संशोधन, पावसावर परिणाम होणार का? 
पावसाच्या ढगांमध्ये आढळला 'ब्लॅक कार्बन', ढगांसंदर्भात महत्वाचं संशोधन, पावसावर परिणाम होणार का? 

व्हिडीओ

Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Embed widget