एक्स्प्लोर

देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर

देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर मुलगी वैष्णवी कदम हिने कोणत्याही कॉर्पोरेट झगमगाटाला किंवा शहरातल्या सुखसोयींना भुलू न देता 'मोंड राणेवाडी' येथील मनोज दळवी या शेतकरी तरुणाला जीवनसाथी म्हणून निवडले आहे.

Raju Shetti:"मुलगा नोकरीवालाच हवा आणि तो पुणे-मुंबईसारख्या शहरात राहणारा असावा," या हट्टापायी आज महाराष्ट्रातील गावागावांत हजारो तरुण शेतकरी लग्नाविना बसले आहेत. शेतीला 'तोट्याचा व्यवसाय' मानून शेतकऱ्यांच्या मुलांना मुलगी देण्यास नकार देणाऱ्या आजच्या बुरसटलेल्या सामाजिक मानसिकतेवर कोकणातील एका उच्चशिक्षित मुलीने आपल्या धाडसी निर्णयाने जोरदार प्रहार केला आहे. देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर मुलगी वैष्णवी कदम हिने कोणत्याही कॉर्पोरेट झगमगाटाला किंवा शहरातल्या सुखसोयींना भुलू न देता 'मोंड राणेवाडी' येथील मनोज दळवी या कष्टाळू शेतकरी तरुणाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे. तिच्या या प्रेरणादायी निर्णयाची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट तिच्या सासरी जाऊन या नवदाम्पत्याला वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मे महिन्यातील 'ती' भेट अन् वैष्णवीचा दांडगा आत्मविश्वास!

माजी खासदार राजू शेट्टी यांनी या कौतुकास्पद घटनेचा सविस्तर प्रवास आपल्या पोस्टमध्ये मांडला आहे. मे महिन्यामध्ये राजू शेट्टी देवगड येथे आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या मेळाव्यासाठी गेले होते. त्यावेळेस वैष्णवी आणि तिच्या वडिलांनी मेळाव्यात त्यांची भेट घेऊन लग्नाची पत्रिका दिली होती. पत्रिका देत असताना वैष्णवीने मोठ्या उत्साहात आणि आत्मविश्वासाने सांगितले होते, "साहेब, मी इंजिनिअरिंग मधील उच्चशिक्षित मुलगी आहे. मात्र, मी एका शेतकरी मुलाबरोबर लग्न करण्याचे ठरविले आहे. यामुळे माझ्या लग्नाला येवून तुम्हाला आशिर्वाद द्यावेच लागतील." तिचा तो आत्मविश्वास आणि तिने घेतलेला क्रांतीकारी निर्णय ऐकून स्वतः राजू शेट्टी काही क्षणांसाठी अचंबित झाले होते.

शक्तीपीठ महामार्गाचे आंदोलन; लग्न चुकले पण शब्द पाळला 

8 मे रोजी वैष्णवी आणि मनोज यांचा विवाहसोहळा पार पडला. मात्र, त्यादरम्यान 'शक्तीपीठ महामार्गाच्या' नियोजित आंदोलनामध्ये व्यग्र असल्याने राजू शेट्टी यांना लग्नाला उपस्थित राहता आले नाही. परंतु, दिलेला शब्द पाळत काल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, राजू शेट्टी यांनी वेळ काढून देवगड तालुक्यातील 'मोंड राणेवाडी' हे गाव गाठले. वैष्णवीच्या सासरी जाऊन तिचे कौतुक करत, तिला साडीचोळीचा आहेर केला आणि नवदाम्पत्याला सुखी संसाराचा आशीर्वाद दिला.

आजच्या भीषण सामाजिक वास्तवावर थेट बोट

या निमित्ताने राजू शेट्टी यांनी आजच्या समाजासमोर उभ्या ठाकलेल्या एका भीषण वास्तवावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याच्याच पदरी आज उपेक्षा आली आहे. शेतीतील अनिश्चितता आणि आर्थिक संकटामुळे आज अनेक मुली आणि त्यांचे कुटुंब शेतकरी मुलाला 'वर' (नवरदेव) म्हणून पसंत करत नाहीत. ही परिस्थिती केवळ एका कुटुंबाची नसून संपूर्ण समाजासाठी एक मोठे सामाजिक संकट बनली आहे. अशा गडद अंधारात वैष्णवीने दाखवलेला हा आशेचा किरण समाजाला दिशा देणारा ठरेल.

शिक्षण म्हणजे केवळ 'मोठी नोकरी' नव्हे

"शिक्षण म्हणजे केवळ मोठी नोकरी मिळवणे किंवा पगाराचे आकडे मोजणे नव्हे, तर योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखणे होय," असे म्हणत राजू शेट्टींनी वैष्णवीच्या सुजाणपणाचे कौतुक केले. वैष्णवीने आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग जोडीदाराचा पगार न पाहता त्याचे 'कर्तृत्व' आणि 'माणुसकी' पारखण्यासाठी केला. मातीशी इमान राखणाऱ्या एका कष्टाळू तरुणाला सन्मान मिळवून देऊन तिने सिद्ध केले की, खरी श्रीमंती विचारांत आणि कष्टांत असते.

शेतकरी पुत्रांच्या मनात फुटली आशेची नवी पालवी!

वैष्णवीने समाजासमोर ठेवलेला हा आदर्श केवळ एक लग्न नसून सामाजिक बदलाची नवी पहाट आहे. जेव्हा अशा प्रकारे उच्चशिक्षित मुली पुढे येऊन शेतकऱ्याचा हात धरतील, तेव्हाच शेतकऱ्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल. वैष्णवीच्या या धाडसी निर्णयामुळे आज लग्नासाठी थांबलेल्या अनेक शेतकरी पुत्रांच्या मनात आशेची नवी पालवी फुटेल, यात शंका नाही.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठवाड्यात दुष्काळाचं सावट अधिक गडद! उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ, स्वतंत्र पॅकेज जाहीर करण्याची मागणी 
मराठवाड्यात दुष्काळाचं सावट अधिक गडद! उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ, स्वतंत्र पॅकेज जाहीर करण्याची मागणी 
जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात किती झाला पाऊस? 'या' 15 जिल्ह्यांना मोठा फटका, तुमचा जिल्हा कोणता? 
जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात किती झाला पाऊस? 'या' 15 जिल्ह्यांना मोठा फटका, तुमचा जिल्हा कोणता? 
... तर साखर कारखाने बंद होतील, एकही कारखाना शेतकऱ्यांना FRP देऊ शकणार नाही, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? 
... तर साखर कारखाने बंद होतील, एकही कारखाना शेतकऱ्यांना FRP देऊ शकणार नाही, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? 
शेतकरी, इथेनॉल ते साखर कारखाने! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या फायद्याचं गणित, विरोधकांनांही लगावला टोला
शेतकरी, इथेनॉल ते साखर कारखाने! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या फायद्याचं गणित, विरोधकांनांही लगावला टोला
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ketan agrawal case : केतन अग्रवालला संपवण्यात सिया चेतनसोबत तिसऱ्याचाही हात? बीडच्या मित्राकडे तपास सुरू, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता
केतन अग्रवालला संपवण्यात सिया चेतनसोबत तिसऱ्याचाही हात? बीडच्या मित्राकडे तपास सुरू, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता
Dahihandi 2026 : दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू, तर 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू; 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
Dhananjay Mahadik and Krishnaraj Mahadik: आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: आधी एकाच चितेवर तिघांना अग्नी, आता अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये प्राण सोडला, नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट
आधी एकाच चितेवर तिघांना अग्नी, आता अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये प्राण सोडला, नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट
Embed widget