एक्स्प्लोर

देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर

देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर मुलगी वैष्णवी कदम हिने कोणत्याही कॉर्पोरेट झगमगाटाला किंवा शहरातल्या सुखसोयींना भुलू न देता 'मोंड राणेवाडी' येथील मनोज दळवी या शेतकरी तरुणाला जीवनसाथी म्हणून निवडले आहे.

Raju Shetti:"मुलगा नोकरीवालाच हवा आणि तो पुणे-मुंबईसारख्या शहरात राहणारा असावा," या हट्टापायी आज महाराष्ट्रातील गावागावांत हजारो तरुण शेतकरी लग्नाविना बसले आहेत. शेतीला 'तोट्याचा व्यवसाय' मानून शेतकऱ्यांच्या मुलांना मुलगी देण्यास नकार देणाऱ्या आजच्या बुरसटलेल्या सामाजिक मानसिकतेवर कोकणातील एका उच्चशिक्षित मुलीने आपल्या धाडसी निर्णयाने जोरदार प्रहार केला आहे. देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर मुलगी वैष्णवी कदम हिने कोणत्याही कॉर्पोरेट झगमगाटाला किंवा शहरातल्या सुखसोयींना भुलू न देता 'मोंड राणेवाडी' येथील मनोज दळवी या कष्टाळू शेतकरी तरुणाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे. तिच्या या प्रेरणादायी निर्णयाची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट तिच्या सासरी जाऊन या नवदाम्पत्याला वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मे महिन्यातील 'ती' भेट अन् वैष्णवीचा दांडगा आत्मविश्वास!

माजी खासदार राजू शेट्टी यांनी या कौतुकास्पद घटनेचा सविस्तर प्रवास आपल्या पोस्टमध्ये मांडला आहे. मे महिन्यामध्ये राजू शेट्टी देवगड येथे आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या मेळाव्यासाठी गेले होते. त्यावेळेस वैष्णवी आणि तिच्या वडिलांनी मेळाव्यात त्यांची भेट घेऊन लग्नाची पत्रिका दिली होती. पत्रिका देत असताना वैष्णवीने मोठ्या उत्साहात आणि आत्मविश्वासाने सांगितले होते, "साहेब, मी इंजिनिअरिंग मधील उच्चशिक्षित मुलगी आहे. मात्र, मी एका शेतकरी मुलाबरोबर लग्न करण्याचे ठरविले आहे. यामुळे माझ्या लग्नाला येवून तुम्हाला आशिर्वाद द्यावेच लागतील." तिचा तो आत्मविश्वास आणि तिने घेतलेला क्रांतीकारी निर्णय ऐकून स्वतः राजू शेट्टी काही क्षणांसाठी अचंबित झाले होते.

शक्तीपीठ महामार्गाचे आंदोलन; लग्न चुकले पण शब्द पाळला 

8 मे रोजी वैष्णवी आणि मनोज यांचा विवाहसोहळा पार पडला. मात्र, त्यादरम्यान 'शक्तीपीठ महामार्गाच्या' नियोजित आंदोलनामध्ये व्यग्र असल्याने राजू शेट्टी यांना लग्नाला उपस्थित राहता आले नाही. परंतु, दिलेला शब्द पाळत काल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, राजू शेट्टी यांनी वेळ काढून देवगड तालुक्यातील 'मोंड राणेवाडी' हे गाव गाठले. वैष्णवीच्या सासरी जाऊन तिचे कौतुक करत, तिला साडीचोळीचा आहेर केला आणि नवदाम्पत्याला सुखी संसाराचा आशीर्वाद दिला.

आजच्या भीषण सामाजिक वास्तवावर थेट बोट

या निमित्ताने राजू शेट्टी यांनी आजच्या समाजासमोर उभ्या ठाकलेल्या एका भीषण वास्तवावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याच्याच पदरी आज उपेक्षा आली आहे. शेतीतील अनिश्चितता आणि आर्थिक संकटामुळे आज अनेक मुली आणि त्यांचे कुटुंब शेतकरी मुलाला 'वर' (नवरदेव) म्हणून पसंत करत नाहीत. ही परिस्थिती केवळ एका कुटुंबाची नसून संपूर्ण समाजासाठी एक मोठे सामाजिक संकट बनली आहे. अशा गडद अंधारात वैष्णवीने दाखवलेला हा आशेचा किरण समाजाला दिशा देणारा ठरेल.

शिक्षण म्हणजे केवळ 'मोठी नोकरी' नव्हे

"शिक्षण म्हणजे केवळ मोठी नोकरी मिळवणे किंवा पगाराचे आकडे मोजणे नव्हे, तर योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखणे होय," असे म्हणत राजू शेट्टींनी वैष्णवीच्या सुजाणपणाचे कौतुक केले. वैष्णवीने आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग जोडीदाराचा पगार न पाहता त्याचे 'कर्तृत्व' आणि 'माणुसकी' पारखण्यासाठी केला. मातीशी इमान राखणाऱ्या एका कष्टाळू तरुणाला सन्मान मिळवून देऊन तिने सिद्ध केले की, खरी श्रीमंती विचारांत आणि कष्टांत असते.

शेतकरी पुत्रांच्या मनात फुटली आशेची नवी पालवी!

वैष्णवीने समाजासमोर ठेवलेला हा आदर्श केवळ एक लग्न नसून सामाजिक बदलाची नवी पहाट आहे. जेव्हा अशा प्रकारे उच्चशिक्षित मुली पुढे येऊन शेतकऱ्याचा हात धरतील, तेव्हाच शेतकऱ्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल. वैष्णवीच्या या धाडसी निर्णयामुळे आज लग्नासाठी थांबलेल्या अनेक शेतकरी पुत्रांच्या मनात आशेची नवी पालवी फुटेल, यात शंका नाही.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Maharashtra Farm Loan Waiver Pune: शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार
शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Embed widget