एक्स्प्लोर

Nandurbar News : शेतातील विजेच्या तार आणि ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीच्या घटना वाढल्या, रब्बी हंगामाच्या नियोजनात शेतकऱ्यांसमोर अडचणी

Nandurbar News : नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील करंजाई परिसरात वीजतारांची चोरी आणि ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीच्या घटनांनी शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Nandurbar News : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने भरडला जात आहे. शहादा तालुक्यातील करंजाई परिसरात वीजतारांची चोरी आणि ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीच्या घटनांनी शेतकरी अडचणीत सापडला आहे. परिसरातील दहा ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल आणि 20 ते 22 खांबावरील विजांच्या तारांची चोरी झाली आहे. परिणामी रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल आणि विजेच्या तारांच्या चोरीने शेतकरी हतबल 
नंदुरबार जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरिपाचा हंगाम गेला आहे. आता शेतकऱ्यांची आशा लागून आहे ती रब्बी हंगामावर. मात्र चोरट्यांनी शेतशिवारातील शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल आणि विजेच्या खांबावरील तारा चोरुन नेल्या आहेत. त्यासोबत पाच महिन्यात दुसऱ्यांदा ट्रान्सफॉर्मरमधील ऑईलची चोरी झाली आहे. शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत मात्र चोरट्यांचा तपास लागलेला नाही. तर दुसरीकडे विद्युत वितरण कंपनी शेतकऱ्यांकडे वीज बिल भरण्याचा तगादा लावत आहे. आता शेतकऱ्यांनी स्वखर्चाने ट्रान्सफॉर्मर काढून ऑईल भरण्यासाठी विद्युत वितरण कंपनीकडे दिले आहेत. शेतकऱ्यांना ते ट्रान्सफॉर्मर कधी मिळतील हा एक प्रश्न आहे. ते ट्रान्सफॉर्मर मिळाल्यावरच शेतकरी रब्बी पिकांचे नियोजन करु शकतो. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

एकीकडे अस्मानी संकटाचा दणका सहन करत असताना चोरीच्या घटनांची सुलतानी संकटे शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहेत. ऑईल चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन तिला जेलबंद करण्याची मागणी आता शेतकरी करु लागले आहेत. आता पोलिसांनीही बळीराजाला अडचणीत आणणाऱ्या चोरांना अद्दल घडवावी हीच अपेक्षा आहे.

धुक्यामुळे नंदुरबारमधील कांदा, मिरची पिकाला फटका 
नंदुरबार जिल्ह्यात परतीचा पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आता पावसानंतर जिल्ह्यात अनेक भागात दाट धुके दिसून येत आहे. त्यामुळे कांदा, मिरची पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. धुके पडल्यानंतर कांद्याच्या पातीवर मोठ्या प्रमाणात दवबिंदू जमा होऊन होऊन सडून खराब होत असते तर मिरचीवर दवबिंदू जमा होऊन डाग पडून प्रतवारी कमी होत असते. याशिवाय धुक्यामुळे कापसाचे फुल फुगडी गळत असून जवळपास खरीप हंगामातील सर्वच पिकांना कमी जास्त प्रमाणात याचा फटका बसून उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur Sangram Morcha : सोलापुरात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांचा मोर्चाYugendra Pawar on Ajit Pawar : बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव होईलLaxman Hake - Manoj Jarange : मारामाऱ्या कोण लावतं हे जनतेला कळतं - मनोज जरांगेManoj Jarange Sambhajinagar PC : काही जणांना थुंका चाटायची सवय असते,  लक्ष्मण हाकेंना टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Embed widget